ETV Bharat / state

पक्ष सोडण्याच काम 'कपटी' माणूसच करू शकतो - आमदार यशोमती ठाकूर

माझे वडील, माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते. १९७८च्या काळातही काँग्रेसमधील परिस्थिती फार चांगली नव्हती.

author img

By

Published : Jul 14, 2019, 3:25 PM IST

आमदार यशोमती ठाकूर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधताना.

अमरावती - आपला पक्ष हा आपल्या आई वडिलांसारखा असतो, त्यामुळे पक्ष सोडण्याचे काम हा 'कपटी' माणूसच करू शकतो, असे म्हणत काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

आमदार यशोमती ठाकूर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधताना.

मी काँग्रेस परिवारातील आहे. माझे वडील, माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते. १९७८च्या काळातही काँग्रेसमधील परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यावेळेसही विभाजन झाले होते. आम्ही मूळ विचाराचे राजकारण आणि समाजकारण करत असतो. कुणाला संशय येत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. अनेक वेळा मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला आहे. मलाही पक्षांतर करण्यासाठी आमिष देण्यात आले. मला जायचे असते तर मी केव्हाचीच गेली असती. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिले त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ठाकूर म्हणाल्या. आज अमरावतीमध्ये त्या 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होत्या.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या, खूप जबाबदारी आहे. ज्या विपरीत परिस्थितीमध्ये जबाबदारी मिळाली आहे, ती स्वीकारून शक्य ते संघटनात्मक बदल करणार आहे. समोर विधानसभा निवडणुकीचे आमच्या समोर मोठे आव्हान आहे. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तुलना विधानसभा निवडणुकीशी करता येणार असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 80 च्या वर जागा आम्ही जिंकल्या होत्या. आता त्यापेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


भाजपकडून सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग करून संविधानाला तोडण्याचे काम होत आहे. निवडणुकीच्या काळात मी कर्नाटकमध्ये असताना कशाप्रकारे आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला हे मला माहित आहे. तसेच सत्ताधारी यांच्याविरोधात बोलले तर त्यांना नेस्तनाभूत करायचे काम केले जात असल्याचेही आमदार ठाकूर म्हणाल्या.

अमरावती - आपला पक्ष हा आपल्या आई वडिलांसारखा असतो, त्यामुळे पक्ष सोडण्याचे काम हा 'कपटी' माणूसच करू शकतो, असे म्हणत काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

आमदार यशोमती ठाकूर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधताना.

मी काँग्रेस परिवारातील आहे. माझे वडील, माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते. १९७८च्या काळातही काँग्रेसमधील परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यावेळेसही विभाजन झाले होते. आम्ही मूळ विचाराचे राजकारण आणि समाजकारण करत असतो. कुणाला संशय येत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. अनेक वेळा मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला आहे. मलाही पक्षांतर करण्यासाठी आमिष देण्यात आले. मला जायचे असते तर मी केव्हाचीच गेली असती. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिले त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ठाकूर म्हणाल्या. आज अमरावतीमध्ये त्या 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होत्या.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या, खूप जबाबदारी आहे. ज्या विपरीत परिस्थितीमध्ये जबाबदारी मिळाली आहे, ती स्वीकारून शक्य ते संघटनात्मक बदल करणार आहे. समोर विधानसभा निवडणुकीचे आमच्या समोर मोठे आव्हान आहे. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तुलना विधानसभा निवडणुकीशी करता येणार असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 80 च्या वर जागा आम्ही जिंकल्या होत्या. आता त्यापेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


भाजपकडून सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग करून संविधानाला तोडण्याचे काम होत आहे. निवडणुकीच्या काळात मी कर्नाटकमध्ये असताना कशाप्रकारे आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला हे मला माहित आहे. तसेच सत्ताधारी यांच्याविरोधात बोलले तर त्यांना नेस्तनाभूत करायचे काम केले जात असल्याचेही आमदार ठाकूर म्हणाल्या.

Intro:पक्ष सोडण्याच काम 'कपटी' माणूसच करू शकतो-आमदार यशोमती ठाकूर

काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष लगावला टोला.
-----------------------------------------------------
अमरावती अँकर

मी काँग्रेस परिवारातील आहे मी आजच पक्षात आली आहे असा भाग नाही. माझे वडील माझे आजोबा काँग्रेस मध्ये होते.1978 च्या काळातही काँग्रेस मधील परिस्थिती फार चांगली नव्हती, त्यावेळेस ही विभाजन झाले होते .मूळ विचाराचे राजकारण आणि समाज कारण आम्ही करत असतो .जर इथे कुणाला संशय येत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. अनेक वेळा मलाही डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला आहे. तुम्हाला हे हे देतो तुम्ही आमच्या कडे या अस असत तर मी केव्हाचीच गेली असती .राजकारणात अनेकदा ऑफर दिली जाते .सभागृहात सर्वजण सोबत राहतात पण दोस्ती एक बाजूला असते .पक्ष हा आई वडिला सारखा असतो. आणि पक्ष सोडण्याच काम हा 'कपटी' माणुसच करू शकतो.असे म्हणत काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिल त्यामुळं भाजप मध्ये जाण्याचा प्रश्चनच येत नाही असेही ठाकूर म्हणाल्या आज अमरावती मध्ये त्या etv भारत शी बोलत होत्या.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी झालेल्या निवडीवर बोलत असताना त्या म्हणाल्या खूप जबाबदारी आहे ज्या विपरीत परिस्थिती मध्ये जी जबाबदारी मिळाली आहे ती आम्ही स्वीकारली आहे .सगळी कडे जाऊन काय संघटनात्मक बदल करता येईल ते आम्ही करणार आहो .समोर विधानसभा निवडणुक आहे ते सुद्धा आमच्या साठी मोठे आव्हान आहे या सगळ्या आव्हानांना समोर जाऊन स्वीकारण्याची आमची तयारी आहे .सगळ्या निवडणुका या वेगवेगळ्या वेगळ्या असतात लोकसभा निवडणुकीची तुलना आपण विधानसभा निवडणुकीशी करू शकत नाही .मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 80 च्या वर जागा आम्ही जिंकल्या होत्या या वेळेस त्या पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास आहे.


भाजप कडून सत्तेचा गैरउपयोग होत आहे आणि पैशाचा दुरुपयोग या दोन गोष्टी मुळे संविधानाला तोडण्याचे काम होत आहे ,निवडणुकीच्या काळात मी कर्नाटक मध्ये होती मला माहीत आहे आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला .सत्ताधारी याच्या विरोधात बोलले तर त्यांना निस्तानभूत करायचे काम केले जात असल्याचेही आ ठाकूर म्हणाल्या .



Body:अमरावती


Conclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.