ETV Bharat / state

मेळघाट; पोषक आहाराच्या कमतरतेमुळे वाढतोय कुपोषणाचा स्तर; तर दुसरीकडे फास्ट फूडमुळे बालकांच्या लठ्ठपणात वाढ....

author img

By

Published : Dec 19, 2020, 12:56 PM IST

मेळघाटात पोषक आहाराच्या कमतरतेमुळे कुपोषणाच्या स्तरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे फास्ट फूडच्या अति सेवनामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे कुपोषण आणि वाढता लठ्ठपणा यावर आळा घालण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.

special story on high melatonin in melghat
मेळघाट; पोषक आहाराच्या कमतरतेमुळे वाढतोय कुपोषणाचा स्तर

अमरावती- गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाची काळी किनार लागलेल्या मेळघाटात आजही कुपोशित बालके आढळतात. शासन कितीही गाजावाजा करत असले तरी अनेक आदिवासी मुलापर्यंत कुपोषणासंबिधित योजना पोहचत नसल्याने अनेक लहान मुले आजही कुपोषमग्रस्त आहेत. तर दुसरीकडे अमरावती शहरात मात्र फास्ट फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी १ ते ५ या वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणा मोठया प्रमाणात आढळून येत आहे. एकीकडे बालकांमध्ये वाढते कुपोषण आणि दुसरीकडे वाढत्या लठ्ठपणावर आळा घालण्याचे प्रशासनामोर आवाहन आहे.

मेळघाट; पोषक आहाराच्या कमतरतेमुळे वाढतोय कुपोषणाचा स्तर

कुपोषणाचे मुख्य कारण

मेळघाटात कुपोषणाचे मुख्य कारण म्हणजे तिथल्या मुलांच्या आहारात पालेभाज्यांची असलेली कमतरता. मेळघाटामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, पाणी अडव्यासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे तिथे भाजीपाल्याची लागवड करता येत नाही. परिणामी आहारात हिरव्या भाज्यांचा सामावेश नसल्यामुळे कुपोषण वाढते. तसेच लहान मुले मातीत खेळत असल्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी केला आहे. बालकांना योग्य वेळी सकस व पूरक आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्यात कुपोषणाची समस्या जाणवते.

कुपोषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच

दरम्यान कुपोषण रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कुपोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, चुरणी, आणि अमरावती या ठिकाणी हे पुनर्वसन केंद्र आहेत. तसेच मेळघाटात ११ ठिकाणी अशी केंद्रे असून या केंद्रांमार्फत बालकांच्या मातांना आहाराबद्दल माहिती दिली जाते.

खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्याने लठ्ठपणा वाढला

तर दुसरीकडे अमरावती शहरातील मुलांना मिळत असलेला भरपूर आहार. त्यात खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी. फास्ट फुड खाण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे १ ते ५ वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ नरेश तायडे म्हणाले. हल्ली शहरातील मुलांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा बाहेरील पदार्थ मागवले जातात. त्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण वाढते. तसेच मुलांचे मैदानी खेळ बंद झाल्यामुळे शरीराला व्यायाम मिळत नाही. फास्ट फूडचे सेवन आणि बैठ्या खेळ्यांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढल्याचे तायडे म्हणाले.

अमरावती- गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाची काळी किनार लागलेल्या मेळघाटात आजही कुपोशित बालके आढळतात. शासन कितीही गाजावाजा करत असले तरी अनेक आदिवासी मुलापर्यंत कुपोषणासंबिधित योजना पोहचत नसल्याने अनेक लहान मुले आजही कुपोषमग्रस्त आहेत. तर दुसरीकडे अमरावती शहरात मात्र फास्ट फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी १ ते ५ या वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणा मोठया प्रमाणात आढळून येत आहे. एकीकडे बालकांमध्ये वाढते कुपोषण आणि दुसरीकडे वाढत्या लठ्ठपणावर आळा घालण्याचे प्रशासनामोर आवाहन आहे.

मेळघाट; पोषक आहाराच्या कमतरतेमुळे वाढतोय कुपोषणाचा स्तर

कुपोषणाचे मुख्य कारण

मेळघाटात कुपोषणाचे मुख्य कारण म्हणजे तिथल्या मुलांच्या आहारात पालेभाज्यांची असलेली कमतरता. मेळघाटामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, पाणी अडव्यासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे तिथे भाजीपाल्याची लागवड करता येत नाही. परिणामी आहारात हिरव्या भाज्यांचा सामावेश नसल्यामुळे कुपोषण वाढते. तसेच लहान मुले मातीत खेळत असल्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी केला आहे. बालकांना योग्य वेळी सकस व पूरक आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्यात कुपोषणाची समस्या जाणवते.

कुपोषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच

दरम्यान कुपोषण रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कुपोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, चुरणी, आणि अमरावती या ठिकाणी हे पुनर्वसन केंद्र आहेत. तसेच मेळघाटात ११ ठिकाणी अशी केंद्रे असून या केंद्रांमार्फत बालकांच्या मातांना आहाराबद्दल माहिती दिली जाते.

खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्याने लठ्ठपणा वाढला

तर दुसरीकडे अमरावती शहरातील मुलांना मिळत असलेला भरपूर आहार. त्यात खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी. फास्ट फुड खाण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे १ ते ५ वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ नरेश तायडे म्हणाले. हल्ली शहरातील मुलांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा बाहेरील पदार्थ मागवले जातात. त्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण वाढते. तसेच मुलांचे मैदानी खेळ बंद झाल्यामुळे शरीराला व्यायाम मिळत नाही. फास्ट फूडचे सेवन आणि बैठ्या खेळ्यांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढल्याचे तायडे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.