ETV Bharat / state

खासगी सचिव झाला सिंधुताई सपकाळ यांचा वारस, मुलगा अरुण सपकाळ यांचा आक्षेप; न्यायालयात याचिका दाखल

Sindhutai Sapkal heir story : सिंधुताई सपकाळ यांच्या खासगी सचिवानं सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावून त्यांचा आपण वारस असल्याचं सांगण्याबाबत सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अरुण सपकाळ यांनी खास ' ईटीव्ही' भारत' शी बोलताना केला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 2:20 PM IST

Updated : Dec 4, 2023, 2:50 PM IST

Arun Sapkal
सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ
सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ

अमरावती : अनाथांची माय म्हणून आपल्या हयातीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जाऊन आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी त्यांच्या संस्थेत आणि कुटुंबात वाद उफाळून आला आहे. सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव असणारे विनय मुकुंद नितवणे यांनी आपल्या नावासमोर वडील मुकुंद नितवणे यांचे नाव काढून सिंधुताई सपकाळ असं नाव राजपत्राद्वारे लावलं आहे. विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावून त्यांचा आपण वारस असल्याचं सांगण्याबाबत सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात अरुण सपकाळ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुण सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात खास 'ईटीव्ही' भारत' शी बोलताना उलगडा केला.


असं आहे संपूर्ण प्रकरण : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव असणारे विनय मुकुंद नितवणे हे मूळचे वर्धा येथील रहिवासी आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील संस्थेचा कारभार ते पाहतात. सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2021 रोजी निधन झालं. आता विनय नितवणे यांनी आपल्या नावासमोर नाव बदलून राजपत्राद्वारे सिंधुताई सपकाळ असं नाव लावलं आहे. जी मुलं अनाथ असतात अशा मुलांच्या नावासमोरच सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावलं जातं असं अरुण सपकाळ यांचं म्हणणं आहे. विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत काम करावं, समाजसेवा करावी यासंदर्भात आमचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र ते अनाथ नसताना त्यांनी आपल्या नावासमोर सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावलं यावर तीव्र आक्षेप असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले. सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत विनय नितवणे सतत राहायचे सिंधुताई सपकाळ यांच्यामुळं त्यांच्या अनेकांशी ओळखी झाल्या आहेत. आता सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावून विनय नितवणे यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न देखील अरुण सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.


आधी उच्च न्यायालयात घेतली धाव : या प्रकरणात सर्वात आधी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयानं आधी खालच्या न्यायालयात याचिका दाखल करावी असं स्पष्ट केल्यावर आता अचलपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानं विनय नितवणे यांना एक डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. मात्र 1 डिसेंबरला ते न्यायालयात हजर झाले नाहीत. यामुळे त्यांना पुन्हा आपले स्पष्टीकरण देण्यासंदर्भात नोटीस पाठवली असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले.

पुण्यातही करणार तक्रार : आमची आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार विनय नितवणे यांच्याकडून केला जात आहे. यामुळे विनयच्या संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मी तक्रार करणार असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले.

बहिणीच्या भूमिकेवरही घेतला आक्षेप : सिंधुताई सपकाळ यांना एकूण चार मुलं आहेत. अमृत सपकाळ हा मोठा मुलगा असून ते वर्ध्याला राहतात. अरुण सपकाळ हे दुसऱ्या क्रमांकाचे असून ते चिखलदरा येथे सिंधुताई सपकाळ यांनी सर्वात आधी स्थापन केलेल्या अनाथ मुलींचा आश्रम सांभाळतात. तिसरा मुलगा संजय हे पुण्यात आहेत आणि चौथी मुलगी ममता ही पुण्यात माईंची संस्था सांभाळते. माझी बहीण ममताने आंतरधर्मीय लग्न केल्यामुळं मी अनेक वर्षांपासून तिच्याशी बोलत नाही. तिनं घेतलेला निर्णय आमच्या माईंना देखील पटला नव्हता. मात्र काही दिवसातच ती माईंकडे परत आली. आई म्हणून माईंनी तिला पदरात घेतलं. आज मात्र ममता पुण्यात माईंची संस्था सांभाळत असून विनय नितवणे याला ममताचं पाठबळ असल्याबाबत अरुण सपकाळ यांनी रोष व्यक्त केला.

अखेरच्या क्षणी माईंना भेटण्यास येऊ दिले नाही : माई आजारी असल्याचं कळताच मी चिखलदरा इथून कुटुंबासह पुण्याकडे निघालो असताना अर्ध्या रस्त्यात माईंना बरं आहे, तुम्ही पुण्याला येऊ नका असं सांगण्यात आलं. त्यामुळे मी अर्ध्या रस्त्यातून परत आलो. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी माई गेल्या असा निरोप आला. आम्ही गाडीतले सामान काढले देखील नव्हते आणि तसंच सायंकाळी पुण्यासाठी निघालो असं देखील अरुण सपकाळ यांनी सांगितलं.


चिखलदऱ्यात अंत्यसंस्कार करण्याची माईंची इच्छा : चिखलदरा ही माईंची कर्मभूमी आहे. माझा मोठा मुलगा दगावल्यावर आम्ही त्याला आमच्या चिखलदरा येथील शेतात माती दिली. त्यावेळी माईंनी मला देखील आपल्या चिखलदरा येथील शेतातच माती द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. माईंच्या निधनानंतर माझ्या लहान मुलाने ममताला माईंच्या अंत्यसंस्काराबाबतच्या इच्छे संदर्भात सांगितलं असता तिला देव वगैरे करू नका असं म्हणत सार्वजनिक स्मशानभूमीत माईंवर अंत्यसंस्कार केले. खरंतर माईंच्या एखाद्या संस्थेच्या जागी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असते तर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक झालं असतं. त्याद्वारे माईंच्या कार्याची प्रेरणा अनेकांना मिळाली असती. मात्र असं काहीही झालं नसल्यासंदर्भात अरुण सपकाळ यांनी खंत व्यक्त केली.


नितवणे म्हणतात, अरुण सपकाळ माझे मोठे भाऊ : मी लहानपणापासूनच माईंसोबत होतो. माई माझ्यासाठी सर्वकाही होत्या आणि आहेत. मी माझ्यासमोर माईंचं नाव लावल्यामुळे अरुण दादा नाराज झालेत. मात्र हा आमचा घरचा वाद आहे. अरुण दादांची नाराजी लवकरच दूर होईल असं विनय नितवणे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केलं आहे. आमच्या भावंडांमध्ये काहीसा गैरसमज निर्माण झाला आहे, असं ते म्हणाले.

असं म्हणाल्या ममता सपकाळ : अरुण दादांचा गैरसमज लवकरच दूर होईल. खरंतर माई गेल्या यावर आमचा विश्वासच नाही. माई गेल्या त्यावेळी अरुण दादा पूर्णवेळ सोबतच होते. त्यावेळच्या सर्व व्हिडिओंमध्ये ते दिसत आहेत. माईंना पद्मश्री मिळाल्यामुळे शासनाच्यावतीनेच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आज ठोसर बाग मध्ये त्यांची समाधी देखील आहे असं ममता सपकाळ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. छत्रपती शिवरायांना का म्हटले जाते भारतीय आरमाराचे जनक? जाणून घ्या तुम्हाला क्वचितच माहित असलेल्या गोष्टी
  2. चहापत्तीच्या नावावर अमली पदार्थाची तस्करी, येमेनी नागरिकाला एनसीबीकडून अटक
  3. 'विश्वची माझे घरा'चा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आळंदीत ग्रामस्थ नाराज, कार्तिक यात्रेतच करणार गाव बंद

सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ

अमरावती : अनाथांची माय म्हणून आपल्या हयातीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जाऊन आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी त्यांच्या संस्थेत आणि कुटुंबात वाद उफाळून आला आहे. सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव असणारे विनय मुकुंद नितवणे यांनी आपल्या नावासमोर वडील मुकुंद नितवणे यांचे नाव काढून सिंधुताई सपकाळ असं नाव राजपत्राद्वारे लावलं आहे. विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावून त्यांचा आपण वारस असल्याचं सांगण्याबाबत सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात अरुण सपकाळ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुण सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात खास 'ईटीव्ही' भारत' शी बोलताना उलगडा केला.


असं आहे संपूर्ण प्रकरण : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव असणारे विनय मुकुंद नितवणे हे मूळचे वर्धा येथील रहिवासी आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील संस्थेचा कारभार ते पाहतात. सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2021 रोजी निधन झालं. आता विनय नितवणे यांनी आपल्या नावासमोर नाव बदलून राजपत्राद्वारे सिंधुताई सपकाळ असं नाव लावलं आहे. जी मुलं अनाथ असतात अशा मुलांच्या नावासमोरच सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावलं जातं असं अरुण सपकाळ यांचं म्हणणं आहे. विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत काम करावं, समाजसेवा करावी यासंदर्भात आमचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र ते अनाथ नसताना त्यांनी आपल्या नावासमोर सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावलं यावर तीव्र आक्षेप असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले. सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत विनय नितवणे सतत राहायचे सिंधुताई सपकाळ यांच्यामुळं त्यांच्या अनेकांशी ओळखी झाल्या आहेत. आता सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावून विनय नितवणे यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न देखील अरुण सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.


आधी उच्च न्यायालयात घेतली धाव : या प्रकरणात सर्वात आधी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयानं आधी खालच्या न्यायालयात याचिका दाखल करावी असं स्पष्ट केल्यावर आता अचलपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानं विनय नितवणे यांना एक डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. मात्र 1 डिसेंबरला ते न्यायालयात हजर झाले नाहीत. यामुळे त्यांना पुन्हा आपले स्पष्टीकरण देण्यासंदर्भात नोटीस पाठवली असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले.

पुण्यातही करणार तक्रार : आमची आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार विनय नितवणे यांच्याकडून केला जात आहे. यामुळे विनयच्या संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मी तक्रार करणार असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले.

बहिणीच्या भूमिकेवरही घेतला आक्षेप : सिंधुताई सपकाळ यांना एकूण चार मुलं आहेत. अमृत सपकाळ हा मोठा मुलगा असून ते वर्ध्याला राहतात. अरुण सपकाळ हे दुसऱ्या क्रमांकाचे असून ते चिखलदरा येथे सिंधुताई सपकाळ यांनी सर्वात आधी स्थापन केलेल्या अनाथ मुलींचा आश्रम सांभाळतात. तिसरा मुलगा संजय हे पुण्यात आहेत आणि चौथी मुलगी ममता ही पुण्यात माईंची संस्था सांभाळते. माझी बहीण ममताने आंतरधर्मीय लग्न केल्यामुळं मी अनेक वर्षांपासून तिच्याशी बोलत नाही. तिनं घेतलेला निर्णय आमच्या माईंना देखील पटला नव्हता. मात्र काही दिवसातच ती माईंकडे परत आली. आई म्हणून माईंनी तिला पदरात घेतलं. आज मात्र ममता पुण्यात माईंची संस्था सांभाळत असून विनय नितवणे याला ममताचं पाठबळ असल्याबाबत अरुण सपकाळ यांनी रोष व्यक्त केला.

अखेरच्या क्षणी माईंना भेटण्यास येऊ दिले नाही : माई आजारी असल्याचं कळताच मी चिखलदरा इथून कुटुंबासह पुण्याकडे निघालो असताना अर्ध्या रस्त्यात माईंना बरं आहे, तुम्ही पुण्याला येऊ नका असं सांगण्यात आलं. त्यामुळे मी अर्ध्या रस्त्यातून परत आलो. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी माई गेल्या असा निरोप आला. आम्ही गाडीतले सामान काढले देखील नव्हते आणि तसंच सायंकाळी पुण्यासाठी निघालो असं देखील अरुण सपकाळ यांनी सांगितलं.


चिखलदऱ्यात अंत्यसंस्कार करण्याची माईंची इच्छा : चिखलदरा ही माईंची कर्मभूमी आहे. माझा मोठा मुलगा दगावल्यावर आम्ही त्याला आमच्या चिखलदरा येथील शेतात माती दिली. त्यावेळी माईंनी मला देखील आपल्या चिखलदरा येथील शेतातच माती द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. माईंच्या निधनानंतर माझ्या लहान मुलाने ममताला माईंच्या अंत्यसंस्काराबाबतच्या इच्छे संदर्भात सांगितलं असता तिला देव वगैरे करू नका असं म्हणत सार्वजनिक स्मशानभूमीत माईंवर अंत्यसंस्कार केले. खरंतर माईंच्या एखाद्या संस्थेच्या जागी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असते तर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक झालं असतं. त्याद्वारे माईंच्या कार्याची प्रेरणा अनेकांना मिळाली असती. मात्र असं काहीही झालं नसल्यासंदर्भात अरुण सपकाळ यांनी खंत व्यक्त केली.


नितवणे म्हणतात, अरुण सपकाळ माझे मोठे भाऊ : मी लहानपणापासूनच माईंसोबत होतो. माई माझ्यासाठी सर्वकाही होत्या आणि आहेत. मी माझ्यासमोर माईंचं नाव लावल्यामुळे अरुण दादा नाराज झालेत. मात्र हा आमचा घरचा वाद आहे. अरुण दादांची नाराजी लवकरच दूर होईल असं विनय नितवणे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केलं आहे. आमच्या भावंडांमध्ये काहीसा गैरसमज निर्माण झाला आहे, असं ते म्हणाले.

असं म्हणाल्या ममता सपकाळ : अरुण दादांचा गैरसमज लवकरच दूर होईल. खरंतर माई गेल्या यावर आमचा विश्वासच नाही. माई गेल्या त्यावेळी अरुण दादा पूर्णवेळ सोबतच होते. त्यावेळच्या सर्व व्हिडिओंमध्ये ते दिसत आहेत. माईंना पद्मश्री मिळाल्यामुळे शासनाच्यावतीनेच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आज ठोसर बाग मध्ये त्यांची समाधी देखील आहे असं ममता सपकाळ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. छत्रपती शिवरायांना का म्हटले जाते भारतीय आरमाराचे जनक? जाणून घ्या तुम्हाला क्वचितच माहित असलेल्या गोष्टी
  2. चहापत्तीच्या नावावर अमली पदार्थाची तस्करी, येमेनी नागरिकाला एनसीबीकडून अटक
  3. 'विश्वची माझे घरा'चा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आळंदीत ग्रामस्थ नाराज, कार्तिक यात्रेतच करणार गाव बंद
Last Updated : Dec 4, 2023, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.