ETV Bharat / state

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतर: नागरिकांनी केला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध - भातकुली तहसील कार्यालय स्थानांतर न्यूज

भातकुली तहसील कार्यालय पुन्हा एकदा भातकुली येथून अमरावतीत हलवण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे भातकुली येथील रहिवाशांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवला आहे.

यशोमती ठाकूर यांचा निषेध
यशोमती ठाकूर यांचा निषेध
author img

By

Published : Jan 23, 2020, 6:18 PM IST

अमरावती - दोन महिन्यांपूर्वी भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला स्थानांतरित करण्यात आले. हेच कार्यालय पुन्हा अमरावतीत आणण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तहसील कार्यालय पुन्हा अमरावतीत आणण्याची मागणी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ठाकूर यांच्या निषेधार्थ भातकुलीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन केले.

भातकुलीच्या नागरिकांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध केला


25 नोव्हेंबर 2019 रोजी अमरावती शहरात असणारे भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याचे आदेश शासनाने पारित केले. यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा आणि नागरिक मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अडीच दिवसांच्या शासन काळात भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला नेण्याचा आदेश शासनाने पारित केला होता.

हेही वाचा - लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'

दरम्यान, भातकुली शहर जिल्ह्याच्या एका टोकावर आहे. त्यामुळे भातकुली तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांना तहसील कार्यालय हे भातकुलीऐवजी अमरावती असलेलेच सोयीचे आहे. या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक गावातील रहिवाशांनी निवेदन सादर केले होते. आता भातकुली तहसील कार्यालय पुन्हा एकदा दापोली येथून अमरावतीत हलवण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे भातकुली येथील रहिवाशांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत आले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भातकुली येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना भातकुलीच्या नागरिकांनी निवेदनही सादर केले आहे.

अमरावती - दोन महिन्यांपूर्वी भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला स्थानांतरित करण्यात आले. हेच कार्यालय पुन्हा अमरावतीत आणण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तहसील कार्यालय पुन्हा अमरावतीत आणण्याची मागणी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ठाकूर यांच्या निषेधार्थ भातकुलीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन केले.

भातकुलीच्या नागरिकांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध केला


25 नोव्हेंबर 2019 रोजी अमरावती शहरात असणारे भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याचे आदेश शासनाने पारित केले. यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा आणि नागरिक मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अडीच दिवसांच्या शासन काळात भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला नेण्याचा आदेश शासनाने पारित केला होता.

हेही वाचा - लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'

दरम्यान, भातकुली शहर जिल्ह्याच्या एका टोकावर आहे. त्यामुळे भातकुली तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांना तहसील कार्यालय हे भातकुलीऐवजी अमरावती असलेलेच सोयीचे आहे. या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक गावातील रहिवाशांनी निवेदन सादर केले होते. आता भातकुली तहसील कार्यालय पुन्हा एकदा दापोली येथून अमरावतीत हलवण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे भातकुली येथील रहिवाशांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत आले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भातकुली येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना भातकुलीच्या नागरिकांनी निवेदनही सादर केले आहे.

Intro:दोन महिन्यापूर्वी अमरावती येथून दापोलीला स्थानांतरित करण्यात आलेले भातकुली तहसील कार्यालय पुन्हा अमरावतीत अंतरित करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केल्याच्या निषेधार्थ आज भातकुलीवासियांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवला.


Body:25 नोव्हेंबर 2019 रोजी अमरावती शहरात असणारे भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली स्थानांतरित करण्याचे आदेश शासनाने पारित केल्यावर हे कार्यालय अमरावती येथून करण्यात आले. भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथे स्थांनातरीत करण्यासाठी बडनेरा चे आमदार रवी राणा गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न करीत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या शासन काळात भातकुली तहसील अमरावती येथून भातकुली लग्न करण्याचा आदेश शासनाने पारित केला होता. या आदेशानुसार भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून दापोलीला स्थानांतरित करण्यात आले. दरम्यान भातकूली हे गाव जिल्ह्याच्या एका टोकावर असल्याने भातकुली तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांना भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली ऐवजी अमरावती तसलेच सोयीचे असल्या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक गावातील रहिवाशांनी निवेदन सादर केले होते. आता भातकुली तहसील कार्यालय पुन्हा एकदा भातकुली येथून अमरावती हलविण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरु असल्यामुळे भातकुली येथील रहिवाशांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवित भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत आले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रीकांत राठी बाळा तळोकार यांच्यासह भातकुली येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना भातकुली वासियांनी निवेदनही सादर केले आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.