ETV Bharat / state

चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर

author img

By

Published : Jun 25, 2019, 6:20 PM IST

सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी विदर्भातील चिखलदराकडे महाराष्ट्रतील हजारो पर्यटक येतात.

चिखलधरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर

अमरावती - विदर्भाचे नंदवण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड हा महत्वाचा पॉइंट आहे. सुमारे 1 हजार 500 फूट खोल दरी आणि डोंगरावरून पडणारा धबधबा हे या पॉइंटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे मजबूत नसल्यामुळे आतापर्यंत अनेक पर्यटकांनी आपला जीव गमवला आहे. तरीही प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही.

चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर

सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी विदर्भातील चिखलदऱ्याकडे महाराष्ट्रतील हजारो पर्यटक येतात. त्यामुळे भीमकुंड या पॉइंटवरही पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी अनेकदा या ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडतात. तर कठडे नसल्यामुळे दरीत पडून अनेकांचा या ठिकाणी मृत्यू होतो. त्यामुळे या ठिकाणी कठडे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही.

अमरावती - विदर्भाचे नंदवण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड हा महत्वाचा पॉइंट आहे. सुमारे 1 हजार 500 फूट खोल दरी आणि डोंगरावरून पडणारा धबधबा हे या पॉइंटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे मजबूत नसल्यामुळे आतापर्यंत अनेक पर्यटकांनी आपला जीव गमवला आहे. तरीही प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही.

चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड पॉइंटवरील सुरक्षा वाऱ्यावर

सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी विदर्भातील चिखलदऱ्याकडे महाराष्ट्रतील हजारो पर्यटक येतात. त्यामुळे भीमकुंड या पॉइंटवरही पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी अनेकदा या ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडतात. तर कठडे नसल्यामुळे दरीत पडून अनेकांचा या ठिकाणी मृत्यू होतो. त्यामुळे या ठिकाणी कठडे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही.

Intro:आत्महत्या सारख्या अनेक गंभीर घटना घडूनही चिखलधऱ्यातील भीमकुंड पॉइंट वरील सुरक्षा वाऱ्यावर.

अमरावती अँकर
विदर्भाच नंदवण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलधरा या पर्यटन क्षेत्रातील महत्वाचा पॉइंट म्हणून म्हणून भीमकुंड हा पॉइंट याची ओळख आहे.सुमारे 1500 फूट  खोल दरी आणि खोल डोंगरावरून पडणारा धबधबा हे या पॉइंटचे प्रमुख  वैशिष्ट्य आहे.म्हणून नेहमी पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटकांचा कल या पॉइंट कडे असतो.परन्तु याच पॉइंट वर आतापर्यंत अनेक आत्महत्या सारख्या मौज मस्ती करण्याच्या नादात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

.मागील महिन्यातच या भीमकुंड दरीत एका दाम्पत्याने आत्महत्या केली होती.परन्तु ठोस उपाययोजना म्हणून प्रशासना कडून कुठलाही बंदोबस्त अद्याप करण्यात आला नाही.या ठिकाणी सुरक्षेच्या उद्देशाने लोखंडी कठडे नाहीत तर हा पाईन पर्यटकांचा आकर्षक असल्याने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे 

सध्या पावसाळ्याचा ऋतू आहे.निसर्गाच्या अदभूत खजिन्याने बहरलेल्या विदर्भातील चिखलधरा कडे महाराष्ट्रतील हजारो पर्यटक येतं असतात .चिखलधारा मधील भीमकुंड या पॉइट वर पर्यटकांची मोठी गर्दी होते .अशातच अनेकदा येथे आत्महत्या सारख्या घटना घडल्या असताना मात्र प्रशासन कडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो.या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सेल्फी फोटो घेण्यासाठी तरुण तरुणी आपला मोह आवरत नाही त्यामुळे याठिकाणी पोलिसांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तर या ठिकाणची सुरक्षितता धोक्यात येणार नाही

स्वप्निल P2PBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.