अमरावती : शिंदे फडवणीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले बच्चू कडूंची समजूत ( MLA Bacha Kadu has Expressed Happiness ) काढण्यात आली. त्यानंतरही ते नाराज ( Government Give Separate Ministry for Disabled ) असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली होती. पण, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याबाबतच्या निर्णयानंतर बच्चू कडू आनंदी झाले आहेत.
दिव्यांगांसाठी मंत्रालयाचा आनंद, आमदार बच्चू कडूंनी दिले स्पष्टीकरण : आमदार कडू म्हणाले की, राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी देण्यात आली आहे. देशातील अशा प्रकारचे पहिलेच मंत्रालय आहे. आपण कुणासाठी काम केले पाहिजे, असा एक मोठा संदेश देशात गेला आहे. आम्ही नेहमी म्हणायचो की, अर्थसंकल्पाचे पहिले पान ज्या दिवशी दिव्यांगांसाठी, विधवा महिलांसाठी, शेतकरी मजुरांसाठी आणि वंचितांसाठी लिहिले जाईल तेव्हा देशाचे बजेट सर्वात सुंदर असेल. असा अर्थसंकल्प देशाला सक्षम करणारा असेल. मला असे वाटते की मला मंत्रिपद न मिळाल्याचे दुःख आता मी विसरून गेलो आहे.
मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांनी मला शब्द दिला : नवीन सुखाची पाऊलवाट सुरू झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी मिळाली आहे. मला आत्मविश्वास आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्री बच्चू कडूच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्रिपद मिळणार असल्याने तुम्ही आनंदी आहात का, असे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिपद वगैरे चुलीत घाला, माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्त्वाचे नाही. मंत्री तर मी होणारच कारण एकनाथ शिंदेंनी शब्द दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितले आहे. पण, आधी सेवा करू दिव्यांगांच्या शेवटच्या घरापर्यंत सेवा देऊ. हे मंत्रालय केवळ मंत्रालयापुरते मर्यादित राहणार नाही. दिव्यांगांच्या उंबरठ्यावर जाऊन त्यांना सेवा देण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे आ. कडून यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.