ETV Bharat / state

खतांच्या दरवाढीविरोधात बच्चू कडू यांचे उद्या 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन

author img

By

Published : May 19, 2021, 7:01 PM IST

रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी आमदार बच्चू कडू त्यांनी केली आहे. या वाढत्या भावाच्या विरोधात ते अमरावतीमध्ये 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन करणार आहेत.

बच्चू कडू,आमदार
बच्चू कडू,आमदार

अमरावती - एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी पूरता डबघाईला आलेला आहे. त्यातच, आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आले आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून, उद्या सायंकाळी ते 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन करणार आहेत.

खतांच्या दर वाढ विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे उद्या 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन

'गावाच्या चौकात येऊन करणार आंदोलन'

रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. उद्या सायंकाळी सहा वाजता आपल्या घरीच गावाच्या चौकात येऊन प्रत्येक शेतकऱ्याने हे आंदोलन करण्याचे आवाहनही कडू यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केलेली आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, आता काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या रासायनिक खतांचे दर घोषित करण्यात आले आहेत. या वाढत्या खतांच्या किंमतींमुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

'रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करा'

शेतात शेतमालाचे नुकसान झालेले आहे. त्यात, लॉकडाउनचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात आहे. खतांच्या वाढत्या किंमतीने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासाठी शेतकरी नेते सध्या मागणी करत आहे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा - वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जूनपासून; अमित देशमुखांची माहिती

अमरावती - एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी पूरता डबघाईला आलेला आहे. त्यातच, आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आले आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून, उद्या सायंकाळी ते 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन करणार आहेत.

खतांच्या दर वाढ विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे उद्या 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन

'गावाच्या चौकात येऊन करणार आंदोलन'

रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. उद्या सायंकाळी सहा वाजता आपल्या घरीच गावाच्या चौकात येऊन प्रत्येक शेतकऱ्याने हे आंदोलन करण्याचे आवाहनही कडू यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केलेली आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, आता काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या रासायनिक खतांचे दर घोषित करण्यात आले आहेत. या वाढत्या खतांच्या किंमतींमुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

'रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करा'

शेतात शेतमालाचे नुकसान झालेले आहे. त्यात, लॉकडाउनचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात आहे. खतांच्या वाढत्या किंमतीने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासाठी शेतकरी नेते सध्या मागणी करत आहे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा - वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जूनपासून; अमित देशमुखांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.