ETV Bharat / state

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे लोकार्पण; मात्र, चव चाखणे टाळले

author img

By

Published : Jan 26, 2020, 6:48 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती शहरात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

अमरावती - प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती शहरात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी लाभार्थ्यांना थाळी वाढून दिली. मात्र, त्यांनी स्वतः शिवभोजनाची चव चाखली नाही.

हेही वाचा -VIDEO : कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताकदिनीच सचिवाला दिला चोप

शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीसह अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथील उपाहारगृह आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय येथे शिवभोजन थाळी योजनेचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शेतकरी उपाहारगृहात शिवभोजन थाळीचा शुभारंभ केला. त्यांनी स्वतः शिवभोजनाची थाळी वाढून लाभार्थ्यांना दिली. तसेच, उपाहार गृहाची पाहणी करून त्यांनी उपहारगृहात नियमित स्वच्छता राखून शुद्ध अन्नपदार्थ गरीब व गरजू व्यक्तींना देण्याच्या सूचना भोजनालयाच्या संचालकांना दिल्या. या वेळी, विभागीय आयुक्त सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर संचालक प्रफुल राऊत, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महिला वाणात देतात मातीचे भांडे

किमान समान कार्यक्रमातून होणार सर्वांगीण विकास - यशोमती ठाकूर

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत, रिक्त पदांची भरती, महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे मोफत शिक्षण आणि एक रुपयात उपचार, अशा योजना किमानसमान कार्यक्रमातून अंमलात आणल्या आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.


जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, विभागीय आयुक्त पियूष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस निरीक्षक डॉ. हरी बालाजी एन. हे उपस्थित होते.

ट्वीटरद्वारे व्यक्त केल्या भावना

  • १९८९-९० ला ज्या मैदानावर ध्वजसंचालनात विद्यार्थी म्हणून सहभागी झाले आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारतानाचा क्षण अतिशय भावुक होता. pic.twitter.com/wwI1M9LIX5

    — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

1989-90 साली ज्या मैदानावर ध्वज संचालनात विद्यार्थी म्हणून सामील झाले, आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारताना भावनिक क्षण होता, असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावती - प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती शहरात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी लाभार्थ्यांना थाळी वाढून दिली. मात्र, त्यांनी स्वतः शिवभोजनाची चव चाखली नाही.

हेही वाचा -VIDEO : कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताकदिनीच सचिवाला दिला चोप

शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीसह अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथील उपाहारगृह आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय येथे शिवभोजन थाळी योजनेचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शेतकरी उपाहारगृहात शिवभोजन थाळीचा शुभारंभ केला. त्यांनी स्वतः शिवभोजनाची थाळी वाढून लाभार्थ्यांना दिली. तसेच, उपाहार गृहाची पाहणी करून त्यांनी उपहारगृहात नियमित स्वच्छता राखून शुद्ध अन्नपदार्थ गरीब व गरजू व्यक्तींना देण्याच्या सूचना भोजनालयाच्या संचालकांना दिल्या. या वेळी, विभागीय आयुक्त सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर संचालक प्रफुल राऊत, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महिला वाणात देतात मातीचे भांडे

किमान समान कार्यक्रमातून होणार सर्वांगीण विकास - यशोमती ठाकूर

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत, रिक्त पदांची भरती, महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे मोफत शिक्षण आणि एक रुपयात उपचार, अशा योजना किमानसमान कार्यक्रमातून अंमलात आणल्या आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.


जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, विभागीय आयुक्त पियूष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस निरीक्षक डॉ. हरी बालाजी एन. हे उपस्थित होते.

ट्वीटरद्वारे व्यक्त केल्या भावना

  • १९८९-९० ला ज्या मैदानावर ध्वजसंचालनात विद्यार्थी म्हणून सहभागी झाले आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारतानाचा क्षण अतिशय भावुक होता. pic.twitter.com/wwI1M9LIX5

    — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

1989-90 साली ज्या मैदानावर ध्वज संचालनात विद्यार्थी म्हणून सामील झाले, आज त्याच मैदानावर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारताना भावनिक क्षण होता, असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

Intro:नैसर्गिक आपत्ती , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत, कर्जमुक्ती शेतमालाला भाव मिळवून देणाऱ्या योजना, दुष्काळग्रस्त भागात पाणी पोचून देणारी यंत्रणा,बेरोजगारांना रोजगार, रिक्त पदांची भरती. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, नोकरदार महिलांसाठी वस्तीगृह,गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे मोफ़त शिक्षण आणि एक रुपयात क्लिनीक अशा योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रमातून आमलात आणल्या आहेत. यायोजनांद्वारे सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याचे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.


Body:अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे,पोलिस आयुक्त संजय बाविस्कर,पोलिस निरिक्षक डॉ. हरी बालाजी एन. प्रमुख्याने उपस्थीत होते.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्रप्त पोलिस निरिक्षक निलिमा आरज आणि सदानंद मानकर यांच्यासह क्रिडा,आरोग्य आदी क्षेत्रात वैशिष्ठयपूर्ण कामगिरी वबजविणा-यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ज्या दाम्पत्याला केवळ एक मुलगी आहे अशा दाम्पत्यांचा ही सत्कार या सोहळ्यात यशोमती ठाकूर यांनी केला. अतिदक्षता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
पालकमंत्री म्हणून यशोमती ठाकुर यांनी मान वंदनास्विकारली.यावेळी,राज्य राखीव पोलिस दल,शहर आणि ग्रामीण पोलिसांसह वहातूक पोलिस,वन्ं विभागाचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना,स्काऊट,गाईडच्या विद्यर्थ्यनी पथसंचलन केले.आरोग्य विभाग,वन विभाग,अग्निशमन दल,राज्य परिवहन महामंडळ यांच्या वाहनचा ताफा या पथसंचलनात खास आकर्षण ठरले.
यशोमती ठाकुर यांनी मी राष्ट्रीय छात्र संघाची प्रमुख म्हणून याच मैदानावर तेव्हाच्या पालकमंत्र्यांना मानवंदना दिली होती असे म्हणतच टाळ्यांचा कडकडाट झाला.
जिल्ह्यातील श्रीसंत गाडगेबाबा स्मृती विकास आराखड्यात ऋणमोचन,शेडगाव, नागरवाडी,आणि आमला या चार तिर्थक्षेत्रंचा विकास होत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री क्षेत्र कौडण्यपर आणि आंबदेवीच्या दर्शनासाठी येनारया भाविकांना उत्तम सुविधा देण्यावर भर देण्यात येइल असेही पालकमंत्री म्हणाल्या.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.