अमरावती - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काल विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा परिसरातही गारपीटीने मोठे नुकसान झाले असतानाच आज पुन्हा एकदा मेळघाटातील काटकुंभ परिसरातील काटकुंभ, डोमा, बामादेही, कोयलारी, बगदरी, काजलडोह सह अनेक गावात तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळे गावात अक्षरशः गारीचा खच पडला होता. तर या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकाला जबर फटका बसला असून, गहु, हरबरा आणि मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 24 तारखेपर्यत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा -पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा
कर्नाटक ते पश्चिम मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वातावरणाच्या मधल्या थरात वाहणारे बाष्पयुक्त पश्चिमी वारे आणि खालच्या पातळीवर पूर्वेकडून वाहणारे वारे यांच्या संयोगातून विदर्भात 21 मार्चपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २४ तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही बंड यांनी वर्तवला.
हेही वाचा - उरी, पठाणकोट,व पुलवामा हल्ल्याचा काय तपास केला? सामनातून एनआयएला विचारणा