ETV Bharat / state

Govt Vidarbha College Amravati: अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयाने गाठली शंभरी, 'विद्यार्थी घडविणारी पंढरी' अशी ओळख

author img

By

Published : Apr 9, 2023, 5:35 PM IST

नामवंत प्राध्यापक यांना घडविणारे पश्चिम विदर्भातील अमरावती शहरात स्थित विदर्भ महाविद्यालय अर्थात आजच्या शासकीय ज्ञान, विज्ञान संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. इंग्रज शासन काळापासून आजपर्यंत अनेक चळवळी आणि इतिहासाची साक्ष देणारे हे महाविद्यालय केवळ पश्चिम विदर्भच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी एक मानाचे केंद्र आहे.

Govt Vidarbha College Amravati
शासकीय विदर्भ महाविद्यालयाची शंभरी
अमरावतीतील प्रसिद्ध शासकीय विदर्भ महाविद्यालय

अमरावती: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बेरार अर्थात वऱ्हाड प्रांतात एक महाविद्यालय असावे अशी मागणी त्या काळात पुढे आली. 1912 मध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि विदर्भातील नेते रावबहादूर रघुनाथ मुधोळकर यांनी विदर्भात उच्च शिक्षण देणारी एखादी संस्था असावी असा विचार मांडला. या कामात त्यांना मोरोपंत जोशी यांची साथ लाभली. 1910 मध्ये कायदेमंडळात रावबहादूर मुधोळकर यांनी अमरावतीत वाढत्या लोकसंख्येचा विचार करता महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी सरकार दरबारी केली. मध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रांतातील युवक त्या काळात उच्च शिक्षणासाठी वाराणस, मुंबई, लाहोर इत्यादी ठिकाणी जात असत. 1912 मध्ये नागपूरच्या मॉरीस कॉलेजकडे अमरावतीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. दरम्यान पहिल्या महायुद्धाच्या काळात बेरार प्रांताचे राज्यपाल फ्रांकलीन फ्लाय यांनी प्रस्तावित महाविद्यालयासाठी सार्वजनिक निधी उभारण्याचे आव्हान केले आणि किमान दोन लाख निधी उभा करण्याच्या अटीवर महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला; मात्र हा निधी पुरेसा नसल्यामुळे 1916 मध्ये रावबहादूर मुधोळकर यांनी या मागणी संदर्भात शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे असा ठराव मांडला मात्र तो मंजूर होऊ शकला नाही.

Govt Vidarbha College Amravati
महाविद्यालय परिसरातील सुशोभित उद्यान

अंतिम प्रस्ताव संमत: याच दरम्यान वऱ्हाड प्रांतात नवीन विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बेंजामिन रॉबर्ट सन यांनी अमरावती येथे महाविद्यालय सुरू करण्याची शिफारस केली आणि महाविद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा झाला सीपी अँड बेरार विद्यापीठ समितीने जबलपूर आणि अमरावती येथे एक महाविद्यालय व नागपूर येथे एक विद्यापीठ निर्मितीचा प्रस्ताव मांडला. अखेर नागपूरला 1000 आणि अमरावतीला 300 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व नागपूर येथे विद्यापीठ असा अंतिम प्रस्ताव संमत झाला.


यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाची स्थापना: 22 जानेवारी 1901 ते 6 मे 1910 या काळात इंग्लंडमध्ये किंग एडवर्ड सातवे हे ब्रिटिश साम्राज्याचे राजे होते. सहा मे 1910 ला त्यांची निधन झाले त्यावेळी भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्याने ते त्यावेळी भारताचे ही राजे होते म्हणून अमरावती प्रस्तावित महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. किंग एडवर्ड सातवे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 13 सप्टेंबर 1910 रोजी अमरावती येथील नागरिकांनी सभा आयोजित केली त्यावेळी राजाच्या स्मरणार्थ टाऊन हॉल किंवा पुतळा उभारण्याऐवजी शिक्षण संस्था स्थापण्याचा प्रस्ताव रावबहादुर मुधोळकर आणि मोरोपंत जोशी यांनी शासनाकडे मांडला. सरकारच्या म्हणण्यानुसार त्यावेळी एक लाख 29 हजार 913 रुपये लोक वर्गणीतून जमा करण्यात आले. 23 नोव्हेंबर 1918 रोजी तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड चे मुख्य आयुक्त सर बेंजामिन रॉबर्टसन यांच्या हस्ते किंग एडवर्ड कॉलेजच्या इमारतीची कोणसीला बसवून भूमिपूजन करण्यात आले. अमरावतीच्या या महाविद्यालयाला किंग एडवर्ड यांचे नाव द्यावे ह्या अटीवर ब्रिटिश सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आणि 13 लाख रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली. तत्कालीन राज्यपालांनी महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी मॅकलेन यांच्याकडे जबाबदारी सोपविधी त्यांनी शहरालगत 183 एकर जमीन निश्चित केली. त्यापैकी 51 एकर जमीन हे सरकारी पडीक जमीन होती तर उर्वरित जमीन ही शेतजमीन होती. त्या काळात शंभर रुपये प्रति एकर असा मोबदला शेतकऱ्यांना देऊन महाविद्यालयासाठी जमीन विकत घेण्यात आली. यासाठी 15 लाख खर्च आला होता.


1922 मध्ये उभी झाली इमारत: जुन्या पिढीतील कंत्राटदार रावसाहेब हिरणना यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली या महाविद्यालयाचे बांधकाम केले. अमरावती शहरात पूर्णतः काळ्या पाषाणात उन्हारण्यात आलेल्या किंग एडवर्ड कॉलेजची भव्य इमारत 1922 मध्ये उभी झाली. या इमारतीच्या दर्शनी भागावर रोमन अंकलीपीत MCM XXII असे कोरले आहे. या इमारतीत प्रवेश करताना बाहेर चार दगडी खांबांचा जो वरांडा आहे त्या चार पैकी एका खांबाकडे पाहून कोणी हळू आवाजात बोलले तर दुसऱ्या त्या व्यक्तीने बोलले शब्द मोठ्या आवाजात ऐकू येतात. तसेच मध्यभागी उभे राहून बोलणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आवाजाचा इको ऐकू येतो. सभागृहाच्या छताला अनेक ठिकाणी जाड तार बांधली आहेत. या सभागृहात मंचावरून बोलणाऱ्या व्यक्तीला माईकची गरज भासत नाही. मंचावर कोणी उभं राहून बोललं तर संपूर्ण सभागृहाला स्पष्ट आवाज ऐकू येईल असे तंत्र त्या तारांच्याद्वारे याठिकाणी निर्माण करण्यात आले आहे.


28 जुलै 1923 ला उदघाटन: अमरावती शहरात साकार झालेल्या ह्या भव्य इमारतीचे उद्घाटन 28 जुलै 1923 ला मध्य आणि वऱ्हाड प्रांताचे गव्हर्नर सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते आणि तत्कालीन शिक्षण मंत्री रावबहादूर नारायणराव केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दुर्दैवाने या महाविद्यालयासाठी प्रयत्न करणारे रावबहादूर मुधोळकर यांचे इमारतीच्या उद्घाटनाच्या दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. 25 जानेवारी 1925 ला किंग एडवर्ड सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि लोक वर्गणीतून जमा झालेला निधी या सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आला. तसेच या निधीच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे निश्चित करण्यात आले. पश्चिम विदर्भात स्थापन होत असलेल्या या पहिल्याच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेला विविध क्षेत्रातील नामवंतांनी आधार दिला. याच विदर्भाचे नवाब म्हणून ओळखले जाणारे नामवंत विधी तज्ज्ञ आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे, सर मोरोपंत जोशी, रावबहादुर भट, दिवाण बहादुर ब्रह्म, रामू खरे, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब खापर्डे, वाय.जी देशपांडे, न्यायाधीश मंगलमूर्ती, शिवाजीराव पटवर्धन, डॉ. रामराव देशमुख, ना. रा. बामनगावकर यांचा यात प्रामुख्याने समावेश होता.


83 विद्यार्थी आणि दहा प्राध्यापकांनी झाली सुरुवात: किंग एडवर्ड कॉलेजच्या पहिल्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात 1923 24 यावर्षी त्र्याऐंशी विद्यार्थी आणि दहा प्राध्यापकांपासून झाली या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य फॅब्रिक पॅरिस टोस्टेस्टविन हे होते.


असे आहे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य: 1950 च्या दशकात विदर्भ महाविद्यालयात मराठी गणित तत्त्वज्ञान आणि भूगोल या विषयात पदव्युत्तर वर्ग सुरू करण्यात आले. 1956 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र या चार विज्ञान शाखेतील विषयांचे पदव्युत्तर वर्ग सुरू करण्यात आले. 1962 मध्ये इंग्रजी संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र तर 1937 मध्ये संख्याशास्त्र 1968 मध्ये गृहविज्ञान इत्यादी विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात आली. विदर्भ महाविद्यालय आता शासकीय ज्ञान विज्ञान संस्था म्हणून ओळखले जाते. 17 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने विदर्भ ज्ञान संस्थेला दहा वर्षांसाठी स्वायत्त संस्था दर्जा प्रदान केला.

हेही वाचा: Sharad Pawar on CM Ayodhya Visit : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री मात्र अयोध्याला प्राधान्य देतात - शरद पवार

अमरावतीतील प्रसिद्ध शासकीय विदर्भ महाविद्यालय

अमरावती: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बेरार अर्थात वऱ्हाड प्रांतात एक महाविद्यालय असावे अशी मागणी त्या काळात पुढे आली. 1912 मध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि विदर्भातील नेते रावबहादूर रघुनाथ मुधोळकर यांनी विदर्भात उच्च शिक्षण देणारी एखादी संस्था असावी असा विचार मांडला. या कामात त्यांना मोरोपंत जोशी यांची साथ लाभली. 1910 मध्ये कायदेमंडळात रावबहादूर मुधोळकर यांनी अमरावतीत वाढत्या लोकसंख्येचा विचार करता महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी सरकार दरबारी केली. मध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रांतातील युवक त्या काळात उच्च शिक्षणासाठी वाराणस, मुंबई, लाहोर इत्यादी ठिकाणी जात असत. 1912 मध्ये नागपूरच्या मॉरीस कॉलेजकडे अमरावतीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. दरम्यान पहिल्या महायुद्धाच्या काळात बेरार प्रांताचे राज्यपाल फ्रांकलीन फ्लाय यांनी प्रस्तावित महाविद्यालयासाठी सार्वजनिक निधी उभारण्याचे आव्हान केले आणि किमान दोन लाख निधी उभा करण्याच्या अटीवर महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला; मात्र हा निधी पुरेसा नसल्यामुळे 1916 मध्ये रावबहादूर मुधोळकर यांनी या मागणी संदर्भात शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे असा ठराव मांडला मात्र तो मंजूर होऊ शकला नाही.

Govt Vidarbha College Amravati
महाविद्यालय परिसरातील सुशोभित उद्यान

अंतिम प्रस्ताव संमत: याच दरम्यान वऱ्हाड प्रांतात नवीन विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बेंजामिन रॉबर्ट सन यांनी अमरावती येथे महाविद्यालय सुरू करण्याची शिफारस केली आणि महाविद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा झाला सीपी अँड बेरार विद्यापीठ समितीने जबलपूर आणि अमरावती येथे एक महाविद्यालय व नागपूर येथे एक विद्यापीठ निर्मितीचा प्रस्ताव मांडला. अखेर नागपूरला 1000 आणि अमरावतीला 300 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व नागपूर येथे विद्यापीठ असा अंतिम प्रस्ताव संमत झाला.


यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाची स्थापना: 22 जानेवारी 1901 ते 6 मे 1910 या काळात इंग्लंडमध्ये किंग एडवर्ड सातवे हे ब्रिटिश साम्राज्याचे राजे होते. सहा मे 1910 ला त्यांची निधन झाले त्यावेळी भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्याने ते त्यावेळी भारताचे ही राजे होते म्हणून अमरावती प्रस्तावित महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. किंग एडवर्ड सातवे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 13 सप्टेंबर 1910 रोजी अमरावती येथील नागरिकांनी सभा आयोजित केली त्यावेळी राजाच्या स्मरणार्थ टाऊन हॉल किंवा पुतळा उभारण्याऐवजी शिक्षण संस्था स्थापण्याचा प्रस्ताव रावबहादुर मुधोळकर आणि मोरोपंत जोशी यांनी शासनाकडे मांडला. सरकारच्या म्हणण्यानुसार त्यावेळी एक लाख 29 हजार 913 रुपये लोक वर्गणीतून जमा करण्यात आले. 23 नोव्हेंबर 1918 रोजी तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड चे मुख्य आयुक्त सर बेंजामिन रॉबर्टसन यांच्या हस्ते किंग एडवर्ड कॉलेजच्या इमारतीची कोणसीला बसवून भूमिपूजन करण्यात आले. अमरावतीच्या या महाविद्यालयाला किंग एडवर्ड यांचे नाव द्यावे ह्या अटीवर ब्रिटिश सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आणि 13 लाख रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली. तत्कालीन राज्यपालांनी महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी मॅकलेन यांच्याकडे जबाबदारी सोपविधी त्यांनी शहरालगत 183 एकर जमीन निश्चित केली. त्यापैकी 51 एकर जमीन हे सरकारी पडीक जमीन होती तर उर्वरित जमीन ही शेतजमीन होती. त्या काळात शंभर रुपये प्रति एकर असा मोबदला शेतकऱ्यांना देऊन महाविद्यालयासाठी जमीन विकत घेण्यात आली. यासाठी 15 लाख खर्च आला होता.


1922 मध्ये उभी झाली इमारत: जुन्या पिढीतील कंत्राटदार रावसाहेब हिरणना यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली या महाविद्यालयाचे बांधकाम केले. अमरावती शहरात पूर्णतः काळ्या पाषाणात उन्हारण्यात आलेल्या किंग एडवर्ड कॉलेजची भव्य इमारत 1922 मध्ये उभी झाली. या इमारतीच्या दर्शनी भागावर रोमन अंकलीपीत MCM XXII असे कोरले आहे. या इमारतीत प्रवेश करताना बाहेर चार दगडी खांबांचा जो वरांडा आहे त्या चार पैकी एका खांबाकडे पाहून कोणी हळू आवाजात बोलले तर दुसऱ्या त्या व्यक्तीने बोलले शब्द मोठ्या आवाजात ऐकू येतात. तसेच मध्यभागी उभे राहून बोलणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आवाजाचा इको ऐकू येतो. सभागृहाच्या छताला अनेक ठिकाणी जाड तार बांधली आहेत. या सभागृहात मंचावरून बोलणाऱ्या व्यक्तीला माईकची गरज भासत नाही. मंचावर कोणी उभं राहून बोललं तर संपूर्ण सभागृहाला स्पष्ट आवाज ऐकू येईल असे तंत्र त्या तारांच्याद्वारे याठिकाणी निर्माण करण्यात आले आहे.


28 जुलै 1923 ला उदघाटन: अमरावती शहरात साकार झालेल्या ह्या भव्य इमारतीचे उद्घाटन 28 जुलै 1923 ला मध्य आणि वऱ्हाड प्रांताचे गव्हर्नर सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते आणि तत्कालीन शिक्षण मंत्री रावबहादूर नारायणराव केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दुर्दैवाने या महाविद्यालयासाठी प्रयत्न करणारे रावबहादूर मुधोळकर यांचे इमारतीच्या उद्घाटनाच्या दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. 25 जानेवारी 1925 ला किंग एडवर्ड सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि लोक वर्गणीतून जमा झालेला निधी या सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आला. तसेच या निधीच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे निश्चित करण्यात आले. पश्चिम विदर्भात स्थापन होत असलेल्या या पहिल्याच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेला विविध क्षेत्रातील नामवंतांनी आधार दिला. याच विदर्भाचे नवाब म्हणून ओळखले जाणारे नामवंत विधी तज्ज्ञ आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे, सर मोरोपंत जोशी, रावबहादुर भट, दिवाण बहादुर ब्रह्म, रामू खरे, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब खापर्डे, वाय.जी देशपांडे, न्यायाधीश मंगलमूर्ती, शिवाजीराव पटवर्धन, डॉ. रामराव देशमुख, ना. रा. बामनगावकर यांचा यात प्रामुख्याने समावेश होता.


83 विद्यार्थी आणि दहा प्राध्यापकांनी झाली सुरुवात: किंग एडवर्ड कॉलेजच्या पहिल्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात 1923 24 यावर्षी त्र्याऐंशी विद्यार्थी आणि दहा प्राध्यापकांपासून झाली या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य फॅब्रिक पॅरिस टोस्टेस्टविन हे होते.


असे आहे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य: 1950 च्या दशकात विदर्भ महाविद्यालयात मराठी गणित तत्त्वज्ञान आणि भूगोल या विषयात पदव्युत्तर वर्ग सुरू करण्यात आले. 1956 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र या चार विज्ञान शाखेतील विषयांचे पदव्युत्तर वर्ग सुरू करण्यात आले. 1962 मध्ये इंग्रजी संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र तर 1937 मध्ये संख्याशास्त्र 1968 मध्ये गृहविज्ञान इत्यादी विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात आली. विदर्भ महाविद्यालय आता शासकीय ज्ञान विज्ञान संस्था म्हणून ओळखले जाते. 17 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने विदर्भ ज्ञान संस्थेला दहा वर्षांसाठी स्वायत्त संस्था दर्जा प्रदान केला.

हेही वाचा: Sharad Pawar on CM Ayodhya Visit : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री मात्र अयोध्याला प्राधान्य देतात - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.