ETV Bharat / state

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची आत्महत्या; अमरावतीच्या ममदापूर येथील घटना - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आधी बोगस बियाणे, मग कुठे कमी पाऊस तर कुठे जास्त पाऊस, त्यात कपाशीवरील बोंडअळी तर सोयाबीनवर आलेल्या खोडकिडींमुळे शेतकरी संकटात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत आहे. पश्चिम विदर्भात मागील दहा महिन्यात ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

देवराव भाऊरावजी सांभारे
देवराव भाऊरावजी सांभारे
author img

By

Published : Nov 7, 2020, 2:54 PM IST

अमरावती - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून शेतकऱ्यांने आत्महत्या केली. जिल्ह्यातील ममदापूर या गावात घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे दोन्ही हंगामातील पीक गेल्यामुळे ते आर्थिक संकटात आले होते. परिणामी कर्जाचा आर्थिक बोजा वाढत होता. त्यामुळे हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

देवराव भाऊरावजी सांभारे (वय 53) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सांभारे यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे. यावर्षी दोन एकरमध्ये सोयाबीन व दोन एकरमध्ये कपाशीची लागवड केली होती. खोडकिडा व परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यांना केवळ तीन क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. कपाशी पिकाचे उत्पादन चांगले होईल, या आशेवर देवराव सांभारे होते. मात्र बोंडअळी आल्याने कपाशी सडली. त्यामुळे हातचे दोन्ही पीक गेल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, लोकांचे पैसे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी देवराव सांभारे होते. अखेर या विवंचनेत त्यांनी घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

सोयाबीन, कपाशीचे नुकसान...

यंदा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या मागे शुक्लकास्ट लागले आहे. आधी बोगस बियाणे, मग कुठे कमी पाऊस तर कुठे जास्त पाऊस, त्यात कपाशीवरील बोंडअळी तर सोयाबीन वर आलेल्या खोडकिडींमुळे शेतकरी संकटात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत आहे. पश्चिम विदर्भात मागील दहा महिन्यात ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हेही वाचा - #CORONA EFFECT : राज्यात आता 23 नोव्हेंबरनंतर नववी-बारावीचे वर्ग होणार सुरू

हेही वाचा - 6 हजारांची लाच घेतांना महावितरणच्या अभियंत्याला अटक

अमरावती - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून शेतकऱ्यांने आत्महत्या केली. जिल्ह्यातील ममदापूर या गावात घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे दोन्ही हंगामातील पीक गेल्यामुळे ते आर्थिक संकटात आले होते. परिणामी कर्जाचा आर्थिक बोजा वाढत होता. त्यामुळे हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

देवराव भाऊरावजी सांभारे (वय 53) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सांभारे यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे. यावर्षी दोन एकरमध्ये सोयाबीन व दोन एकरमध्ये कपाशीची लागवड केली होती. खोडकिडा व परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यांना केवळ तीन क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. कपाशी पिकाचे उत्पादन चांगले होईल, या आशेवर देवराव सांभारे होते. मात्र बोंडअळी आल्याने कपाशी सडली. त्यामुळे हातचे दोन्ही पीक गेल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, लोकांचे पैसे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी देवराव सांभारे होते. अखेर या विवंचनेत त्यांनी घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

सोयाबीन, कपाशीचे नुकसान...

यंदा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या मागे शुक्लकास्ट लागले आहे. आधी बोगस बियाणे, मग कुठे कमी पाऊस तर कुठे जास्त पाऊस, त्यात कपाशीवरील बोंडअळी तर सोयाबीन वर आलेल्या खोडकिडींमुळे शेतकरी संकटात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत आहे. पश्चिम विदर्भात मागील दहा महिन्यात ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हेही वाचा - #CORONA EFFECT : राज्यात आता 23 नोव्हेंबरनंतर नववी-बारावीचे वर्ग होणार सुरू

हेही वाचा - 6 हजारांची लाच घेतांना महावितरणच्या अभियंत्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.