ETV Bharat / state

अमरावती : शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण

author img

By

Published : May 21, 2021, 6:40 PM IST

एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात उत्तम कामगिरी केली, एखाद्या कार्यात त्याने विशेष प्राविण्य मिळवले, तर त्याच्या कामाची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अनेकदा मोठ्या मंचावर, हॉलमध्ये पार पडतो, या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या सर्व प्रकाराला फाटा देत, थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण

अमरावती - एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात उत्तम कामगिरी केली, एखाद्या कार्यात त्याने विशेष प्राविण्य मिळवले, तर त्याच्या कामाची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अनेकदा मोठ्या मंचावर, हॉलमध्ये पार पडतो, या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या सर्व प्रकाराला फाटा देत, थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात येत आहे.

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने आज राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट तिफणाची निर्मिती केल्याबद्दल जुनी भारवाडी येथील रहिवासी शेतकरी ज्ञानेश्वर डेहनकर यांच्यासह जिल्ह्यातील 15 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या हस्ते शेताच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी येथे एका शेताच्या बांधावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा सवाई, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, प्राध्यापक काळे माजी सरपंच सचिन राऊत यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण

'शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार'

समाजाच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी कायमचा जुंपलेला बळीराजा, आमचा पालक कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या कार्याची दखल घेतली पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी २१ मे रोजी शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना समोर आली. नेहमीच विपरीत परिस्थिती, कमी भांडवल उपलब्ध असताना देखील शेतकरी नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी "राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार" देण्यात येतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात येत आहे. अशी माहिती यावेळी प्रकाश साबळे यांनी दिली.

'या' शेतकऱ्यांना देण्यात आला पुरस्कार

आजच्या या सत्कार सोहळ्यात उत्कृष्ट महिला शेतकरी यांच्यासोबत संत्रा उत्पादक, वनस्पती रोप वाटिका शेतकरी, कृषी उद्योजक शेतकरी , कृषी विद्यार्थी, रेशीम उद्योग शेतकरी, कृषी मार्गदर्शक, कापूर उत्पादक शेतकरी, दुग्ध उत्पादक शेतकरी, हवामान शास्त्रज्ञ, हरभरा उत्पादक शेतकरी आणि उत्कृष्ट बैलजोडी मालक शेतकरी यांचा समावेश होतो.

हेही वाचा - पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान; जवान हुतात्मा

अमरावती - एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात उत्तम कामगिरी केली, एखाद्या कार्यात त्याने विशेष प्राविण्य मिळवले, तर त्याच्या कामाची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अनेकदा मोठ्या मंचावर, हॉलमध्ये पार पडतो, या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या सर्व प्रकाराला फाटा देत, थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात येत आहे.

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने आज राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट तिफणाची निर्मिती केल्याबद्दल जुनी भारवाडी येथील रहिवासी शेतकरी ज्ञानेश्वर डेहनकर यांच्यासह जिल्ह्यातील 15 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या हस्ते शेताच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी येथे एका शेताच्या बांधावर पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा सवाई, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, प्राध्यापक काळे माजी सरपंच सचिन राऊत यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे वितरण

'शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार'

समाजाच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी कायमचा जुंपलेला बळीराजा, आमचा पालक कौतुकास पात्र ठरतो. त्याच्या कार्याची दखल घेतली पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी २१ मे रोजी शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना समोर आली. नेहमीच विपरीत परिस्थिती, कमी भांडवल उपलब्ध असताना देखील शेतकरी नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी "राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार" देण्यात येतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात येत आहे. अशी माहिती यावेळी प्रकाश साबळे यांनी दिली.

'या' शेतकऱ्यांना देण्यात आला पुरस्कार

आजच्या या सत्कार सोहळ्यात उत्कृष्ट महिला शेतकरी यांच्यासोबत संत्रा उत्पादक, वनस्पती रोप वाटिका शेतकरी, कृषी उद्योजक शेतकरी , कृषी विद्यार्थी, रेशीम उद्योग शेतकरी, कृषी मार्गदर्शक, कापूर उत्पादक शेतकरी, दुग्ध उत्पादक शेतकरी, हवामान शास्त्रज्ञ, हरभरा उत्पादक शेतकरी आणि उत्कृष्ट बैलजोडी मालक शेतकरी यांचा समावेश होतो.

हेही वाचा - पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान; जवान हुतात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.