अमरावती - जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील वरूड-राजुरा बाजार मार्गावर एका शेताजवळ सकाळी साडेदहाच्या दरम्यान महिंद्रा गाडी व दुचाकीची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
हेही वाचा- भारतीय वायुसेनेला मिळाली तीन 'राफेल' विमाने, वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू
दुचाकीवर एक लहान मुलगी, मुलगा, नवरा -बायको असे चौघेजण प्रवास करत होते. प्रकाश सोनारे (वय ४५), जयश्री प्रकाश सोनारे (वय ४०), आयुष सोनारे (वय ११), वैष्णवी सोनारे (वय ५, रा. मालखेड),असे मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या दुचाकीला महिंद्रा गाडीची धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती, की दुचाकीवरील चौघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांची गर्दी झाली. घटनास्थळावर वरुड पोलीस दाखल होऊन त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.