ETV Bharat / state

कर्जमाफीच्या मुद्यावरुन बच्चू कडूंचा बँकांवर गंभीर आरोप

author img

By

Published : Feb 8, 2020, 10:02 PM IST

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन बँकांवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबामध्ये जाणून-बुजून बँका गडबडी करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केल्या आहेत.

Bachhu kadu  comment on bank for debt forgiveness
बच्चू कडू

अमरावती - राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन बँकांवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबामध्ये जाणून-बुजून बँका गडबडी करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे.

हेही वाचा - 'तुम्ही मोदींना माराल दंडे... तर आम्ही तुम्हाला फेकून मारू अंडे'

हेही वाचा - मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी

बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे की, सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

अमरावती - राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन बँकांवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबामध्ये जाणून-बुजून बँका गडबडी करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे.

हेही वाचा - 'तुम्ही मोदींना माराल दंडे... तर आम्ही तुम्हाला फेकून मारू अंडे'

हेही वाचा - मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी

बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे की, सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

Intro:राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये बँक गडबड करत असल्याचा बच्चू कडू यांचा धक्कादायक आरोप...

शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी बच्चू कडू यांच्या कडे दाखल
राज्य सरकार ला पाठवला अहवाल.
-------------------------------------------------------
अमरावती अँकर
राज्याचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीवरुन बँकांवर एक गंभीर आरोप केला आहे.. कर्जमाफी साठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबमध्ये जाणून-बुजून बँका गडबडी करत असल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केल्या आहे.. त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे.. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की, सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार आहे.. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे.. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले.. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे...Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.