ETV Bharat / state

अमरावतीत पारंपरिक शेतीला फाटा देत युवा शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग

पाण्याअभावी शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे म्हटलं जात आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावाच्या एका शेतकऱ्याने आपल्याकडील साडेसात एकर शेतीमध्ये केळीची बाग फुलवली आहे. या केळीच्या बागेतून शेतकऱ्याला वर्षाकाठी निवळ १८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

author img

By

Published : Jun 3, 2019, 8:52 AM IST

अभय महल्ले यांच्या शेतातील केळीचा घड

अमरावती - पाण्याअभावी शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे म्हटलं जात आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावाच्या एका शेतकऱ्याने आपल्याकडील साडेसात एकर शेतीमध्ये केळीची बाग फुलवली आहे. या केळीच्या बागेतून शेतकऱ्याला वर्षाकाठी निवळ १८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. अभय महल्ले असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी अभय महल्ले माहिती देताना....


अमरावती जिल्ह्यातील रेवसा तालुक्यातील अभय महल्ले यांच्याकडे वडिलोपार्जित एकूण १५ एकर शेती आहे. महल्ले यांचे वडील आजपर्यंत पारंपरिक शेती करत होते. मात्र, त्यानंतर अभय यांनी शेती कसायला सुरुवात केली. अभय यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग शेती करण्याचे ठरवले. रेवसा परिसरात बहुतांश शेतकरी हे भाजीपाला किंवा फुल शेतीच करतात. मात्र अभय यांनी साडे सात एकरावर टिशू कल्चर जातीच्या केळीची ११ हजार ००० झाडांची बेड पद्धतीने लागवड केली. त्यांनी ही लागवड १५ मे आणि १५ जून २०१८ अशा दोन वेगवेगळ्या तारखांना केली. या बागेला खत आणि पाण्याचे ठिबक सिंचनद्वारे उत्तम नियोजन केले. यामुळे सध्या प्रत्येक झाडाला ३० किलोपर्यंत वजनी घड लागलेला आहे.


केळी बागेसाठी अभय महल्ले यांना एकरी १ लाख रुपये लागवडीचा खर्च आला असून त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. लागवडीचा खर्च वजा करुन निवळ उत्पन्न १८ लाख रुपये अभय महल्ले यांना मिळेल असा अंदाज आहे. अभय यांना या शेतीसाठी नातेवाईक प्रशांत कराळे आणि तालुका कृषी अधिकारी अविनाश पांडे यांची मोलाची मदत मिळाली असल्याचे ते आवर्जून सांगतात. अभय यांनी फुलवलेल्या केळीच्या बागेला अनेक शेतकरी भेट देत आहेत.

अमरावती - पाण्याअभावी शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे म्हटलं जात आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावाच्या एका शेतकऱ्याने आपल्याकडील साडेसात एकर शेतीमध्ये केळीची बाग फुलवली आहे. या केळीच्या बागेतून शेतकऱ्याला वर्षाकाठी निवळ १८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. अभय महल्ले असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी अभय महल्ले माहिती देताना....


अमरावती जिल्ह्यातील रेवसा तालुक्यातील अभय महल्ले यांच्याकडे वडिलोपार्जित एकूण १५ एकर शेती आहे. महल्ले यांचे वडील आजपर्यंत पारंपरिक शेती करत होते. मात्र, त्यानंतर अभय यांनी शेती कसायला सुरुवात केली. अभय यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग शेती करण्याचे ठरवले. रेवसा परिसरात बहुतांश शेतकरी हे भाजीपाला किंवा फुल शेतीच करतात. मात्र अभय यांनी साडे सात एकरावर टिशू कल्चर जातीच्या केळीची ११ हजार ००० झाडांची बेड पद्धतीने लागवड केली. त्यांनी ही लागवड १५ मे आणि १५ जून २०१८ अशा दोन वेगवेगळ्या तारखांना केली. या बागेला खत आणि पाण्याचे ठिबक सिंचनद्वारे उत्तम नियोजन केले. यामुळे सध्या प्रत्येक झाडाला ३० किलोपर्यंत वजनी घड लागलेला आहे.


केळी बागेसाठी अभय महल्ले यांना एकरी १ लाख रुपये लागवडीचा खर्च आला असून त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. लागवडीचा खर्च वजा करुन निवळ उत्पन्न १८ लाख रुपये अभय महल्ले यांना मिळेल असा अंदाज आहे. अभय यांना या शेतीसाठी नातेवाईक प्रशांत कराळे आणि तालुका कृषी अधिकारी अविनाश पांडे यांची मोलाची मदत मिळाली असल्याचे ते आवर्जून सांगतात. अभय यांनी फुलवलेल्या केळीच्या बागेला अनेक शेतकरी भेट देत आहेत.

Intro:पाणी आणि खतांचे योग्य नियोजन करीत शेतकऱ्यांने  फुलविली केळीची बाग,निवळ उत्पन्न १८ लाख रु 

पॅकेज स्टोरी
_________________________________________
अमरावती अँकर
पाण्या अभावी  शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे सूर सर्व पातळीतून उमटत असतांना अमरावती जिल्ह्यातील रेवसा येथील अभय विलासराव  महल्ले या युवा शेतकऱ्याने आपल्या कडील साडेसात एकर शेती मध्ये केळीची बाग फुलविली आहे. या केळीच्या बागेतून अभय यांना  निवळ उत्पन्न १८ लाख रु मिळणार असून या शेती मध्ये त्यांना कृषी विभागाचं मोलाचं मार्गर्दर्शन मिळाले आहे .
Vo-1
अमरावती जिल्ह्यातील रेवसा तालुक्यातील अभय महल्ले यांच्या कडे वडिलोपार्जित एकूण १५ एकर शेती आहे महल्ले यांचे वडील आजपर्यंत पारंपरिक शेती करत होते मात्र त्यानंतर अभय यांनी शेती कसायला सुरुवात केली व पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी फळबाग शेती करण्याचं ठरवलं रेवसा परिसरात बहुतांश शेतकरी हे भाजीपाला किंवा फुल शेतीच  करतात मात्र अभय यांनी १५ मे आणि १५ जून २०१८ रोजी टिशू कल्चर केळीची ११००० झाडांची बेड पद्धतिने लागवड केली या सोबतच  खत आणि पाण्याच ठिबक व्दारे उत्तम नियोजन केले असल्याने सध्या प्रत्येक झाडाला ३० किलो पर्यंतचा घड लागलेला आहे.या शेती करीता महल्ले याना लागवडीचा खर्च एकरी १ लाख रुपये आला असून त्यांना २५ लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे खर्च वजा जाता निवळ उत्पन्न १८ लाख रु अभय महल्ले याना मिळणार आहे अभय याना या शेती करीता त्यांचे नातेवाईक प्रशांत कराळे व तालुका कृषी अधिकारी अविनाश पांडे यांची मोलाची मदत मिळाली असल्याचं हि ते आवर्जून सांगतात.

बाईट - अभय महल्ले [ केळी उत्पादक शेतकरी ]

VO-2
या केळी च्या बागेला ठिबक च्या माध्यमातून पाण्याचं योग्य नियोजन या सोबतच युरिया,पौटेश आणि फास्पोरस असिड ठिबक च्या माध्यमातून दिल तर दोन ते तीन वेळा त्यानी यावर फवारणी केलि आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन फळबाग शेती कडे वळावे या करीता कृषी विभागा मार्फत कार्यशाळेचे आयोजन हि महल्ले यांच्या शेतीवर करण्यात आले होते .

बाईट - अविनाश पांडे  - तालुका कृषी अधिकारी 

VO-3
अभय महल्ले यांनी रेवसा या गावात पहिल्यांदाच केळी च उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे त्यांचा हा नाविन्यपूर्ण शेती नक्कीच इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरेल आज अनेक शेतकरी महल्ले यांच्या शेतीला भेट देत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.