ETV Bharat / state

धुक्याने वेढले अमरावती शहर, वातावरणात गारठा

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वातावरणातील तापमानात घट झाली असून थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी अमरावतीवर धुक्याची चादर पसरली होती.

author img

By

Published : Jan 3, 2020, 12:20 PM IST

amravati
अमरावती

अमरावती - राज्यभरात थंडीचा जोर वाढला असतानाच पावसाने हजेरी लावली. वातावरणातील या बदलामुळे गुरुवारी सकाळी अमरावती धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, थंडी आणि पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडत असून या परिस्थितीत स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.

अमरावती शहर हरवले धुक्यात

कडाक्याची थंडी आणि पावसामुळे वातावरण पार बदलले असताना अमरावती शहर गुरुवारी सकाळी पूर्णतः धुक्याने वेढले गेले. शहराचा मध्यबिंदू असणारी मालटेकडी, वडाळी तलाव येथील टेकडीवर असणारा रेल्वेचा टॉवर धुक्यामुळे काही वेळ दिसेनासा झाला होता.

हेही वाचा - शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...

गेल्या ४ दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे तापमान १६ ते १७ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले असताना शहर आणि जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे.

कडाक्याच्या थंडीत कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसत असल्यामुळे वातावरणही रंगतदार झाले आहे. यातच, गुरुवारी पहाटे शहरात सर्वत्र धुके पसरल्यामुळे वातावरणातही वेगळीच रंगत पाहायला मिळाली. दरम्यान, दाट धुक्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याची चिन्हे असताना अचानक पडलेला पाऊस आणि गारपिठीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा - काकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार, दर्यापूर येथील प्रकार

अमरावती - राज्यभरात थंडीचा जोर वाढला असतानाच पावसाने हजेरी लावली. वातावरणातील या बदलामुळे गुरुवारी सकाळी अमरावती धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, थंडी आणि पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडत असून या परिस्थितीत स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.

अमरावती शहर हरवले धुक्यात

कडाक्याची थंडी आणि पावसामुळे वातावरण पार बदलले असताना अमरावती शहर गुरुवारी सकाळी पूर्णतः धुक्याने वेढले गेले. शहराचा मध्यबिंदू असणारी मालटेकडी, वडाळी तलाव येथील टेकडीवर असणारा रेल्वेचा टॉवर धुक्यामुळे काही वेळ दिसेनासा झाला होता.

हेही वाचा - शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...

गेल्या ४ दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे तापमान १६ ते १७ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले असताना शहर आणि जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे.

कडाक्याच्या थंडीत कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसत असल्यामुळे वातावरणही रंगतदार झाले आहे. यातच, गुरुवारी पहाटे शहरात सर्वत्र धुके पसरल्यामुळे वातावरणातही वेगळीच रंगत पाहायला मिळाली. दरम्यान, दाट धुक्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याची चिन्हे असताना अचानक पडलेला पाऊस आणि गारपिठीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा - काकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार, दर्यापूर येथील प्रकार

Intro:कडाक्याची थंडी आणि पावसामुळे वातावरण पार बदलले असताना अमरावती शहर आज पूर्णतः धुक्यांनी वेढले गेले. शहराचा मध्यबिंदू असणारी मालटेकडी, वडाळी तलाव येथील टेकडीवरील असणारा रेल्वेचा टावर धुक्यामुळे अक्षरशहा गुडूप झालेत.


Body:गेल्या चार दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. तापमान 16 ते 17 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले असताना शहर आणि जिल्ह्यात यात थंडीची लाट आहे. कडाक्याच्या थंडीत कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसात असल्यामुळे वातावरणही रंगतदार झाले आहे. या रंगतदार वातावरणात पहाटे अमरावती शहर डोक्यात मध्ये गुडूप झाले. सर्वत्र धोका पसरल्यामुळे शहरात सकाळच्या वेळेच्या वातावरणात वेगळीच रंगत पाहायला मिळते आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.