ETV Bharat / state

सोयाबीन बियाणाच्या थैली - बिलावर मारले जबाबदारीचे शिक्के; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

author img

By

Published : Jun 4, 2021, 8:51 AM IST

Updated : Jun 4, 2021, 12:48 PM IST

'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे शिक्के मारून कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाण्यांचे जात असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात शेतकरी आता संभ्रमावस्थेत आहेत.

stamped on soybean seed bags and bills in akola
अकोल्यात सोयाबीन बियाण्याच्या थैली व बिलावर मारले जबाबदारीचे शिक्के

अकोला - आधीच नैसर्गिक आपत्तीत त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ही मिळाला नाही. त्यात दरवर्षी सोयाबीन बियाणे पिकविल्यानंतर त्यातून उत्पन्न मिळत नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. अशातच तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाण्यांचे पोते देताना त्या पोत्यांवर 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे शिक्के मारून दिल्या जात असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात शेतकरी आता संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, याबाबत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाविरोधात कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहेत.

अकोल्यात सोयाबीन बियाण्याच्या थैली व बिलावर मारले जबाबदारीचे शिक्के

बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकरी हतबल -

निसर्गाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच वेळा बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामध्ये अनेक वेळा बियाणे खराब असल्याचे समोर येते. तर बऱ्याच वेळा खत निकृष्ट दर्जामुळे असल्याने शेतकऱ्यांची पिके खराब होतात. हजारो रुपये खर्च करून शेतात पीक उभे करताना शेतकरी हा पुरता कर्जाच्या डोंगरात बुडलेला असतो. घाम गाळून त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो पुरता हतबल होऊन जातो. अशा नानाविध संकटात शेतकरी तरीही शेती करतो.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम -

अशा परिस्थितीत जगत असताना कृषी सेवा केंद्र चालक मात्र शेतकऱ्यांना संभ्रमावस्थेत टाकत आहेत. तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने अजबच प्रकार केला आहे. या कृषी सेवा चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे देताना त्या बिलावर आणि त्या पोत्यावर शिक्के मारले आहेत. 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अद्याप कृषी सेवा केंद्र चालकाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही -

आधीच महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळत नसल्यामुळे विविध कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये कंपनीच्या बियाण्यांच्या संदर्भामध्ये कृषी सेवा केंद्र चालक अशाप्रकारे शिक्के मारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार यामधून दिसून येत आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये तेल्हारा तालुका कृषी अधिकारी यांना माहिती असतानाही त्यांनी हा प्रकार बंद केला. मात्र, संबंधित गणेश कृषी सेवा केंद्र चालकाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही.

पालकमंत्र्यांचे आदेश -

दरम्यान, या कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करण्याचे, आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरूवारी कृषी अधीक्षक यांना दिले आहेत. तसेच कृषी अधीक्षकांनी ही या संदर्भामध्ये तालुका कृषी अधिकारी यांना जाब विचारून संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात अहवालही सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांचा आरोप-

एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने शासन उभे असल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र कृषी विभाग शेतकऱ्यांच्या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांवर कुठलीही कारवाई करीत नसून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा; महाबीजच्या सोयाबीनचे दर 'जैसे थे'

अकोला - आधीच नैसर्गिक आपत्तीत त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा ही मिळाला नाही. त्यात दरवर्षी सोयाबीन बियाणे पिकविल्यानंतर त्यातून उत्पन्न मिळत नसल्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. अशातच तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाण्यांचे पोते देताना त्या पोत्यांवर 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे शिक्के मारून दिल्या जात असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात शेतकरी आता संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, याबाबत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाविरोधात कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहेत.

अकोल्यात सोयाबीन बियाण्याच्या थैली व बिलावर मारले जबाबदारीचे शिक्के

बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकरी हतबल -

निसर्गाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच वेळा बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामध्ये अनेक वेळा बियाणे खराब असल्याचे समोर येते. तर बऱ्याच वेळा खत निकृष्ट दर्जामुळे असल्याने शेतकऱ्यांची पिके खराब होतात. हजारो रुपये खर्च करून शेतात पीक उभे करताना शेतकरी हा पुरता कर्जाच्या डोंगरात बुडलेला असतो. घाम गाळून त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो पुरता हतबल होऊन जातो. अशा नानाविध संकटात शेतकरी तरीही शेती करतो.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम -

अशा परिस्थितीत जगत असताना कृषी सेवा केंद्र चालक मात्र शेतकऱ्यांना संभ्रमावस्थेत टाकत आहेत. तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने अजबच प्रकार केला आहे. या कृषी सेवा चालकाने शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे देताना त्या बिलावर आणि त्या पोत्यावर शिक्के मारले आहेत. 'सदर बियाणे हे मी माझ्या जबाबदारीवर नेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल'. असे नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अद्याप कृषी सेवा केंद्र चालकाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही -

आधीच महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळत नसल्यामुळे विविध कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये कंपनीच्या बियाण्यांच्या संदर्भामध्ये कृषी सेवा केंद्र चालक अशाप्रकारे शिक्के मारून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा प्रकार यामधून दिसून येत आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये तेल्हारा तालुका कृषी अधिकारी यांना माहिती असतानाही त्यांनी हा प्रकार बंद केला. मात्र, संबंधित गणेश कृषी सेवा केंद्र चालकाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही.

पालकमंत्र्यांचे आदेश -

दरम्यान, या कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करण्याचे, आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरूवारी कृषी अधीक्षक यांना दिले आहेत. तसेच कृषी अधीक्षकांनी ही या संदर्भामध्ये तालुका कृषी अधिकारी यांना जाब विचारून संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात अहवालही सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांचा आरोप-

एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने शासन उभे असल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र कृषी विभाग शेतकऱ्यांच्या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांवर कुठलीही कारवाई करीत नसून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा; महाबीजच्या सोयाबीनचे दर 'जैसे थे'

Last Updated : Jun 4, 2021, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.