ETV Bharat / state

स्टार्टअपमुळे नव व्यावसायिकांना मिळणार बाजारपेठ - पालकमंत्री डॉ. पाटील

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहामध्ये आयोजित स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते  बोलत होते.

author img

By

Published : Mar 3, 2019, 8:00 PM IST

डॉ. रणजीत पाटील

अकोला - नव व्यावसायिकांना आवश्यक असलेली बाजारपेठ व त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जिल्हा नाविन्यता परिषदेचे आयोजन हे उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज केले. यामुळे देशालाही नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

र्टअप इंडिया कार्यक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहामध्ये आयोजित स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या उपक्रमामुळे नवीन बाजारपेठ आणि नवीन व्यावसायिक तयार होत आहेत. त्यांनी तयार केलेले नव तंत्रज्ञान हे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे देशातील युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा सर्वांनी फायदा घेऊन आपले यश साध्य करावे, असेही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यावेळी म्हणाले.

डॉ. पाटील व इतर मान्यवरांनी सभागृहाच्या बाहेरील दालनात व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देत त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले महिलांसाठीचे उत्पादन, भुईमुग फोडण्यासाठी तयार असलेले यंत्र, सोलरवर चालणारे कुलरचे यंत्र, गजानन निलखन यांनी वन्य प्राण्यांना शेतातून तयार केलेले यंत्र, पेन्सिलच्या तुकड्यांचा उपयोगाचे प्रात्यक्षिक याची माहिती त्यांनी घेतली.

या स्टार्टअपच्या कार्यक्रमात ६० नवोदित व्यावसायिकांनी नोंदणी करून त्यांच्या या कल्पनांनी तयार करण्यात आलेल्या व्यवसायांचे चित्रीकरण यावेळी दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एम. भाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह काही व्यवसाय तसेच नागरिक उपस्थित होते.

undefined

अकोला - नव व्यावसायिकांना आवश्यक असलेली बाजारपेठ व त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जिल्हा नाविन्यता परिषदेचे आयोजन हे उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज केले. यामुळे देशालाही नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

र्टअप इंडिया कार्यक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहामध्ये आयोजित स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या उपक्रमामुळे नवीन बाजारपेठ आणि नवीन व्यावसायिक तयार होत आहेत. त्यांनी तयार केलेले नव तंत्रज्ञान हे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे देशातील युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा सर्वांनी फायदा घेऊन आपले यश साध्य करावे, असेही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यावेळी म्हणाले.

डॉ. पाटील व इतर मान्यवरांनी सभागृहाच्या बाहेरील दालनात व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देत त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले महिलांसाठीचे उत्पादन, भुईमुग फोडण्यासाठी तयार असलेले यंत्र, सोलरवर चालणारे कुलरचे यंत्र, गजानन निलखन यांनी वन्य प्राण्यांना शेतातून तयार केलेले यंत्र, पेन्सिलच्या तुकड्यांचा उपयोगाचे प्रात्यक्षिक याची माहिती त्यांनी घेतली.

या स्टार्टअपच्या कार्यक्रमात ६० नवोदित व्यावसायिकांनी नोंदणी करून त्यांच्या या कल्पनांनी तयार करण्यात आलेल्या व्यवसायांचे चित्रीकरण यावेळी दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एम. भाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह काही व्यवसाय तसेच नागरिक उपस्थित होते.

undefined
Intro:अकोला - नव व्यावसायिकांना आवश्यक असलेली बाजारपेठ व त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जिल्हा नावीन्यता परिषदेचे आयोजन हे उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज केले. यामुळे देशालाही नवी दिशा मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


Body:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहामध्ये आयोजित स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाच्या दरम्यान ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एम. भाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह काही व्यवसाय काही या मंचावर उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, या उपक्रमामुळे नवीन बाजारपेठ आणि नवीन व्यावसायिक हे तयार होत आहेत. त्यांनी तयार केलेले नव तंत्रज्ञान हे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे देशातील युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा सर्वांनी फायदा घेऊन आपले यश साध्य करावे, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी म्हटले.
तत्पूर्वी त्यांनी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांनी सभागृहाच्या बाहेरील दालनात व्यावसायिकांच्या स्टॉलला भेटी देत त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले महिलांसाठीचे प्रॉडक्ट, त्यासोबतच भुईमूग फोडण्यासाठी तयार असलेले यंत्र आणि सोलर वर चालणाऱ्या कुलरच्या यंत्राचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच गजानन निलखन यांनी वन्य प्राण्यांना शेतातून तयार केलेल्या यंत्राची त्यांनी माहिती घेतली. तसेच पेन्सिलच्या तुकड्यांपासून काय उपयोग होतो. याचेही प्रात्यक्षिक त्यांनी यावेळी पाहाले. या स्टार्टअपच्या कार्यक्रमात साठ नवोदित व्यावसायिकांनी नोंदणी करून त्यांच्या या कल्पनांनी तयार करण्यात आलेल्या व्यवसायांचे चित्रीकरण यावेळी दाखविण्यात आले. तसेच त्यांनी हा व्यवसाय कसा करता येतो, याची माहितीही दिली. या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते.


Conclusion:सूचना - या बातमी मधील व्हिडिओ पॅकेज करून पाठविला असून त्याला व्हाईस ओव्हर दिलेला आहे कृपया तो वापरावा, ही विनंती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.