ETV Bharat / state

कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे येथील नागरिकांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येसगाव तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Apr 21, 2019, 11:14 PM IST

तलावातील गाळ काढताना नागरिक

अहमदनगर - कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीदेखील नगरपालिका येसगावमधील तलावातील साचलेला गाळ काढण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुढाकार घेत तलावातील साचलेला गाळ काढण्यास सुरुवात केली.

पाणी प्रश्नाबाबत माहिती देताना नागरिक

कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे येणाऱ्या मे-जून महिन्यात मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. नगरपालिकेच्या साठवण तलावात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रशासनाने हा गाळ काढून घेण्याची मागणी काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने तलावाची पाहणी करून देखील याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काळेंसह शहरातील काही नागरिकांनी तलावाची पुजा करून हातात कुदळ-फावडे घेऊन तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली.

गोदावरी नदीच्या काठी असलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना आज १२ दिवसांआड पिण्याचे पाणी येत आहे. या समस्येबाबत तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहरातील विविध समाजबांधव आणि काही सामाजिक संस्थांच्या वतीने निवेदने दिली. मात्र, याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे काही दिवसात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला नाही, तर २९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा कोपरगाववासियांनी दिला आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाचा साचलेला गाळ काढून थोडीफार का होईना तळ्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली जाईल आणि कोपरगाव शहराला आज जेवढे पाणी मिळते त्यापेक्षा अधिक काळ पाणी मिळेल, या आशेने या कामाला सुरूवात केल्याची माहिती काळे यांनी दिली.

अहमदनगर - कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीदेखील नगरपालिका येसगावमधील तलावातील साचलेला गाळ काढण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुढाकार घेत तलावातील साचलेला गाळ काढण्यास सुरुवात केली.

पाणी प्रश्नाबाबत माहिती देताना नागरिक

कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे येणाऱ्या मे-जून महिन्यात मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. नगरपालिकेच्या साठवण तलावात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रशासनाने हा गाळ काढून घेण्याची मागणी काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने तलावाची पाहणी करून देखील याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काळेंसह शहरातील काही नागरिकांनी तलावाची पुजा करून हातात कुदळ-फावडे घेऊन तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली.

गोदावरी नदीच्या काठी असलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना आज १२ दिवसांआड पिण्याचे पाणी येत आहे. या समस्येबाबत तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहरातील विविध समाजबांधव आणि काही सामाजिक संस्थांच्या वतीने निवेदने दिली. मात्र, याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे काही दिवसात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला नाही, तर २९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा कोपरगाववासियांनी दिला आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाचा साचलेला गाळ काढून थोडीफार का होईना तळ्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली जाईल आणि कोपरगाव शहराला आज जेवढे पाणी मिळते त्यापेक्षा अधिक काळ पाणी मिळेल, या आशेने या कामाला सुरूवात केल्याची माहिती काळे यांनी दिली.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale


ANCHOR_ कोपरगाव नगरपालिकेचे येसगाव येथे असलेल्या पाणी साठवण तलावात साचलेला गाळ
काढण्यासाठी प्रशासन दूर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज पुढाकार घेत शहरातील काही नागरिकांनी साठवण तलावाचे पूजन करून साचलेला गाळ काढण्यास सुरुवात केलीय....


VO_ कोपरगाव शहराचा एप्रिल महिन्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने येणारा मे जून महिन्यात मोठी बिकट परीस्थित निर्माण होणार असल्याने कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलावात अनेक वर्षा पासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रशासनाने हा गाळ काढून घेण्याची मागणी संजय काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती मात्र स्थानक प्रशासनाने तलावाची पाहणी करून दुर्लक्ष करत असल्याने आज सामाजिक कार्यकर्ते संजय काळे सह शहरातील काही नागरिकांनी तलावाची पुजा करून हातात कुदळ पावडे घेऊन तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे....

VO_ गोदावरी नदीच्या काठी असलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना आज 12 दिवसाआड पिण्याचे पाणी येत असल्याने तहसीलदार,नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहरातील विविध समाजबांधवांच्या वतीने सामाजिक संस्थांच्या वतीने निवेदन दिली जात आहे की येणाऱ्या काही दिवसात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला नाही तर 29 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाखण्यात येणार आहेत..कोपरगावाचा पाणी प्रश्न चांगलाच शिगेला पोहचला आहे. तर शहरात पाणी बचाव समितीच्या माध्यमातून पाणी कसे वाचविण्यात येईल पाण्याची पातळी कशा प्रकारे वाढविण्यात येईल रेन वाटर हार्वेस्टिंगच्या माध्यामतून सर्व शहरातील नागरिकांनी रेन वाटर हार्वेस्टिंग चा प्रकल्प आपापल्या घाराजवळ शेतीवर करून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे पाणी बचाव समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे....

VO_ कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाचा साचलेला गाळ काढून थोडीफार का होईना तळ्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली जाईल व कोपरगाव शहराला आज ज्या पिण्यासाठी पाणी मिळते त्यापेक्षा अधिक काळ पाणी मिळेल मतदानावर बहिष्कार करण्यात येणार हा पाणी मिळविण्यासाठी एकमेव पर्याय नसल्याच सामाजिक कार्यकर्ते संजय काळे म्हंटलेय....येत्या २९ तारखेला मतदान करा ज्याला मतदान करायचे असेल त्यांनी मतदान करावं नोटा ला मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजवावा ज्याला मतदान करायचं नसेल त्याने सकाळी चार तास श्रमदानाने येसगाव येथील कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी साठवण तलावात साचलेला गाळ काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आवाहन केले आहे....Body:21 April Shirdi Kopargaon Nagarpalika Water Problem Conclusion:21 April Shirdi Kopargaon Nagarpalika Water Problem
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.