ETV Bharat / state

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात थोरात-विखेंची प्रतिष्ठा पणाला

श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने माजी साहित्यिक लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. कांबळे यांनी हाती शिवबंधन बांधले आणि सेनेने त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यांच्या बरोबर तालुक्यातील मुरकुटे यांची ताकद आहे. तर, नाराज ससाणे गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आता लहु कानडेंच्या पाठीशी आहेत.

author img

By

Published : Oct 16, 2019, 7:22 AM IST

Updated : Oct 16, 2019, 2:35 PM IST

श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाता थोरात-विखे प्रतिष्ठा पणाला

अहमदनगर - श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने माजी साहित्यिक लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी आघाडी आणि युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात थोरात-विखेंची प्रतिष्ठा पणाला

श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळेंना आमदारकीसाठी बळ दिले. मात्र, जयंत ससाणेंच्या अखेरच्यावेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ससाणे गटात नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत कांबळेंना त्यांच्याच मतदारसंघातुन कमी मते मिळाली होती. विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदलली होती. ती विधानसभेवेळीही पुन्हा एकदा बदलली आहे. आता भाऊसाहेब कांबळे यांनी हाती शिवबंधन बांधले आणि सेनेने त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यांच्या बरोबर तालुक्यातील विखे समर्थक आहेत. त्याचबरोबर, एकेकाळी विखेंचे विरोधक असलेले भानुदास मुरकुटे यांची ताकद आहे. कांबळेंना विखे-मुरकुटेंची साथ असली तरी ससाणे गट आणि शिवसेनेचा एक गट अद्यापही नाराज आहे. तरी, आपण केलेल्या विकासाच्या मुद्यावर कांबळे तालुका पिंजुन काढताय.

हेही वाचा - ...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत

भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. दरम्यान, गेल्या पाच-सात वर्षांपासुन श्रीरामपूर मतदार संघात संपर्क मजबूत करत साहित्यिक लहु कानडेंना बाळासाहेब थोरातांनी पक्षात घेत श्रीरामपुरातुन काँग्रेसची उमेदवारी दिली. नाराज ससाणे गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आता लहु कानडेंच्या पाठीशी आहेत. सुशीक्षित आणि सरकार दरबारी काम करवून घेण्याचे कसब असणारा उमेदवार हे मुद्दे घेवून कानडे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज

या मतदार संघात 11 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यात भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पक्ष), अशोकराव रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पक्ष), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), रामचंद्र नामदेव जाधव(अपक्ष), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर (अपक्ष) यांचा सावेश आहे. श्रीरामपुरात स्थानिक की बाहेरचा, शिक्षीत की अशिक्षीत अशा मुद्द्यांच्या आधारे प्रचाराचा धुराळा उडत असुन लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अहमदनगर - श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने माजी साहित्यिक लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी आघाडी आणि युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात थोरात-विखेंची प्रतिष्ठा पणाला

श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळेंना आमदारकीसाठी बळ दिले. मात्र, जयंत ससाणेंच्या अखेरच्यावेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे ससाणे गटात नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत कांबळेंना त्यांच्याच मतदारसंघातुन कमी मते मिळाली होती. विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदलली होती. ती विधानसभेवेळीही पुन्हा एकदा बदलली आहे. आता भाऊसाहेब कांबळे यांनी हाती शिवबंधन बांधले आणि सेनेने त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यांच्या बरोबर तालुक्यातील विखे समर्थक आहेत. त्याचबरोबर, एकेकाळी विखेंचे विरोधक असलेले भानुदास मुरकुटे यांची ताकद आहे. कांबळेंना विखे-मुरकुटेंची साथ असली तरी ससाणे गट आणि शिवसेनेचा एक गट अद्यापही नाराज आहे. तरी, आपण केलेल्या विकासाच्या मुद्यावर कांबळे तालुका पिंजुन काढताय.

हेही वाचा - ...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत

भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. दरम्यान, गेल्या पाच-सात वर्षांपासुन श्रीरामपूर मतदार संघात संपर्क मजबूत करत साहित्यिक लहु कानडेंना बाळासाहेब थोरातांनी पक्षात घेत श्रीरामपुरातुन काँग्रेसची उमेदवारी दिली. नाराज ससाणे गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आता लहु कानडेंच्या पाठीशी आहेत. सुशीक्षित आणि सरकार दरबारी काम करवून घेण्याचे कसब असणारा उमेदवार हे मुद्दे घेवून कानडे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज

या मतदार संघात 11 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यात भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पक्ष), अशोकराव रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पक्ष), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), रामचंद्र नामदेव जाधव(अपक्ष), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर (अपक्ष) यांचा सावेश आहे. श्रीरामपुरात स्थानिक की बाहेरचा, शिक्षीत की अशिक्षीत अशा मुद्द्यांच्या आधारे प्रचाराचा धुराळा उडत असुन लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉग्रेसने माजी अधिकारी आणि साहित्यिक लहू कानडे यांना उमेदवारी दिली आता या मतदारसंघात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी आघाडी आणि युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे....


VO_श्रीरामपूर मतदारसंघा हा राखीव झाल्या नंतर माजी आमदार जयंत ससाणे यांनी सर्व सामान्य मानुस असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना बळ देत त्यांना आमदार केल मात्र जयंत ससाणेंच्या अखेरच्या वेळी कांबळेंनी त्यांना साथ दिली नाही त्यामुळे ससाणे गटात नाराजी निर्माण झाली याचा परीनाम लोकसभा निवडणुकीतही झाला कांबळे हे कॉग्रेसचे उमेदवार होते त्यांना त्यांच्याच मतदारसंघातुन कमी मताधिक्य मिळाले होते....विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्या नंतर लोकसभेची राजकीय स्थिती बदलली होती ती पुन्हा आता विधानसभे वेळीही बदलली आहे..आता भाऊसाहेब कांबळे यांनी हाती शिवबंधन बांधले सेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या बरोबर तालुक्यातील विखे समर्थक आणि एकेकाळी विखेचे विरोधक असलेले भानुदास मुरकुटे विखेंच्या हातात हात घालत कांबळे बरोबर आले आहेत. कांबळे या वेळी पुन्हा या मतदार संघातुन आपल नशीब आजमवताय कांबळे बरोबर विखे मुरकुटेंची जरी ताकद असली तरी ससाणे गट आणि शिवसेनेचा एक गट नाराज आहे मात्र आपन केलेल्या तालुक्याच्या विकासाच्या मुद्यावर कांबळे तालुका पिंजुन काढताय....

BITE_ भाऊसाहेब कांबळे शिवसेना उमेदवार श्रीरामपुर

VO_भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉग्रेसची मोठी अडचण निर्माण झाली होती लोकसभेला कांबळेंना निवडुणआनन्या साठी प्रयत्न करणार्या कॉग्रेस पुढे मतदार संघातुन कोण उमेदवार द्यायचा प्रश्न होता मात्र गेल्या पाच सात वर्षा पासुन श्रीरामपुर मतदार संघात संपर्क ठेवुन असलेल्या माजी अधिकारी आणि साहीतीक लहु कानडेंना बाळासाहेब थोरातांनी पक्षात घेत श्रीरामपुरातुन कॉग्रेसची उमेदवारी दिली आहे. कांबळे सेनेत गेलेत राधाकूष्ण विखे त्यांना साथ देतायेत म्हणुन नाराज झालेल्या करण ससाणेंचा गट तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आता लहु कानडेना बळ देतायेत एक सुक्षीकशीत आणि सरकार दबारी काम करवुन घेण्याच कसब असेला उमेदवार तसेच तालुक्यातच भंडारदरा धरणातुन कमी होत चाललेल पाणी आणि मैनी आमदार हे प्रचाराचे मुद्दे घेवुन कानडे मैदानात उतरले आहेत....

BITE_ लहु कानडे कॉग्रेस उमेदवार श्रीरामपुर

VO_ या मतदार संघात 11 उमेदवार आपल नशीब अजमावतायेत यात भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),अमोलिक गोविंद बाबुराव (बहुजन समाज पार्टी , अशोकराव रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी) सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी) सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम) रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष) भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष) सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष)डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर (अपक्ष) यांचा सावेश आहे....श्रीरामपुरात स्थानिक उमेदवार कि बाहेरचा उमेदवार तसेच शिक्षीत की अक्षीत उमेदवार अश्या टँक लाईन घेवुन प्रचाराचा धुराळा उडत असुन
या मतदारसंघांतही चुरशी लढत होणार आहे.....
Body:mh_ahm_shirdi_kanade on kambale_15_pkg_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_kanade on kambale_15_pkg_visuals_bite_mh10010
Last Updated : Oct 16, 2019, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.