शिर्डी (अहमदनगर) - शिवजयंतीला नियमावली तयार करुन महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचविला आहे. मंत्र्यांच्याच मिरवणुका राज्यात बिनधास्तपणे सुरू आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना मात्र नियमावलीत अडकविले जातंय. महाविकास आघाडी सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा न करता ही नियमावली तातडीने मागे घेण्याची मागणी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार -
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आज आपल्या गावी लोणी येथे असताना प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले की, राज्यात वीज वितरण कंपनीने वीज तोडण्याचे सुरु केलेले काम म्हणजे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. राज्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना सरकारकडून वीज बिलांमध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु दिलासा सोडाच धाक दपटशाहीने सुरू केलेले वसुलीचे काम दुर्दैवी असून सरकारने केलेली घोषणा विसरलंय. सरकारने वीज तोडणी त्वरीत थांबवावी. अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला दिला.
शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का - विखे पाटील - राधाकृष्ण विखे-पाटील
शिवजयंतीला नियमावली तयार करुन महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना मात्र नियमावलीत अडकवले जातंय, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर केली आहे.
![शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का - विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil criticizes the state government](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10610756-154-10610756-1613208772002.jpg?imwidth=3840)
शिर्डी (अहमदनगर) - शिवजयंतीला नियमावली तयार करुन महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचविला आहे. मंत्र्यांच्याच मिरवणुका राज्यात बिनधास्तपणे सुरू आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना मात्र नियमावलीत अडकविले जातंय. महाविकास आघाडी सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा न करता ही नियमावली तातडीने मागे घेण्याची मागणी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार -
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आज आपल्या गावी लोणी येथे असताना प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले की, राज्यात वीज वितरण कंपनीने वीज तोडण्याचे सुरु केलेले काम म्हणजे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. राज्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना सरकारकडून वीज बिलांमध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु दिलासा सोडाच धाक दपटशाहीने सुरू केलेले वसुलीचे काम दुर्दैवी असून सरकारने केलेली घोषणा विसरलंय. सरकारने वीज तोडणी त्वरीत थांबवावी. अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला दिला.