ETV Bharat / state

'आरएसएस सारख्या अतिरेकी संघटनांच्या पाठीशी उभे राहायचे का? हे भारतीयांनीच ठरवावं'

वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ ते शेवगाव येथे आले असताना ते बोलत होते.

author img

By

Published : Apr 20, 2019, 8:17 AM IST

'आरएसएस सारख्या अतिरेकी संघटनांच्या पाठीशी उभे राहायचे का? हे भारतीयांनीच ठरवावं'

अहमदनगर- आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी इमानदार राहून ठरवले पाहिजे की, आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचे का? असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगर येथील शेवगाव येथे केले. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ ते शेवगाव येथे आले असताना ते बोलत होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्याच्या मुद्यावरुन आंबेडकर यांनी टीका केली. त्यांच्यासोबतच अशोक चव्हाणांवरही निशाणा साधला. अशोक चव्हाण यांनी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एकदा आम्हाला सत्ता द्या, या नेत्यांनी जेवढे खाल्ले आहे, तेवढे धुवुन काढू, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर

राज ठाकरेंवरही केली टीका -
प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टीका केली. सध्या राज ठाकरे हे विविध ठिकाणी सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमके कोणासाठी नाचत आहेत, अशी खोचक टीका आंबेकरांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. मात्र, छगन भुजबळ आणि ओवेसी आमच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढे ते मायनसमध्ये जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. एव्हढेच नाही तर, याचा फटका समीर भुजबळ यांनाही बसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अहमदनगर- आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी इमानदार राहून ठरवले पाहिजे की, आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचे का? असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगर येथील शेवगाव येथे केले. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ ते शेवगाव येथे आले असताना ते बोलत होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्याच्या मुद्यावरुन आंबेडकर यांनी टीका केली. त्यांच्यासोबतच अशोक चव्हाणांवरही निशाणा साधला. अशोक चव्हाण यांनी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एकदा आम्हाला सत्ता द्या, या नेत्यांनी जेवढे खाल्ले आहे, तेवढे धुवुन काढू, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर

राज ठाकरेंवरही केली टीका -
प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टीका केली. सध्या राज ठाकरे हे विविध ठिकाणी सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमके कोणासाठी नाचत आहेत, अशी खोचक टीका आंबेकरांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. मात्र, छगन भुजबळ आणि ओवेसी आमच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढे ते मायनसमध्ये जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. एव्हढेच नाही तर, याचा फटका समीर भुजबळ यांनाही बसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Intro:अहमदनगर- भारतीयांनी इमानदार राहून ठरवावं लागेल की आरएसएस सारख्या अतिरेकी संघटनांच्या पाठीशी उभे राहायचे का ..-प्रकाश आंबेडकर.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_20_april_ahm_trimukhe_1_p_ambedkar_press_v

अहमदनगर- भारतीयांनी इमानदार राहून ठरवावं लागेल की आरएसएस सारख्या अतिरेकी संघटनांच्या पाठीशी उभे राहायचे का ..-प्रकाश आंबेडकर.


अहमदनगर- आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी इमानदार राहून ठरवलं पाहिजे आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचं का..? अस  प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगर येथील शेवगाव येथे म्हटलं आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या भगवा आतंकवाद वक्तव्यावर आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ ते शेवगाव इथे आले असता माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्याच्या मुद्यावरून आंबेडकर यांनी टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर देखील शरसंधान साधले आहे. अशोक चव्हाण यांनी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आंबेडकरांनी केला असून एकदा आम्हाला सत्ता द्या या नेत्यांनी जेवढ खाल्लं आहे तेवढ धुऊन काढू अस म्हटल्यय.

राज ठाकरे नेमकं कुणाच्या लग्नात नाचताहेत..? -
-प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टीका केलीये. सध्या राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र लग्न नसताना राज ठाकरे नेमके कोणासाठी नाचतात अशी खोचक टीका आंबेकरांनी केलीये. छगन भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली होती. मात्र छगन भुजबळ आणि ओबीसी आमच्या विरोधात जेवढं बोलतील तेवढे ते मायनस मध्ये जातील असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी केले. एव्हढेच नाही तर तर याच फटका समीर भुजबळ यांना बसेल असेही मत आंबेडकरांनी व्यक्त केलंय.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.


.Conclusion:अहमदनगर- भारतीयांनी इमानदार राहून ठरवावं लागेल की आरएसएस सारख्या अतिरेकी संघटनांच्या पाठीशी उभे राहायचे का ..-प्रकाश आंबेडकर.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.