ETV Bharat / state

काँग्रेस व भाजपची धोरणे शेतकरी विरोधीच, त्यामुळेच दोघांच्या विरोधात लढत - रघुनाथदादा

मी हातकणंगलेमधून अपक्ष निवडणूक लढवत असून मला विजय मिळेल असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला.

author img

By

Published : Mar 29, 2019, 10:58 AM IST

रघुनाथदादा पाटील

अहमदनगर - काँग्रेस पक्षाची धोरणे शेतकरी विरोधी राहिल्यानेच देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आताचे मोदी सरकार पण तेच धोरण पुढे नेत असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे युती-आघाडी कडून शेतकऱ्यांचा-जनतेचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यामुळे आम्ही या दोन्हींच्या विरोधात लढत असल्याचे जेष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी अहमदनगर येथे सांगितले.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे

राज्यात २० उमेदवार रिंगणात उतरवण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. अहमदनगरमध्ये संजीव भोर हे प्रस्थापितांना हरवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगताना विरोधीपक्ष नेते मुलासाठी येथे कार्यरत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत असल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नव्हे तर कारखानदारांच्या बाजूने
साखरपट्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजू शेट्टी यांनी कारखानदारांशी आतून हातमिळवणी केली. त्यातून उभी राहिलेली शेतकरी चळवळ विभागली गेली. कारखानदारांच्या सोयीने निर्णय घेऊन आपण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत असल्याचे चित्र राजू शेट्टींनी भासवले. आता शेट्टी थेट आघाडीत सामील झाल्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. मात्र यावेळी त्यांचे काही खरे नाही. मी सुद्धा हातकणंगले मधून अपक्ष निवडणूक लढवत असून मला विजय मिळेल असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला. वंचित आघाडीशी आम्ही बोलणी केली होती मात्र आंबेडकरांना फक्त जातीचे राजकारण करायचे दिसत आहे. शेतकरी प्रश्न, अर्थ विषयक धोरण यावर ते काही बोलत नाहीत असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर - काँग्रेस पक्षाची धोरणे शेतकरी विरोधी राहिल्यानेच देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आताचे मोदी सरकार पण तेच धोरण पुढे नेत असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे युती-आघाडी कडून शेतकऱ्यांचा-जनतेचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यामुळे आम्ही या दोन्हींच्या विरोधात लढत असल्याचे जेष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी अहमदनगर येथे सांगितले.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे

राज्यात २० उमेदवार रिंगणात उतरवण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. अहमदनगरमध्ये संजीव भोर हे प्रस्थापितांना हरवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगताना विरोधीपक्ष नेते मुलासाठी येथे कार्यरत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत असल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नव्हे तर कारखानदारांच्या बाजूने
साखरपट्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजू शेट्टी यांनी कारखानदारांशी आतून हातमिळवणी केली. त्यातून उभी राहिलेली शेतकरी चळवळ विभागली गेली. कारखानदारांच्या सोयीने निर्णय घेऊन आपण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत असल्याचे चित्र राजू शेट्टींनी भासवले. आता शेट्टी थेट आघाडीत सामील झाल्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. मात्र यावेळी त्यांचे काही खरे नाही. मी सुद्धा हातकणंगले मधून अपक्ष निवडणूक लढवत असून मला विजय मिळेल असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला. वंचित आघाडीशी आम्ही बोलणी केली होती मात्र आंबेडकरांना फक्त जातीचे राजकारण करायचे दिसत आहे. शेतकरी प्रश्न, अर्थ विषयक धोरण यावर ते काही बोलत नाहीत असेही त्यांनी सांगितले.

Intro:अहमदनगर- काँग्रेसच्या धोरणाने शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या, मोदीही शेतकरी विरोधी म्हणून दोन्ही प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीत -रघुनाथ दादा पाटील, हातकणंगले मधून मला विजय मिळेल..


Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- काँग्रेसच्या धोरणाने शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या, मोदीही शेतकरी विरोधी म्हणून दोन्ही प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीत -रघुनाथ दादा पाटील, हातकणंगले मधून मला विजय मिळेल..

अहमदनगर- पंडित नेहरूंचे धोरणच शेतकरी विरोधी होते, काँग्रेसने तेच धोरण घेतल्याने शेतकरी आत्महत्या सुरू झाल्याचा आरोप जेष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी नगर इथे केला. आपण हातकणंगले येथून राजू शेट्टींच्या विरोधात लढत असून मला विजय मिळेल असा आशावाद रघुनाथ दादांनी ई टीव्ही भारत प्रतिनिधीशी बोलताना केला.

युती-आघाडी सारखीच- रघुनाथ दादा
-काँग्रेस पक्षाची धोरणे शेतकरी विरोधी राहिल्यानेच देशभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. आताचे मोदी सरकार पण तेच धोरण पुढे नेत असल्याने शेतकरी संकटात आहे. कर्जमाफी, दीडपट हमीभाव शेतकऱ्याला मिळालाच नाही. दुसरीकडे बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखवली जात आहे. त्यामुळे युती-आघाडी कडून शेतकऱ्यांचा-जनतेचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यामुळे आम्ही या दोन्हींच्या विरोधात लढत असल्याचे दादांनी सांगितले. राज्यात वीस उमेदवार रिंगणात उतरवण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. नगर मध्ये संजीव भोर हे प्रस्थापितांना हरवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगताना विरोधीपक्ष नेते मुलासाठी इथे कार्यरत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत असल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नव्हे तर कारखानदारांच्या बाजूने-
-साखर पट्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजू शेट्टी यांनी कारखानदारांशी आतून हाथमिळवणी केली. त्यातून उभी राहिलेली शेतकरी चळवळ विभागली गेली. कारखानदारांच्या सोयीने निर्णय घेऊन आपण शेतकऱयांचे प्रश्न सोडवत असल्याचे चित्र राजू शेट्टींनी भासवले. आता शेट्टी थेट आघाडीत सामील झाल्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. मात्र यावेळी त्यांचे काही खरे नाही. मी सुद्धा हातकणंगले मधून अपक्ष निवडणूक लढवत असून मला विजय मिळेल असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला.. वंचित आघाडीशी आम्ही बोलणी केली होती मात्र आंबेडकरांना फक्त जातीचे राजकारण करायचे दिसतेय, शेतकरी प्रश्न, अर्थ विषयक धोरण यावर ते काही बोलत नाहीत असेही त्यांनी सांगितले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.


Conclusion:अहमदनगर- काँग्रेसच्या धोरणाने शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या, मोदीही शेतकरी विरोधी म्हणून दोन्ही प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीत -रघुनाथ दादा पाटील, हातकणंगले मधून मला विजय मिळेल..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.