ETV Bharat / state

Hasan Mushrif on Governor's Statement : राज्यपालांसारख्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांबद्दल जबाबदारीने विधान करायला हवे - मंत्री हसन मुश्रीफ

रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते का, यावर विवाद असताना राज्यपाल पदावरील जबाबदार व्यक्तीने केलेले वक्तव्य करायला नको होते. ( Governor's Statement on Chhatrapati Shivaji Maharaj ) तसेच याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. ( Hasan Mushrif on Governor's Statement regarding Chhatrapati Shivaji Maharaj )

author img

By

Published : Mar 1, 2022, 6:00 PM IST

Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर - रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते का, यावर विवाद असताना राज्यपाल पदावरील जबाबदार व्यक्तीने केलेले वक्तव्य करायला नको होते. ( Governor's Statement on Chhatrapati Shivaji Maharaj ) तसेच याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. ( Hasan Mushrif on Governor's Statement regarding Chhatrapati Shivaji Maharaj )अहमदनगर इथे कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Minister Hasan Mushrif Corona Review Meeting Ahmednagar ) रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. सद्गुरू भेटले नसते तर शिवाजी महाराजांचे महत्त्व काय असते या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोशारी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यावर मुश्रीफ यांनी हे मत व्यक्त केले.

माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ

जिल्हा रुग्णालय जळीतकांड अहवाल -

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला नोव्हेंबर महिन्यात लागलेल्या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याबाबतचा विभागीय आयुक्त यांचा अहवाल आरोग्य मंत्री आणि पोलिसांकडे आला आहे. तो जनतेसाठी खुला करावा यासाठी आपण राजेश टोपे यांना विनंती करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन घेतला असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून लगेच जामिनावर मुक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - ED Summons Malik Son : नवाब मलिकांच्या मुलाने वेळ मागितल्याचे पत्र ईडीने नाकारले

मविआ'च्या मंत्र्यांवर वक्रदृष्टी -

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, जो कोणी भाजप वा केंद्र सरकार विरोधात बोलेले त्याच्यावर ईडी, सीबीआय धाडी घालत आहेत. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असे महाविकास आघाडीने ठरवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आता वाढला असल्याचे मुश्रीफ यांनी मत मांडले.

अहमदनगर - रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते का, यावर विवाद असताना राज्यपाल पदावरील जबाबदार व्यक्तीने केलेले वक्तव्य करायला नको होते. ( Governor's Statement on Chhatrapati Shivaji Maharaj ) तसेच याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. ( Hasan Mushrif on Governor's Statement regarding Chhatrapati Shivaji Maharaj )अहमदनगर इथे कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Minister Hasan Mushrif Corona Review Meeting Ahmednagar ) रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. सद्गुरू भेटले नसते तर शिवाजी महाराजांचे महत्त्व काय असते या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोशारी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यावर मुश्रीफ यांनी हे मत व्यक्त केले.

माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ

जिल्हा रुग्णालय जळीतकांड अहवाल -

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला नोव्हेंबर महिन्यात लागलेल्या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याबाबतचा विभागीय आयुक्त यांचा अहवाल आरोग्य मंत्री आणि पोलिसांकडे आला आहे. तो जनतेसाठी खुला करावा यासाठी आपण राजेश टोपे यांना विनंती करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन घेतला असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून लगेच जामिनावर मुक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - ED Summons Malik Son : नवाब मलिकांच्या मुलाने वेळ मागितल्याचे पत्र ईडीने नाकारले

मविआ'च्या मंत्र्यांवर वक्रदृष्टी -

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, जो कोणी भाजप वा केंद्र सरकार विरोधात बोलेले त्याच्यावर ईडी, सीबीआय धाडी घालत आहेत. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असे महाविकास आघाडीने ठरवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आता वाढला असल्याचे मुश्रीफ यांनी मत मांडले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.