अहमदनगर - नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद या परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक-कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ४ जण जागीच ठार झाले आहेत. अनिरुद्ध भुजबळ, शुभम खेडकर, असिफ पठाण, गोपीनाथ कुऱ्हाडे अशी मृत झालेल्या चौघांची नावे आहेत.
बुधवारी रात्री अडीचच्या सुमारास श्रीगोंदावरून नगरकडे येणाऱ्या कार आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली. या भीषण अपघातामध्ये कारचा चुराडा झाला असून यातील असलेल्या चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामधील तीन जण भिंगार लगत असलेल्या नागरदेवळे आणि वडारवाडी गावातील असून एक जण वाळकी येथील रहिवासी आहे. तर, वडारवाडी व नागरदेवळे येथील तिघे एकाचवेळी अपघातात गेल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - बाळासाहेब थोरातांच्या गडाला सुरुंग; खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश