ETV Bharat / sports

WTC Final: भारताने ICC कडे केली न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; जाणून घ्या कारण

author img

By

Published : Jun 16, 2021, 8:27 PM IST

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय व्यवस्थापनाने न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. विषय असा आहे की, न्यूझीलंडचे सहा खेळाडू हे बायो-बबल नियम मोडून गोल्फ खेळण्यासाठी गेले असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे.

new-zealand-players-breaches-covid-protocol-india-team-questions-icc
WTC Final: भारताने ICC कडे केली न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; जाणून घ्या कारण

साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. दोन्ही संघांनी मंगळवारी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. परंतु, त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघांमध्ये वेगळाच सामना रंगलेला पाहायला मिळत आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय व्यवस्थापनाने न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. विषय असा आहे की, न्यूझीलंडचे सहा खेळाडू हे बायो-बबल नियम मोडून गोल्फ खेळण्यासाठी गेले असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. या सहा खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, डॅरील मिचेल व फिजिओ टॉमी सिम्सेक यांचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'संघ व्यवस्थापनाकडून आम्हाला याबाबत माहिती मिळाली. आयसीसीने दोन्ही संघांसाठी सारखेच नियम तयार करायला हवेत. आयसीसी अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा आम्ही मांडला आहे.

दरम्यान, न्यूझीलंड व्यवस्थापनाने या वादावर, हॉटेलच्या आवारातच गोल्फ कोर्स असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. यावर आयसीसीनेही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कोणत्याच नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - WTC Final मध्ये तुझं काय होणार?, बोल्टने केली रोहितची स्लेजिंग

हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी केली तर टीम इंडियाची काय होणार अवस्था, बाँडचे भाकित

साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. दोन्ही संघांनी मंगळवारी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. परंतु, त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघांमध्ये वेगळाच सामना रंगलेला पाहायला मिळत आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय व्यवस्थापनाने न्यूझीलंडच्या सहा खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. विषय असा आहे की, न्यूझीलंडचे सहा खेळाडू हे बायो-बबल नियम मोडून गोल्फ खेळण्यासाठी गेले असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. या सहा खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, डॅरील मिचेल व फिजिओ टॉमी सिम्सेक यांचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'संघ व्यवस्थापनाकडून आम्हाला याबाबत माहिती मिळाली. आयसीसीने दोन्ही संघांसाठी सारखेच नियम तयार करायला हवेत. आयसीसी अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा आम्ही मांडला आहे.

दरम्यान, न्यूझीलंड व्यवस्थापनाने या वादावर, हॉटेलच्या आवारातच गोल्फ कोर्स असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. यावर आयसीसीनेही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कोणत्याच नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - WTC Final मध्ये तुझं काय होणार?, बोल्टने केली रोहितची स्लेजिंग

हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी केली तर टीम इंडियाची काय होणार अवस्था, बाँडचे भाकित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.