ETV Bharat / sports

IND vs AUS 3rd test match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3रा कसोटी सामना पिच रिपोर्ट जाणून घ्या - बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 मार्च रोजी म्हणजे आज सकाठी सुरू झाला आहे. आज सकाळी 9.30 वाजल्यापासून होळकर स्टेडियमवर हा सामना सुरू झाला आहे. या मैदानावर कसोटीत फलंदाजी करणे सोपे जाईल किंवा ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकेल. मॅच रिपोर्टपासून हवामान अपडेटपर्यंत जाणून घ्या.

IND vs AUS 3rd test match
पिच रिपोर्ट
author img

By

Published : Mar 1, 2023, 10:41 AM IST

नवी दिल्ली :बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्च रोजी म्हणजे आज सकाठी सुरू झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने याआधी नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या दोन सामन्यात कांगारूंचा पराभव केला होता. आता होळकर मैदानाच्या या पिचवर कसोटी सामन्यात फलंदाजी करणे खेळाडूंना कितपत सोपे जाईल हे पाहावे लागेल. ही पिच फिरकीपटूंसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते का? या पिचच्या रिपोर्टमधील आकडे काय सांगतात हे जाणून घ्या.

मैदानाची पिच कोणत्या संघासाठी उपयुक्त ठरेल ? : इंदूरच्या होळकर मैदानावर भारतीय संघाने अद्याप एकही कसोटी सामना गमावलेला नाही. होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये पहिली कसोटी झाली. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 130 धावांनी पराभव केला. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा या मैदानावर कसोटी सामना होणार आहे. आता या मैदानाची पिच कोणत्या संघासाठी उपयुक्त ठरेल, हे पाहावे लागेल.

इंदूरच्या पिचचा विक्रम कसा आहे ? : आकडेवारीनुसार या मैदानावर फलंदाजांना अधिक मदत मिळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यानुसार येथे विकेटवर धावा करणे खूप सोपे झाले आहे. होळकर मैदान क्रिकेटच्या कसोटी स्वरूपाच्या पहिल्या डावात 353 धावा करण्याची सरासरी आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे तीन गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी मिळून 14 बांगलादेशी फलंदाजांच्या विकेट घेतल्या.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पिच रिपोर्ट : आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या 4 कसोटी सामन्यांपैकी 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. कानपूरमधील पहिली कसोटी टीम इंडियाने जिंकली आहे. भारताने दिल्लीतील दुसरी कसोटी 6 गडी राखून जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरमध्ये सुरू झाला आहे.

पिच फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर : होळकर स्टेडियमची सुरुवात 2006 साली झाली असून या मैदानावर पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. तो वन डे सामना होता. होळकर स्टेडियममध्ये 30 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात. होळकर क्रिकेट स्टेडियम फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर आहे. लाल मातीने ही पिच बनलेली आहे. या पिचवर फलंदाजांना चांगली मदत मिळते.

हेही वाचा : Sachin Tendulkar Statue: वानखेडे स्टेडियमवर बसवणार सचिनचा पुतळा

नवी दिल्ली :बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्च रोजी म्हणजे आज सकाठी सुरू झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने याआधी नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या दोन सामन्यात कांगारूंचा पराभव केला होता. आता होळकर मैदानाच्या या पिचवर कसोटी सामन्यात फलंदाजी करणे खेळाडूंना कितपत सोपे जाईल हे पाहावे लागेल. ही पिच फिरकीपटूंसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते का? या पिचच्या रिपोर्टमधील आकडे काय सांगतात हे जाणून घ्या.

मैदानाची पिच कोणत्या संघासाठी उपयुक्त ठरेल ? : इंदूरच्या होळकर मैदानावर भारतीय संघाने अद्याप एकही कसोटी सामना गमावलेला नाही. होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये पहिली कसोटी झाली. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 130 धावांनी पराभव केला. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा या मैदानावर कसोटी सामना होणार आहे. आता या मैदानाची पिच कोणत्या संघासाठी उपयुक्त ठरेल, हे पाहावे लागेल.

इंदूरच्या पिचचा विक्रम कसा आहे ? : आकडेवारीनुसार या मैदानावर फलंदाजांना अधिक मदत मिळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यानुसार येथे विकेटवर धावा करणे खूप सोपे झाले आहे. होळकर मैदान क्रिकेटच्या कसोटी स्वरूपाच्या पहिल्या डावात 353 धावा करण्याची सरासरी आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे तीन गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी मिळून 14 बांगलादेशी फलंदाजांच्या विकेट घेतल्या.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पिच रिपोर्ट : आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या 4 कसोटी सामन्यांपैकी 2 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. कानपूरमधील पहिली कसोटी टीम इंडियाने जिंकली आहे. भारताने दिल्लीतील दुसरी कसोटी 6 गडी राखून जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरमध्ये सुरू झाला आहे.

पिच फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर : होळकर स्टेडियमची सुरुवात 2006 साली झाली असून या मैदानावर पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. तो वन डे सामना होता. होळकर स्टेडियममध्ये 30 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात. होळकर क्रिकेट स्टेडियम फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर आहे. लाल मातीने ही पिच बनलेली आहे. या पिचवर फलंदाजांना चांगली मदत मिळते.

हेही वाचा : Sachin Tendulkar Statue: वानखेडे स्टेडियमवर बसवणार सचिनचा पुतळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.