ETV Bharat / sports

Vijay Hazare Trophy: महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

महाराष्ट्र संघाचे विजय हजारे करंडक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राने यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पुदुच्चेरीवर १३७ धावांनी विजय मिळवला.

author img

By

Published : Mar 2, 2021, 6:20 AM IST

Vijay Hazare Trophy: Maharashtra defeated Puducherry by 137 runs
Vijay Hazare Trophy: महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

जयपूर - महाराष्ट्र संघाचे विजय हजारे करंडक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राने यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पुदुच्चेरीवर १३७ धावांनी विजय मिळवला. पण त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत पुदुच्चेरीसमोर ४ बाद ३३३ धावांचा डोंगर उभारला. नाहर आणि बावणे यांनी दुसऱ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी केली. नाहरने १२० चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर बावणेने ११५ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ११० धावा फटकावल्या. मधल्या फळीतील राहुल त्रिपाठीने नाबाद ५९ धावांची खेळी केली.

महाराष्ट्राने दिलेले हे आव्हान पुदुच्चेरीला पेलावले नाही. त्यांचा डाव ४३.२ षटकात १९६ धावांवर संपुष्टात आला. ४ बाद २१ अशा अवस्थेतून त्यांना शेल्डन जॅक्सन (४५) आणि आशिथ राजीव (३०) यांनी तारले. सागर त्रिवेदीने एका बाजूने नाबाद ७९ धावा करत किल्ला लढवला. पण तो देखील संघाचा पराभव टाळू शकला नाही. महाराष्ट्राकडून राजवर्धनने सर्वाधिक चार तर सत्यजीत बच्छाव व केदार जाधवने प्रत्येकी दोन बळी बाद केले.

जयपूर - महाराष्ट्र संघाचे विजय हजारे करंडक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राने यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पुदुच्चेरीवर १३७ धावांनी विजय मिळवला. पण त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत पुदुच्चेरीसमोर ४ बाद ३३३ धावांचा डोंगर उभारला. नाहर आणि बावणे यांनी दुसऱ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी केली. नाहरने १२० चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर बावणेने ११५ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ११० धावा फटकावल्या. मधल्या फळीतील राहुल त्रिपाठीने नाबाद ५९ धावांची खेळी केली.

महाराष्ट्राने दिलेले हे आव्हान पुदुच्चेरीला पेलावले नाही. त्यांचा डाव ४३.२ षटकात १९६ धावांवर संपुष्टात आला. ४ बाद २१ अशा अवस्थेतून त्यांना शेल्डन जॅक्सन (४५) आणि आशिथ राजीव (३०) यांनी तारले. सागर त्रिवेदीने एका बाजूने नाबाद ७९ धावा करत किल्ला लढवला. पण तो देखील संघाचा पराभव टाळू शकला नाही. महाराष्ट्राकडून राजवर्धनने सर्वाधिक चार तर सत्यजीत बच्छाव व केदार जाधवने प्रत्येकी दोन बळी बाद केले.

हेही वाचा - भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या गोटात महत्त्वाचे बदल

हेही वाचा - अश्विनला भारताच्या वनडे संघात घ्या, दिग्गज खेळाडूचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.