ETV Bharat / sports

भारतीय क्रिकेटपटू ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मैदानात उतरणार?

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांने ही माहिती दिली. ते म्हणाले, ''एकदा पावसाळा संपला की आम्ही तयारीचा विचार करत आहोत. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आम्ही खेळाडूंच्या पुनरागमनाचा विचार करत आहोत. हे खेळाडू लॉकडाऊनमध्येही आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहेत. "

author img

By

Published : Jun 2, 2020, 8:03 PM IST

The bcci is planning to set up camps in august september
भारतीय क्रिकेटपटू ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मैदानात उतरणार?

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे भारत सरकारने 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. मात्र, आता दोन महिन्यानंतर विविध अटींवर क्रीडाविषयक उपक्रम सुरू झाले आहेत. जगभरातही मार्गदर्शक सूचनांच्या अटींवर क्रीडा क्रियाकलाप सुरू करण्यात आले आहेत. अशातच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळाडूंसाठी शिबीर सत्राच्या आयोजनाचा विचार करत आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांने ही माहिती दिली. ते म्हणाले, ''एकदा पावसाळा संपला की आम्ही तयारीचा विचार करत आहोत. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आम्ही खेळाडूंच्या पुनरागमनाचा विचार करत आहोत. हे खेळाडू लॉकडाऊनमध्येही आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहेत. "

नॅशनल क्रिकेट अकादमी येथे शिबीर असू शकते का? असे विचारले असता अधिकारी म्हणाले, "हे सांगणे फार घाईचे होईल. आंतरराज्य वाहतुक सुरू झाल्यानंतर, गोष्टी कशा घडतील हे आपण पाहू आणि त्यानंतर निर्णय घेऊ."

बीसीसीआयने कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेवरही टांगती तलवार आहे. जर ही स्पर्धा स्थगित झाली तर, आयपील होऊ शकते अशी चर्चा जोर धरत आहे.

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे भारत सरकारने 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. मात्र, आता दोन महिन्यानंतर विविध अटींवर क्रीडाविषयक उपक्रम सुरू झाले आहेत. जगभरातही मार्गदर्शक सूचनांच्या अटींवर क्रीडा क्रियाकलाप सुरू करण्यात आले आहेत. अशातच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळाडूंसाठी शिबीर सत्राच्या आयोजनाचा विचार करत आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांने ही माहिती दिली. ते म्हणाले, ''एकदा पावसाळा संपला की आम्ही तयारीचा विचार करत आहोत. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आम्ही खेळाडूंच्या पुनरागमनाचा विचार करत आहोत. हे खेळाडू लॉकडाऊनमध्येही आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहेत. "

नॅशनल क्रिकेट अकादमी येथे शिबीर असू शकते का? असे विचारले असता अधिकारी म्हणाले, "हे सांगणे फार घाईचे होईल. आंतरराज्य वाहतुक सुरू झाल्यानंतर, गोष्टी कशा घडतील हे आपण पाहू आणि त्यानंतर निर्णय घेऊ."

बीसीसीआयने कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेवरही टांगती तलवार आहे. जर ही स्पर्धा स्थगित झाली तर, आयपील होऊ शकते अशी चर्चा जोर धरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.