ETV Bharat / sports

माझ्यामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले - विराट कोहली

author img

By

Published : Nov 26, 2019, 11:49 AM IST

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. त्या दावेदारीनुसार भारतीय संघाने खेळ सुध्दा केला. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखलं होतं. मात्र, फलंदाज अपयशी ठरल्याने, भारताचा १८ धावांनी पराभव झाला.

'That was my inner ego', Virat Kohli spills the beans on Team India's semi-final exit from 2019 World Cup
माझ्यामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले - विराट कोहली

नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करत गुणातालिकेत अव्वलस्थान पटकावलं आहे. मात्र, आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुध्द झालेला पराभव विराट अद्याप विसरू शकलेला नाही. त्याने माझ्या अहंकारामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले असल्याचे सांगत, विश्वकरंडकाच्या कटू आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. त्या दावेदारीनुसार भारतीय संघाने खेळ सुध्दा केला. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखलं होतं. मात्र, फलंदाज अपयशी ठरल्याने, भारताचा १८ धावांनी पराभव झाला.

उपांत्य फेरीतील सामन्यांच्या पराभवाबद्दल बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला, ' स्पर्धेतील एका सामन्यात तरी माझ्याकडून सर्वोत्तम खेळीची अपेक्षा व्यक्त होत होती. उपांत्य सामन्यात मी नाबाद राहीन, असा मला विश्वास होता, पण एका अर्थाने तो माझा अहंकार सिद्ध झाला.'

लोकेश, रोहीत आणि मी ठरावीक अंतराने बाद झालो यामुळे भारतावर दडपण वाढले. त्यानंतर ठराविक अंतरात भारतीय फलंदाज बाद होत गेले आणि भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले, असे विराट एका खासगी कार्यक्रमात म्हणाला.

हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीला आम्हाला द्या, 'या' क्रिकेट बोर्डाने केली बीसीसीआयकडे मागणी

हेही वाचा - पाकच्या गोलंदाजांनी टाकले तब्बल २१ नो बॉल.. पंचांचे दुर्लक्ष, मग काय आयसीसीने घेतला 'हा' निर्णय

नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करत गुणातालिकेत अव्वलस्थान पटकावलं आहे. मात्र, आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुध्द झालेला पराभव विराट अद्याप विसरू शकलेला नाही. त्याने माझ्या अहंकारामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले असल्याचे सांगत, विश्वकरंडकाच्या कटू आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. त्या दावेदारीनुसार भारतीय संघाने खेळ सुध्दा केला. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखलं होतं. मात्र, फलंदाज अपयशी ठरल्याने, भारताचा १८ धावांनी पराभव झाला.

उपांत्य फेरीतील सामन्यांच्या पराभवाबद्दल बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला, ' स्पर्धेतील एका सामन्यात तरी माझ्याकडून सर्वोत्तम खेळीची अपेक्षा व्यक्त होत होती. उपांत्य सामन्यात मी नाबाद राहीन, असा मला विश्वास होता, पण एका अर्थाने तो माझा अहंकार सिद्ध झाला.'

लोकेश, रोहीत आणि मी ठरावीक अंतराने बाद झालो यामुळे भारतावर दडपण वाढले. त्यानंतर ठराविक अंतरात भारतीय फलंदाज बाद होत गेले आणि भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले, असे विराट एका खासगी कार्यक्रमात म्हणाला.

हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीला आम्हाला द्या, 'या' क्रिकेट बोर्डाने केली बीसीसीआयकडे मागणी

हेही वाचा - पाकच्या गोलंदाजांनी टाकले तब्बल २१ नो बॉल.. पंचांचे दुर्लक्ष, मग काय आयसीसीने घेतला 'हा' निर्णय

Intro:Body:

spo


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.