ETV Bharat / sports

Vijay Hazare Trophy : शार्दुलची वादळी खेळी, मुंबईचा हिमाचलसमोर धावांचा डोंगर

शार्दुल ठाकूरने विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज खेळी केली. त्याने ५७ चेंडूत ९२ धावांची खेळी साकारली. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.

author img

By

Published : Mar 1, 2021, 3:11 PM IST

Updated : Mar 1, 2021, 4:52 PM IST

shardul-thakur-scored-92-runs-in-just-57-balls-vs-himachal-pradesh-vijay-hazare-trophy
vijay hazare trophy : शार्दुलची वादळी खेळी, मुंबईचा हिमाचलसमोर धावांचा डोंगर

जयपूर - शार्दुल ठाकूरने विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज खेळी केली. त्याने ५७ चेंडूत ९२ धावांची खेळी साकारली. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. शार्दुलचे शतक फक्त ८ धावांनी हुकलं. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईने हिमाचल प्रदेशसमोर ३२१ धावांचा डोंगर उभारला.

मुंबईने प्रथम फलंदाजी केली. तेव्हा मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वाल (२), पृथ्वी शॉ (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२) हे अपयशी ठरल्यानंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने मुंबईची पडझड रोखली. त्याने सर्फराज खानसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. सर्फराजचा अडथळा जसवालने दूर केला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

सूर्यकुमार यादव डागरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७५ चेंडूत १५ चौकारासह ९१ धावांची खेळी केली. मुंबईची अवस्था ३०.४ षटकात ५ बाद १४८ अशी झाली. तेव्हा आदित्य तारेने शार्दुलसोबत जोडी जमवत आक्रमक फलंदाजी केली. आदित्य ९८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ८३ धावांची खेळी केली. तर शार्दुलने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारासह ९२ धावा तडकावल्या. यापैकी ६० धावा त्याने चौकार (६) व षटकार (६) खेचून अवघ्या १२ चेंडूंत वसूल केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ९ बाद ३२१ धावांचा डोंगर उभा केला.

जयपूर - शार्दुल ठाकूरने विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज खेळी केली. त्याने ५७ चेंडूत ९२ धावांची खेळी साकारली. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. शार्दुलचे शतक फक्त ८ धावांनी हुकलं. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईने हिमाचल प्रदेशसमोर ३२१ धावांचा डोंगर उभारला.

मुंबईने प्रथम फलंदाजी केली. तेव्हा मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वाल (२), पृथ्वी शॉ (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२) हे अपयशी ठरल्यानंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने मुंबईची पडझड रोखली. त्याने सर्फराज खानसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. सर्फराजचा अडथळा जसवालने दूर केला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

सूर्यकुमार यादव डागरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७५ चेंडूत १५ चौकारासह ९१ धावांची खेळी केली. मुंबईची अवस्था ३०.४ षटकात ५ बाद १४८ अशी झाली. तेव्हा आदित्य तारेने शार्दुलसोबत जोडी जमवत आक्रमक फलंदाजी केली. आदित्य ९८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ८३ धावांची खेळी केली. तर शार्दुलने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारासह ९२ धावा तडकावल्या. यापैकी ६० धावा त्याने चौकार (६) व षटकार (६) खेचून अवघ्या १२ चेंडूंत वसूल केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ९ बाद ३२१ धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा - IND vs ENG : अखेरच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा कस्सून सराव

हेही वाचा - IND VS ENG : रोहित शर्माने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना केलं ट्रोल

Last Updated : Mar 1, 2021, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.