ETV Bharat / sports

AUS VS IND : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची हाराकिरी; पाँटिंगने सुनावलं

author img

By

Published : Dec 28, 2020, 9:41 PM IST

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीला दोष देऊ शकत नाहीत. कारण खेळपट्टी एकदम परिपूर्ण होती. चेंडू थोडासा वळत होता. पण तुम्ही हे अगोदरपासून ग्रहित धरलेले असता. कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी केलेले हे प्रदर्शन खराब फलंदाजीचे एक उदाहरण आहे, असे रिकी पाँटिंगने सांगितलं.

RICKY PONTING DISAPPOINTED WITH AUSTRALIA S BATTING
AUS VS IND : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची हाराकिरी; पाँटिंगने सुनावलं

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर आहे. यावरून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सुनावलं आहे. त्याने, एमसीजीची खेळपट्टीमध्ये कोणताही दोष नव्हता. तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले, असे म्हटलं आहे.

भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावात ६ गडी बाद १३३ अशी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडे २ धावांची आघाडी असून त्यांचे ४ गडी शिल्लक आहेत.

पाँटिंग म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीला दोष देऊ शकत नाहीत. कारण खेळपट्टी एकदम परिपूर्ण होती. चेंडू थोडासा वळत होता. पण तुम्ही हे अगोदरपासून ग्रहित धरलेले असता. कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी केलेले हे प्रदर्शन खराब फलंदाजीचे एक उदाहरण आहे.'

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजाविरोधात समर्थपणे खेळले नाहीत. यामुळे ते खराब शॉटवर बाद झाले. धावफलक हलता ठेवण्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अपयश आले. यामुळे दडपण वाढत गेले. या दडपणामुळे खराब शॉट फलंदाजांनी खेळलं, असे देखील पाँटिंग म्हणाला.

भारताच्या पहिल्या डावात ३२६ धावा -

भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावा केल्या आहेत. यात कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार शतक झळकावले. वैयक्तिक ११२ धावांवर अजिंक्य रहाणे धावबाद झाला. रविंद्र जडेजाने अर्धशतक झळकावले.

हेही वाचा - AUS VS IND : सलामीवीर मॅथ्यू वेड याने केले भारतीय गोलंदाजांचे कौतूक, म्हणाला...

हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर आहे. यावरून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सुनावलं आहे. त्याने, एमसीजीची खेळपट्टीमध्ये कोणताही दोष नव्हता. तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले, असे म्हटलं आहे.

भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावात ६ गडी बाद १३३ अशी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडे २ धावांची आघाडी असून त्यांचे ४ गडी शिल्लक आहेत.

पाँटिंग म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीला दोष देऊ शकत नाहीत. कारण खेळपट्टी एकदम परिपूर्ण होती. चेंडू थोडासा वळत होता. पण तुम्ही हे अगोदरपासून ग्रहित धरलेले असता. कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी केलेले हे प्रदर्शन खराब फलंदाजीचे एक उदाहरण आहे.'

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजाविरोधात समर्थपणे खेळले नाहीत. यामुळे ते खराब शॉटवर बाद झाले. धावफलक हलता ठेवण्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अपयश आले. यामुळे दडपण वाढत गेले. या दडपणामुळे खराब शॉट फलंदाजांनी खेळलं, असे देखील पाँटिंग म्हणाला.

भारताच्या पहिल्या डावात ३२६ धावा -

भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावा केल्या आहेत. यात कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार शतक झळकावले. वैयक्तिक ११२ धावांवर अजिंक्य रहाणे धावबाद झाला. रविंद्र जडेजाने अर्धशतक झळकावले.

हेही वाचा - AUS VS IND : सलामीवीर मॅथ्यू वेड याने केले भारतीय गोलंदाजांचे कौतूक, म्हणाला...

हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.