ETV Bharat / sports

U-१९ महामुकाबला : युवा टीम इंडियाची पाचव्या विजेतेपदावर नजर

author img

By

Published : Feb 9, 2020, 11:58 AM IST

Updated : Feb 9, 2020, 12:14 PM IST

U-१९ महामुकाबला : युवा टीम इंडियाची पाचव्या विजेतेपदावर नजर

LIVE Score, India vs Bangladesh, ICC Under-19 World Cup Final: India Face Bangladesh With Eyes On 5th Title
U-१९ महामुकाबला : युवा टीम इंडियाची पाचव्या विजेतेपदावर नजर

पोटशेफस्ट्रूम - भारत आणि बांगलादेश यांच्या युवा संघात विश्व करंडक स्पर्धेचा (१९ वर्षांखालील) अंतिम सामना काही वेळात खेळला जाणार आहे. गतविजेता भारतीय संघ या सामन्यासह पाचव्यांदा करंडक उंचावण्यासाठी उत्सुक आहे.

भारतीय युवा संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघही फुल्ल फॉर्मात आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे.

आतापर्यंत झालेल्या १३ युवा विश्व करंडकापैकी सर्वाधिक चार वेळा भारताने विजेतेपद, तर दोनदा उपविजेतेपद आणि दोनदा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच २०१८ च्या युवा विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.

हेही वाचा - U-१९ महामुकाबला : युवा टीम इंडियाची पाचव्या विजेतेपदावर नजर

हेही वाचा - संथगतीचा भारताप्रमाणे न्यूझीलंडलाही फटका; खेळाडूंच्या ६० टक्के मानधनावर कात्री

पोटशेफस्ट्रूम - भारत आणि बांगलादेश यांच्या युवा संघात विश्व करंडक स्पर्धेचा (१९ वर्षांखालील) अंतिम सामना काही वेळात खेळला जाणार आहे. गतविजेता भारतीय संघ या सामन्यासह पाचव्यांदा करंडक उंचावण्यासाठी उत्सुक आहे.

भारतीय युवा संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघही फुल्ल फॉर्मात आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे.

आतापर्यंत झालेल्या १३ युवा विश्व करंडकापैकी सर्वाधिक चार वेळा भारताने विजेतेपद, तर दोनदा उपविजेतेपद आणि दोनदा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच २०१८ च्या युवा विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.

हेही वाचा - U-१९ महामुकाबला : युवा टीम इंडियाची पाचव्या विजेतेपदावर नजर

हेही वाचा - संथगतीचा भारताप्रमाणे न्यूझीलंडलाही फटका; खेळाडूंच्या ६० टक्के मानधनावर कात्री

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.