ETV Bharat / sports

IPL आयोजनावर रैना म्हणाला.. सद्या लोकांचा जीव महत्वाचा, नंतर काय ते बघू

author img

By

Published : Apr 5, 2020, 11:53 AM IST

परिस्थिती सुधारली की आयपीएलचा विचार करता येईल. सध्या अनेक लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे, असे रैना म्हणाला.

life is important ipl can wait says chennai super kings player suresh raina
IPL आयोजनावर रैना म्हणाला.. सद्या लोकांचा जीव महत्वाचा, नंतर काय ते बघू

मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या खडतर परिस्थितीत आयपीएलपेक्षा लोकांचा जीव वाचवणे हे अधिक महत्वाचे आहे, आयपीएल काय नंतर खेळवली जाऊ शकते, असे मत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भरवशाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्त केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल, असे दिसत नाही.

सुरेश रैना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, 'सध्याच्या घडीला लोकांचा जीव वाचवणे अधिक महत्वाचे आहे, आयपीएल काय नंतर खेळवली जाऊ शकते. सद्या आपण सर्वांनी सरकारने दिलेल्या निर्देश आणि सूचनाचे पालन करणे गरजेचे आहे. याचे पालन आपण केले नाही तर परिणामही आपल्यालाच भोगावे लागतील.'

परिस्थिती सुधारली की आयपीएलचा विचार करता येईल. सध्या अनेक लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे, असेही रैना म्हणाला.

बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का या प्रयत्नात आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार यंदाचा हंगाम रद्द होऊ शकतो. मात्र, याचा निर्णय १४ एप्रिलला केंद्र सरकार लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय घेतं, यावर आयपीएलचे भवितव्य आहे.

दरम्यान, कोरोना विळखा दिवसागणिक अधिक घट्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यासाठी मदत करा असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. सुरेश रैनानेही या लढ्यासाठी मदत दिली आहे. रैनाने एकूण ५२ लाखांची मदत केली आहे.

मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या खडतर परिस्थितीत आयपीएलपेक्षा लोकांचा जीव वाचवणे हे अधिक महत्वाचे आहे, आयपीएल काय नंतर खेळवली जाऊ शकते, असे मत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भरवशाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्त केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल, असे दिसत नाही.

सुरेश रैना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, 'सध्याच्या घडीला लोकांचा जीव वाचवणे अधिक महत्वाचे आहे, आयपीएल काय नंतर खेळवली जाऊ शकते. सद्या आपण सर्वांनी सरकारने दिलेल्या निर्देश आणि सूचनाचे पालन करणे गरजेचे आहे. याचे पालन आपण केले नाही तर परिणामही आपल्यालाच भोगावे लागतील.'

परिस्थिती सुधारली की आयपीएलचा विचार करता येईल. सध्या अनेक लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे, असेही रैना म्हणाला.

बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का या प्रयत्नात आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार यंदाचा हंगाम रद्द होऊ शकतो. मात्र, याचा निर्णय १४ एप्रिलला केंद्र सरकार लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय घेतं, यावर आयपीएलचे भवितव्य आहे.

दरम्यान, कोरोना विळखा दिवसागणिक अधिक घट्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यासाठी मदत करा असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. सुरेश रैनानेही या लढ्यासाठी मदत दिली आहे. रैनाने एकूण ५२ लाखांची मदत केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.