ETV Bharat / sports

भारताचा ऑस्ट्रेलियावर धमा'केदार'विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी - undefined

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार अॅरोन फिंचला भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याचा अडसर दूर केला. त्यानंतर उस्मान ख्वाजाने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले. त्याने ७६ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला.

केदार-धोनी
author img

By

Published : Mar 2, 2019, 10:17 PM IST

हैदराबाद - महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून सहज विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २३७ धावांचे आव्हान भारताने ४ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार अॅरोन फिंचला भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याचा अडसर दूर केला. त्यानंतर उस्मान ख्वाजाने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले. त्याने ७६ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला.

मार्कस स्टोईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीने प्रथम सामना खेळणाऱ्या अॅश्टन टर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलच्या यष्ट्या गुल केल्या. अलेक्स केरी आणि नथन कुल्टर नाईलने भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. अॅलेक्स ३६ तर नथनने २८ धावा काढून दोनशेचा टप्पा पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात ७ बाद २३६ धावा केल्या. भारताकडून शमी, बुमराह आणि यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

undefined

प्रतिउत्तरात, भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर दुसऱ्याच षटकात शून्यवर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराटने भारताचा डाव सावरला. रोहित ३७ तर विराटने ४४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर रोहित,विराट आणि अंबाती हे एकापोठापाठ बाद झाले. त्यामुळे ४ बाद ९९ अशी भारताची स्थिती झाली. त्यानंतर सामन्याची सारी सूत्रे महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी घेतली.

जाधवने ९ चौकारांच्या सहाय्याने ८१ धावा काढल्या. धोनीने ५९ धावा काढून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १४१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान भारतीय संघाने ४८.२ षटकात २४० धावा काढून पूर्ण केले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला.

हैदराबाद - महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून सहज विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २३७ धावांचे आव्हान भारताने ४ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार अॅरोन फिंचला भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याचा अडसर दूर केला. त्यानंतर उस्मान ख्वाजाने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले. त्याने ७६ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला.

मार्कस स्टोईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीने प्रथम सामना खेळणाऱ्या अॅश्टन टर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलच्या यष्ट्या गुल केल्या. अलेक्स केरी आणि नथन कुल्टर नाईलने भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. अॅलेक्स ३६ तर नथनने २८ धावा काढून दोनशेचा टप्पा पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात ७ बाद २३६ धावा केल्या. भारताकडून शमी, बुमराह आणि यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

undefined

प्रतिउत्तरात, भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर दुसऱ्याच षटकात शून्यवर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराटने भारताचा डाव सावरला. रोहित ३७ तर विराटने ४४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर रोहित,विराट आणि अंबाती हे एकापोठापाठ बाद झाले. त्यामुळे ४ बाद ९९ अशी भारताची स्थिती झाली. त्यानंतर सामन्याची सारी सूत्रे महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी घेतली.

जाधवने ९ चौकारांच्या सहाय्याने ८१ धावा काढल्या. धोनीने ५९ धावा काढून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १४१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान भारतीय संघाने ४८.२ षटकात २४० धावा काढून पूर्ण केले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला.

Intro:Body:

नांदेडच्या शेख इम्रानने पटकाविला मराठवाडा श्री



Nandeds Shiakh Imran won  Marathwada Shree



नांदेड -  प्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कबीर क्रीडा मंडळाच्यावतीने मराठवाडाश्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे नुकतेच आयोजन २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यात नांदेडचा शेख इम्रान हा ‘मराठवाडाश्री’चा किताब पटकाविला.





‘मराठवाडाश्री’चा बेस्ट बोझरचा किताब औरंगाबाद येथील आमेर पठाण याने पटकाविला. ही स्पर्धा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडली. स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक बापुराव गजभारे, गंगाधरराव सोनकांबळे, विशाल गायकवाड यांच्या हस्ते झाले.





या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोजभाऊ क्षीरसागर, अमित काबरा, मुन्ना अब्बास, प्रफुल्ल सावंत, जहूर अहेमद, शेख सैफोद्दीन, फारुखभाई, राजकुमार भेदेकर आदींची उपस्थिती होती.





स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून साहेबराव सोनकांबळे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. मराठवाडाश्रीचा टायटल विजेता नांदेड येथील शेख इम्रान याला 21 हजार रूपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. औरंगाबाद येथील आमेर पठाण या बेस्ट पोझर म्हणून तर बीड तालुक्यातील माजलगाव येथील माजीत बागवान याने बेस्ट मस्क्युलर किताब पटकाविला. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती.





या स्पर्धेत ० ते ५५, ५६ ते ६०, ६१ ते ६५, ७१ ते ७५ आणि त्यावरील वजनगटात असणार्‍या स्पर्धकांनी भाग घेतला होता. पंच म्हणून मुंबई येथील सुरेश कदम, औरंगाबादचे आरेश सिद्दीकी, परभणीहून शेख रिझवान यांनी काम पाहिले. संयोजन समितीत राजू कपाळे, सिद्धार्थ गच्चे, राजू जोंधळे, अनिल गाजुला, राहूल घोडजकर, सोनु गजभारे आदींसह गब्बर सोनवणे आदींचा समावेश होता. शहरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.