ETV Bharat / sports

टीम इंडियाच्या विजयात 'या' पाच खेळाडूंची भूमिका ठरली मोलाची

author img

By

Published : Nov 11, 2019, 9:29 AM IST

बांगलादेशविरोधातील निर्णायक सामन्यात ५ खेळाडूंनी महत्वाची भूमिका पार पाडली वाचा कोण आहेत ते खेळाडू...

टीम इंडियाच्या विजयात 'या' पाच खेळाडूंची भूमिका ठरली मोलाची

नागपूर - टीम इंडियाने तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात बांगलादेशचा ३० धावांनी पराभव करत ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना २० षटकात १७४ धावा केल्या. तेव्हा प्रत्त्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ निर्धारीत २० षटकात १४४ धावा करु शकला. बांगलादेशविरोधातील निर्णायक सामन्यात ५ खेळाडूंनी महत्वाची भूमिका पार पाडली वाचा कोण आहेत ते खेळाडू...

दीपक चहर -
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाजांनी गुडघे टेकले. चहरने या सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी टिपले. त्याने ३.२ षटकाची गोलंदाजी करताना, ७ धावा देत ६ गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे, चहर टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाज ठरला.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
दीपक चहर

श्रेयस अय्यर -
सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने दणकेबाज खेळी करत भारताचा डाव सावरला. त्याने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावा झोडपल्या. विशेष म्हणजे, श्रेयसचे हे पहिलेच टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
श्रेयस अय्यर

केएल राहुल -
मागील काही दिवसांपासून 'ऑऊट ऑफ फॉर्म' असलेल्या केएल राहुलची बॅट निर्णायक सामन्यात तळपली. त्याने मोक्याच्या क्षणी ३५ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी साकारली. राहुल आणि अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागिदारी केली.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
केएल राहुल

शिवम दुबे -
बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात शिवमने भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. शिवमने ४ षटकात ३० धावा देत ३ गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात त्याने बांगलादेश यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिमला बाद करुन पहिला टी-२० विकेट घेतला.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
शिवम दुबे

मनीष पांडे -
बांगलादेश विरुध्दच्या मालिकेत प्रथम अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेल्या मनीषने साजेशी खेळी केली. त्याने बांगलादेशी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आक्रमक १३ चेंडूत २२ धावा केल्या.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
मनीष पांडे

नागपूर - टीम इंडियाने तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात बांगलादेशचा ३० धावांनी पराभव करत ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना २० षटकात १७४ धावा केल्या. तेव्हा प्रत्त्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ निर्धारीत २० षटकात १४४ धावा करु शकला. बांगलादेशविरोधातील निर्णायक सामन्यात ५ खेळाडूंनी महत्वाची भूमिका पार पाडली वाचा कोण आहेत ते खेळाडू...

दीपक चहर -
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाजांनी गुडघे टेकले. चहरने या सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी टिपले. त्याने ३.२ षटकाची गोलंदाजी करताना, ७ धावा देत ६ गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे, चहर टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाज ठरला.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
दीपक चहर

श्रेयस अय्यर -
सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने दणकेबाज खेळी करत भारताचा डाव सावरला. त्याने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावा झोडपल्या. विशेष म्हणजे, श्रेयसचे हे पहिलेच टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
श्रेयस अय्यर

केएल राहुल -
मागील काही दिवसांपासून 'ऑऊट ऑफ फॉर्म' असलेल्या केएल राहुलची बॅट निर्णायक सामन्यात तळपली. त्याने मोक्याच्या क्षणी ३५ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी साकारली. राहुल आणि अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागिदारी केली.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
केएल राहुल

शिवम दुबे -
बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात शिवमने भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. शिवमने ४ षटकात ३० धावा देत ३ गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात त्याने बांगलादेश यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिमला बाद करुन पहिला टी-२० विकेट घेतला.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
शिवम दुबे

मनीष पांडे -
बांगलादेश विरुध्दच्या मालिकेत प्रथम अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेल्या मनीषने साजेशी खेळी केली. त्याने बांगलादेशी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आक्रमक १३ चेंडूत २२ धावा केल्या.

india vs bangladesh five heroes of team india to win 3rd t20i along with series at nagpur
मनीष पांडे
Intro:Body:

spo


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.