ETV Bharat / sitara

मालिकेतील 'रत्ना अक्का' म्हणजे अपर्णा क्षेमकल्याणी झाल्या प्रेक्षकांच्या लाडक्या!

author img

By

Published : Feb 2, 2022, 11:51 AM IST

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मधील देशमुख कुटुंबीय हे प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. बाहेरून कडक पण मनात सगळ्यांसाठी प्रचंड प्रेम असलेली रत्ना अक्का ही आपल्या कुटुंबात देखील हवी असं प्रेक्षकांना मालिका बघताना प्रकर्षाने जाणवतं. रत्ना अक्काची भूमिका अभिनेत्री अपर्णा क्षेमकल्याणी अगदी चोख बजावत आहेत.

अपर्णा क्षेमकल्याणी
अपर्णा क्षेमकल्याणी

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. एकत्र कुटुंबपद्धती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यामुळे घरातील मुलांना जेष्ठांकडून संस्कारांचे धडे मिळणे मुश्किल झाले आहे. मराठी परंपरा आणि संस्कार यावर भर देणारी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे रत्ना अक्का.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मधील देशमुख कुटुंबीय हे प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. बाहेरून कडक पण मनात सगळ्यांसाठी प्रचंड प्रेम असलेली रत्ना अक्का ही आपल्या कुटुंबात देखील हवी असं प्रेक्षकांना मालिका बघताना प्रकर्षाने जाणवतं. रत्ना अक्काची भूमिका अभिनेत्री अपर्णा क्षेमकल्याणी अगदी चोख बजावत आहेत.

एकत्र कुटुंब पद्धती आणि मालिकेबद्दल बोलताना अपर्णा क्षेमकल्याणी म्हणाल्या, "नात्यांना बहरण्यासाठी प्रेम खूप महत्वाचं असतं आणि ते प्रेम फक्त २ लोकांमध्ये किंवा जोडप्यामध्ये नसून संपूर्ण कुटुंबामध्ये असलं पाहिजे. कुटुंबाला सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल करत असताना नात्यांची भावनिक गुंतवणूक होत असते आणि नाती बहरत असतात. कुटुंब म्हणजे आपला आधार असतो. तुमच्या पाठीमागे नेहमी कोणीतरी आहे, तुमच्या सुखदुःखात तुमचे कुटुंबीय सहभागी असतात. एक तीळ सात लोकांनी वाटून खाल्ला कि त्यातील प्रेम, आनंद, जिव्हाळा वाढतो तसाच या मालिकेत सगळ्या कुटुंबियांसोबत आनंद वाढत असतो.”

“एक साखळी कड्या जोडून जशी मजबूत होते तशीच मजबूती तुमच्या नात्यात येते जेव्हा तुमची आपली माणसं जवळ असतील जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. सध्या सगळे विभक्त कुटुंबात राहतात त्यामुळे काही प्रसंगी एकाकीपणा घेरून येतो तो एकत्र कुटुंबात जाणवत नाही. व्यावहारिकदृष्ट्या सध्या एकत्र एका घरात इतक्या माणसांना राहणं शक्य नाही होत पण नाती सांधण, मनाने जवळ राहणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे वेळप्रसंगी एका हाकेवर आपल्या जवळची माणसं आपल्या मदतीसाठी सज्ज होतील अशा प्रकारे आपण नात्यांची जपणूक केली पाहिजे. असा बोध या मालिकेतून मिळतो", अपर्णा क्षेमकल्याणी पुढे म्हणाल्या.

हेही वाचा - Nagraj Manjule Jhund : नागराज मंजुळेचा 'झुंड' अखेर ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. एकत्र कुटुंबपद्धती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यामुळे घरातील मुलांना जेष्ठांकडून संस्कारांचे धडे मिळणे मुश्किल झाले आहे. मराठी परंपरा आणि संस्कार यावर भर देणारी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे रत्ना अक्का.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मधील देशमुख कुटुंबीय हे प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. बाहेरून कडक पण मनात सगळ्यांसाठी प्रचंड प्रेम असलेली रत्ना अक्का ही आपल्या कुटुंबात देखील हवी असं प्रेक्षकांना मालिका बघताना प्रकर्षाने जाणवतं. रत्ना अक्काची भूमिका अभिनेत्री अपर्णा क्षेमकल्याणी अगदी चोख बजावत आहेत.

एकत्र कुटुंब पद्धती आणि मालिकेबद्दल बोलताना अपर्णा क्षेमकल्याणी म्हणाल्या, "नात्यांना बहरण्यासाठी प्रेम खूप महत्वाचं असतं आणि ते प्रेम फक्त २ लोकांमध्ये किंवा जोडप्यामध्ये नसून संपूर्ण कुटुंबामध्ये असलं पाहिजे. कुटुंबाला सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल करत असताना नात्यांची भावनिक गुंतवणूक होत असते आणि नाती बहरत असतात. कुटुंब म्हणजे आपला आधार असतो. तुमच्या पाठीमागे नेहमी कोणीतरी आहे, तुमच्या सुखदुःखात तुमचे कुटुंबीय सहभागी असतात. एक तीळ सात लोकांनी वाटून खाल्ला कि त्यातील प्रेम, आनंद, जिव्हाळा वाढतो तसाच या मालिकेत सगळ्या कुटुंबियांसोबत आनंद वाढत असतो.”

“एक साखळी कड्या जोडून जशी मजबूत होते तशीच मजबूती तुमच्या नात्यात येते जेव्हा तुमची आपली माणसं जवळ असतील जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. सध्या सगळे विभक्त कुटुंबात राहतात त्यामुळे काही प्रसंगी एकाकीपणा घेरून येतो तो एकत्र कुटुंबात जाणवत नाही. व्यावहारिकदृष्ट्या सध्या एकत्र एका घरात इतक्या माणसांना राहणं शक्य नाही होत पण नाती सांधण, मनाने जवळ राहणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे वेळप्रसंगी एका हाकेवर आपल्या जवळची माणसं आपल्या मदतीसाठी सज्ज होतील अशा प्रकारे आपण नात्यांची जपणूक केली पाहिजे. असा बोध या मालिकेतून मिळतो", अपर्णा क्षेमकल्याणी पुढे म्हणाल्या.

हेही वाचा - Nagraj Manjule Jhund : नागराज मंजुळेचा 'झुंड' अखेर ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.