ETV Bharat / sitara

युपी फिल्म सिटीमुळे राज्यातील कलाकारंची स्वप्ने साकारतील, बॉलिवूडचीही मिळेल मान्यता - Ambitious decision of Yogi Adityanath government

उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभा करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. यामुळे स्थानिक कलाकारांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल. राज्यात अनेक लोकेशन्स आहेत ज्यावर शुटिंग होऊ शकेल. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे इथल्या लोकेशन्सवर प्रेम असल्याचे आणि आजवर अनेक दिग्गज कलाकार आणि चित्रपट युपीने दिल्याचे कलाकार, तंत्रज्ञांनी म्हटले आहे.

UP Film City
युपी फिल्म सिटीमु
author img

By

Published : Dec 10, 2020, 1:41 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी बनवण्याच्या घोषणेनंतर राज्यातील स्थानिक कलाकारांच्या स्वप्नांना पंख फुटू लागले आहेत. बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर चमकण्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला राज्यातच संधी मिळेल. योगी सरकारच्या फिल्म सिटीच्या निर्मितीची घोषणा येथील कलाकारांना संधी देणारी आहे. आता बॉलिवूडसारखी ओळख मिळवण्याचा हा एक मार्ग बनला आहे.

यूपीने चित्रपट, संगीत आणि कलाविश्वात अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत, ज्यांनी आपल्या देशाची नव्हे तर परदेशातही राज्याची ख्याती मिळवून दिली आहे. पूर्वांचलच्या भूमीवर जन्मलेल्या बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी संपूर्ण जगात आपले काम केले आहे.

हिंदी चित्रपटाची बाब असो किंवा भोजपुरी चित्रपटांची चर्चा असो. टीव्ही मालिका असो वा वेब सीरिज मनोरंजन, प्रत्येक व्यासपीठावर पूर्वांचलच्या कलाकारांनी आपल्या चमकदार कामगिरीने बॉक्स ऑफिसवर एकट्याने अनेक चित्रपटांची कमाई केली आहे. आता इथल्या कलाकारांना त्यांच्याच राज्यात बॉलिवूडचे बडे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

मुक्केबाज या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विनीत सिंह म्हणतो की फिल्म सिटी यूपीमध्ये बनल्यामुळे इथल्या कलाकारांसाठी एक मोठी संधी तयार होईल. बाबा विश्वनाथच्या भूमीने अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडला मोहित केले आहे. सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या शुटिंगसाठी बनारस मोठ्या कलाकारांची पहिली पसंती असल्याचे त्याने सांगितले.

सत्यजित रे, दिलीप कुमार, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना, हृतिक रोशन, धनुष यांच्यासह अनेक कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले आहे. मिर्झापूर, गँग ऑफ वासेपुरपूरसह अनेक वेब सीरिज येथे चित्रीत करण्यात आल्या आहेत.

देश-विदेशात ख्याती मिळवणाऱ्या बनारसमधील संगीत जगातील अनेक महान कलाकारांनी चित्रपटसृष्टीचा गौरव केला आहे. पं. बिरजू महाराज, पद्मश्री चन्नूलाल मिश्रा, गुदई महाराज, गोपीकृष्ण यांनी चित्रपटसृष्टीत आपली कीर्ती मिळविली आहे.

हेही वाचा - चित्रपटाच्या सेटवर परतल्याचा मला आनंद आहे - ताहिर राज भसीन

बनारसमधील अभिनेता टिळक राज मिश्रा म्हणतात की मी मुंबईत गेलो तिथे मी खूप संघर्ष केला. शहर महाग होते, म्हणून मला जास्त काळ मायानागरीमध्ये राहता आले नाही. पण मी माझ्या राज्यात माझे नाव कमवले. ते म्हणाले की, आता लोकांचा भ्रम दूर होईल की मुंबईत गेल्यानंतरच तुम्ही नायक होऊ शकता. आता त्यांच्या राज्यात राहूनच त्यांची स्वप्ने पूर्ण करता येतील. येथे चित्रपटाचे शूटिंगही खूप स्वस्त आहे.

गायक ममता उपाध्याय म्हणतात की, फिल्म सिटी बनल्यास आपल्या राज्यातच काम मिळेल. कोरोना काळात लोकांना मुंबई सोडावं लागलं. आर्थिक कारणांमुळे कलाकारांना यापुढे त्यांचे स्वप्न सोडावे लागणार नाही.

अभिनेता आणि लाइन प्रोड्यूसर रतीशंकर त्रिपाठी म्हणाले की, शूटिंगच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेशसारखी लोकेशन्स इतर कोठेही नाही. पूर्वांचल ही सुरुवातीपासूनच बॉलिवूडची पहिली पसंती आहे. काशीचा गंगा घाट, मंदिर आणि रस्त्यावर शूटिंग करण्याचा स्वत: चा एक वेगळा अनुभव आहे.

सोनभद्र, मिझरपूर, चंदौली, प्रयागराज ही चांगली लोकेशन्स आहेत. ते म्हणाले की, भोजपुरी चित्रपटांपैकी जवळपास ७५ टक्के चित्रपट हैदराबादमधील रामोजी राव फिल्म सिटी येथे बनतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नाने येथे फिल्म सिटीची निर्मिती, आयटी क्षेत्र, पर्यटन, हॉटेल उद्योगाचा विस्तार यामुळे पूर्वांचलमधील लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

हेही वाचा - स्वतःचे संरक्षण कसे करावे हे मुलांना शिकवायला हवे - आयुष्मान खुराणा

अतिरिक्त मुख्य सचिव (माहिती) नवनीत सहगल म्हणाले की, मुख्यमंत्री फिल्म सिटीबद्दल अत्यंत गंभीर आहेत. चित्रपट निर्मात्यांना फिल्मबंधु मार्फतही अनुदान दिले जात आहे. लोकेशन्स आणि वातावरणामुळे येथे अनेक डझनभर चित्रपट आणि वेब मालिका शुटींग होत आहेत. लखनौमध्ये जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते पार्ट -२ चे शूटिंग सुरू आहे. फिल्म सिटीच्या निर्मितीमुळे स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील.

लखनौ - उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी बनवण्याच्या घोषणेनंतर राज्यातील स्थानिक कलाकारांच्या स्वप्नांना पंख फुटू लागले आहेत. बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर चमकण्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला राज्यातच संधी मिळेल. योगी सरकारच्या फिल्म सिटीच्या निर्मितीची घोषणा येथील कलाकारांना संधी देणारी आहे. आता बॉलिवूडसारखी ओळख मिळवण्याचा हा एक मार्ग बनला आहे.

यूपीने चित्रपट, संगीत आणि कलाविश्वात अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत, ज्यांनी आपल्या देशाची नव्हे तर परदेशातही राज्याची ख्याती मिळवून दिली आहे. पूर्वांचलच्या भूमीवर जन्मलेल्या बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी संपूर्ण जगात आपले काम केले आहे.

हिंदी चित्रपटाची बाब असो किंवा भोजपुरी चित्रपटांची चर्चा असो. टीव्ही मालिका असो वा वेब सीरिज मनोरंजन, प्रत्येक व्यासपीठावर पूर्वांचलच्या कलाकारांनी आपल्या चमकदार कामगिरीने बॉक्स ऑफिसवर एकट्याने अनेक चित्रपटांची कमाई केली आहे. आता इथल्या कलाकारांना त्यांच्याच राज्यात बॉलिवूडचे बडे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

मुक्केबाज या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विनीत सिंह म्हणतो की फिल्म सिटी यूपीमध्ये बनल्यामुळे इथल्या कलाकारांसाठी एक मोठी संधी तयार होईल. बाबा विश्वनाथच्या भूमीने अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडला मोहित केले आहे. सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या शुटिंगसाठी बनारस मोठ्या कलाकारांची पहिली पसंती असल्याचे त्याने सांगितले.

सत्यजित रे, दिलीप कुमार, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना, हृतिक रोशन, धनुष यांच्यासह अनेक कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले आहे. मिर्झापूर, गँग ऑफ वासेपुरपूरसह अनेक वेब सीरिज येथे चित्रीत करण्यात आल्या आहेत.

देश-विदेशात ख्याती मिळवणाऱ्या बनारसमधील संगीत जगातील अनेक महान कलाकारांनी चित्रपटसृष्टीचा गौरव केला आहे. पं. बिरजू महाराज, पद्मश्री चन्नूलाल मिश्रा, गुदई महाराज, गोपीकृष्ण यांनी चित्रपटसृष्टीत आपली कीर्ती मिळविली आहे.

हेही वाचा - चित्रपटाच्या सेटवर परतल्याचा मला आनंद आहे - ताहिर राज भसीन

बनारसमधील अभिनेता टिळक राज मिश्रा म्हणतात की मी मुंबईत गेलो तिथे मी खूप संघर्ष केला. शहर महाग होते, म्हणून मला जास्त काळ मायानागरीमध्ये राहता आले नाही. पण मी माझ्या राज्यात माझे नाव कमवले. ते म्हणाले की, आता लोकांचा भ्रम दूर होईल की मुंबईत गेल्यानंतरच तुम्ही नायक होऊ शकता. आता त्यांच्या राज्यात राहूनच त्यांची स्वप्ने पूर्ण करता येतील. येथे चित्रपटाचे शूटिंगही खूप स्वस्त आहे.

गायक ममता उपाध्याय म्हणतात की, फिल्म सिटी बनल्यास आपल्या राज्यातच काम मिळेल. कोरोना काळात लोकांना मुंबई सोडावं लागलं. आर्थिक कारणांमुळे कलाकारांना यापुढे त्यांचे स्वप्न सोडावे लागणार नाही.

अभिनेता आणि लाइन प्रोड्यूसर रतीशंकर त्रिपाठी म्हणाले की, शूटिंगच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेशसारखी लोकेशन्स इतर कोठेही नाही. पूर्वांचल ही सुरुवातीपासूनच बॉलिवूडची पहिली पसंती आहे. काशीचा गंगा घाट, मंदिर आणि रस्त्यावर शूटिंग करण्याचा स्वत: चा एक वेगळा अनुभव आहे.

सोनभद्र, मिझरपूर, चंदौली, प्रयागराज ही चांगली लोकेशन्स आहेत. ते म्हणाले की, भोजपुरी चित्रपटांपैकी जवळपास ७५ टक्के चित्रपट हैदराबादमधील रामोजी राव फिल्म सिटी येथे बनतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नाने येथे फिल्म सिटीची निर्मिती, आयटी क्षेत्र, पर्यटन, हॉटेल उद्योगाचा विस्तार यामुळे पूर्वांचलमधील लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

हेही वाचा - स्वतःचे संरक्षण कसे करावे हे मुलांना शिकवायला हवे - आयुष्मान खुराणा

अतिरिक्त मुख्य सचिव (माहिती) नवनीत सहगल म्हणाले की, मुख्यमंत्री फिल्म सिटीबद्दल अत्यंत गंभीर आहेत. चित्रपट निर्मात्यांना फिल्मबंधु मार्फतही अनुदान दिले जात आहे. लोकेशन्स आणि वातावरणामुळे येथे अनेक डझनभर चित्रपट आणि वेब मालिका शुटींग होत आहेत. लखनौमध्ये जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते पार्ट -२ चे शूटिंग सुरू आहे. फिल्म सिटीच्या निर्मितीमुळे स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.