ETV Bharat / sitara

मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या साकारणार निगेटीव्ह रोल! - evil

चाहत्यांना ऐश्वर्याचं नवं रूप पाहायला मिळणार आहे. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या निगेटीव्ह रोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' या तामिळ कादंबरीवर आधारित असणार आहे.

ऐश्वर्या साकारणार निगेटीव्ह रोल!
author img

By

Published : May 17, 2019, 10:29 AM IST

मुंबई - बॉलिवूडची सुंदरी, अशी ओळख असणाऱ्या ऐश्वर्याला आजपर्यंत प्रेक्षकांनी केवळ मुख्य अभिनेत्री आणि एका उत्तम व्यक्तिमत्वाच्या रूपातच पडद्यावर पाहिलं आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांना तिचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात ती निगेटीव्ह रोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

हा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' या तामिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटातून चोल साम्राज्यावर भाष्य केलं जाणार आहे. चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. नंदिनीने चोल साम्राज्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळली होती.

विशेष म्हणजे ऐश्वर्यानं मणिरत्नम यांच्याच 'इरूवर' चित्रपटातून १९९७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऐश्वर्याने याआधीही काही चित्रपटांत खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे, या भूमिकेतील तिचा कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे.

मुंबई - बॉलिवूडची सुंदरी, अशी ओळख असणाऱ्या ऐश्वर्याला आजपर्यंत प्रेक्षकांनी केवळ मुख्य अभिनेत्री आणि एका उत्तम व्यक्तिमत्वाच्या रूपातच पडद्यावर पाहिलं आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांना तिचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात ती निगेटीव्ह रोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

हा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' या तामिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटातून चोल साम्राज्यावर भाष्य केलं जाणार आहे. चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. नंदिनीने चोल साम्राज्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळली होती.

विशेष म्हणजे ऐश्वर्यानं मणिरत्नम यांच्याच 'इरूवर' चित्रपटातून १९९७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऐश्वर्याने याआधीही काही चित्रपटांत खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे, या भूमिकेतील तिचा कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे.

Intro:दोन बायकांच्या प्रेमात एकाचवेळी पडलेला पुरुष, घरवालीला धोका देऊन बाहरवालीसोबत मजा करणारा पुरुष, किंवा एकाच वेळी अनेक मुलीच्या प्रेमात पडलेला प्रेमवीर अशा अनेक फॉर्म्युलावर आधारित सिनेमे आपण पाहिलेत. मात्र 50 वर्षांचा पुरुष एका 26 वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला तर त्याच्या आयुष्यात नक्की काय काय होऊ शकेल त्याची मोठी रंजक गोष्ट म्हणजे 'दे दे प्यार दे' हा सिनेमा आहे.

आता साध्या सरळ वाटणाऱ्या पण तशा अजिबात नसणाऱ्या नातेसंबंधावर आधारित सिनेमे बनवण्यात निर्माता लव रंजनचा हात कुणीच धरू शकत नाही. यावेळी निर्माता लवने दिग्दर्शक अकीव अलीच्या साथीने असाच एक वेगळा पण तेवढाच मनोरंजक सिनेमा बनवला आहे. आकाश म्हणजेच अजय देवगण हा 50 वर्षाचा लंडनस्थित उद्योगपती आपल्या मित्राच्या बॅचलर पार्टीच्या निमित्ताने इशिता म्हणजेच अभिनेत्री रकुल प्रीत या 26 वर्षीय मुलीला भेटतो. तीच सौंदर्य आणि वागणूक पाहून तिच्याकडे आकर्षित होतो. दुसरीकडे लंडनमध्ये शिकायला आलेली इशिता आकाशच्या आयुष्यातील रितेपण, त्याचा पैसा आणि सरत्या वर्षातही राखलेला चार्म पाहून आकर्षित होते. सुरुवातीला वयातील अंतर आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचा विचार करून हे दोघे वेळीच दूर जाण्याचा निर्णय घेतात. मात्र नंतर न रहावल्याने एका वळणावर वय समाज कशाचीही पर्वा न करता हे दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. फक्त लग्न करण्यापूर्वी 16 वर्षांपूर्वी भारतात सोडून आलेल्या आपली पत्नी आणि मुलांना हा निर्णय एकदा सांगायचा अस ठरवून आकाश ईशीतला घेऊन भारतात येतो आणि इथून सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते.

इकडे भारतात आकाशाची पत्नी इंदू म्हणजे तब्बू, त्याचा एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील अस कुटुंब असत. या कुटुंबात परतल्यावर नक्की काय होतं. आकाशला इशिताशी लग्न करायची परवानगी मिळते का..? इंदू इशिताला सवत म्हणून स्वीकारते का..? का त्यांच्या नात्यात अजून काही नवे प्रश्न ऊभे राहतात ते पहायचं असेल तर त्यासाठी हा सिनेमा पहायला हवा.

सिनेमाच सगळ्यात मोठं बलस्थान आहे त्याची पटकथा आणि संवाद, भावनाप्रधान आणि नातेसंबंध यांची गुंफण असलेल्या सिनेमात मोजके पण चांगले संवाद असतील तर ते सिनेमाला नवी उंची मिळवून देऊ शकतात. उत्तम संवाद आणि प्रसंगाची योग्य मांडणी झाल्याने सिनेमा अजिबात बोअर होत नाही उलट पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते. लव राजनच्या स्वतःच्या सिनेमाचे संवाद कायम गाजलेत. त्यामुळे 'दे दे प्यार दे'ही आपल्याला याबाबतीत अजिबात निराश करत नाही.

उत्तम संवादाला कायम जोड लागते ती तितक्याच उत्तम कलाकारांची. त्याबाबतीत दे दे अस म्हणायची गरजच लागत नाही कारण अजय देवगणन त्याच्या वयाला साजेशी ही भूमिका अतिशय सहजपणे केली आहे. त्याच्या पत्नीच्या भूमिकेत तब्बूनेही त्याला मस्त साथ दिली आहे. बंदी घालण्यापूर्वीचा सिनेमा असल्याने त्यात अलोकनाथही आहेत. गेस्ट म्हणून जिमी शेरगिल, सनी सिंग आणि जावेद जाफरी यांनीही आपापल्या छोटयाशा भूमिकेत मजा आणलीय.

मात्र या सिनेमातली हुकमाची राणी आहे अभिनेत्री रकुल प्रीत 'यारीया' मध्ये दिसूनही लक्षात न राहिलेली आणि 'अय्यारी' मध्ये निव्वळ फुकट गेलेल्या रकुलने या सिनेमात सगळी कसर भरून काढली आहे. सिनेमाभर ती अतिशय सुंदर तर दिसली आहेच पण ईशीतची भूमिका तिने मनापासून केली आहे. त्यामुळे सिनेमा संपला तरी रकुल प्रीतच काम आवर्जून लक्षात राहत.

सिनेमाची गाणी पंजाबी माहोल तयार करणारी आहेत जी ठीकठाक झालीत. सिनेमाची लोकेशन्स ही सिनेमॅटोग्राफीपेक्षा जास्त लक्षात राहतात. मुख्य म्हणजे नातेसबंधाचे चढउतार सुरू असताना विनोदी मांडणीमुळे रंगत वाढत जाते. नाही म्हटलं तरी शेवटाकडे केलेला इमोशनल सियापा थोडा कमी होऊ शकला असता तरी चाललं असत, अस राहून राहून वाटतं, पण त्याने फारसं काही बिघडत नाही. प्रॅक्टिकल आयुष्य जगणाऱ्या लोकांच प्रॅक्टिकल गोष्ट मांडणारा हा सिनेमा प्रॅक्टिकल सोल्युशन देऊनच संपतो.

( माझ्याकडून सिनेमाला साडे तीन स्टार)




Body:.


Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.