ETV Bharat / international

आण्विक प्रकल्पांवर हल्ला प्रतिबंध करारानुसार भारत-पाकमध्ये माहितीची देवाणघेवाण

author img

By

Published : Jan 1, 2020, 1:57 PM IST

आण्विक प्रकल्पावर हल्ला प्रतिबंध करारानुसार भारत-पाकमध्ये आण्विक प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण झाली.

india pak flag
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली- युद्ध किंवा तणावाच्या परिस्थितीत आण्विक प्रकल्पांवर हल्ला करता येणार नाही, असा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली झाला आहे. त्यानुसार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आपापल्या देशातील आण्विक प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण केली.

  • MEA: India and Pakistan today exchanged, through diplomatic channels simultaneously at New Delhi and Islamabad, the list of nuclear installations and facilities covered under the Agreement on the Prohibition of Attack against Nuclear installations between India and Pakistan.

    — ANI (@ANI) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत

नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथील राजनैतिक अधिकाऱ्यांनी आज(बुधवारी) याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. जर आण्विक प्रकल्पांवर बॉम्ब हल्ला केला तर त्याचे परिणाम दूरगामी होतात, म्हणून भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली आण्विक प्रकल्पांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये हा करार झाला होता. हा करार १९९१ सालापासून अमलांत आला आहे. १९९२ सालापासून दोन्ही देशातील आण्विक प्रकल्पांबाबच्या माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.

हेही वाचा - सरसेनाध्यक्ष पदाच्या निर्मितीचे सावध स्वागत हवे..

नवी दिल्ली- युद्ध किंवा तणावाच्या परिस्थितीत आण्विक प्रकल्पांवर हल्ला करता येणार नाही, असा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली झाला आहे. त्यानुसार दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आपापल्या देशातील आण्विक प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण केली.

  • MEA: India and Pakistan today exchanged, through diplomatic channels simultaneously at New Delhi and Islamabad, the list of nuclear installations and facilities covered under the Agreement on the Prohibition of Attack against Nuclear installations between India and Pakistan.

    — ANI (@ANI) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत

नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथील राजनैतिक अधिकाऱ्यांनी आज(बुधवारी) याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. जर आण्विक प्रकल्पांवर बॉम्ब हल्ला केला तर त्याचे परिणाम दूरगामी होतात, म्हणून भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली आण्विक प्रकल्पांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये हा करार झाला होता. हा करार १९९१ सालापासून अमलांत आला आहे. १९९२ सालापासून दोन्ही देशातील आण्विक प्रकल्पांबाबच्या माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.

हेही वाचा - सरसेनाध्यक्ष पदाच्या निर्मितीचे सावध स्वागत हवे..

Intro:Body:

आण्विक प्रकल्पावर हल्ला प्रतिबंध करारानुसार भारत- पाक मध्ये माहितीची देवाणघेवाण



नवी दिल्ली- युद्ध किंवा तणावाच्या परिस्थितीत आण्विक प्रकल्पांवर हल्ला करता येणार नाही, असा करार भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली करार झाला आहे. त्यानुसार राजनैतिक मार्गाने दोन्ही देशांनी आपापल्या देशातील आण्विक प्रकल्पांची माहितीची देवाणघेवाण केली.

नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथील राजनैतिक अधिकाऱ्यांनी आज याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. जर आण्विक प्रकल्पांवर बॉम्ब हल्ला केला तर त्याचे परिणाम दुरगामी होतात, म्हणुन भारत आणि पाकिस्तानमध्ये १९८८ साली आण्विक प्रकल्पांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि पाकिस्तानी पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांच्यामध्ये हा करार झाला होता. हा करार १९९१ सालापासून अमलांत आला आहे.

१९९२ सालापासून दोन्ही देशातील आण्विक प्रकल्पांबाबच्या माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.      




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.