ETV Bharat / elections

...म्हणून कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर उपाशीपोटीच धाव

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी ६ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९७ मतदान केंद्रावरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ८ हजार ८८९ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, ९०१ कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत.

author img

By

Published : Apr 18, 2019, 10:50 AM IST

Election Employers issue on hingoli Constituency


हिंगोली - लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. आज नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते ईव्हीएम सुपूर्द करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, एकुण कर्मचाऱ्यांचा अंदाज न आल्यामुळे त्यांना भोजन अपूरे पडले. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावरच जेवण आटोपले.

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी ६ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९७ मतदान केंद्रावरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ८ हजार ८८९ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, ९०१ कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. आज या सर्व कर्मचाऱ्यांना हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयात मतदान यंत्र हाताळण्याचे शेवटचे प्रशिक्षण दिले. तर निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनात भात, पोळी, सोयाबीन वडी, वरण आणि शिरा या पदार्थांचा समावेश होता. मात्र, वरण जास्त प्रमाणात तेलकट आणि तिखट झाल्याने कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावरच जेवण आटोपले. स्वयंपाकही अपुरा पडल्याने या ठिकाणी एकच घाई झाली होती. त्यानंतर पुन्हा स्वयंपाक करण्यात आला. मात्र, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी मतदान पेट्या घेत काढता पाय घेतला.

कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर उपाशीपोटीच धाव

जे कर्मचारी रात्रंदिवस लोकशाहीच्या उत्सवात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याना जर अर्ध्यापोटी मतदान केंद्रावर जाण्याची वेळ येत असेल तर, याहून दुर्देवाची बाब कोणती. तरीही प्रशासन गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगत आहे. तरीही ही तयारी कमी पडल्याचे यावेळी दिसुन आले.
वसमत मतदार संघातील खुद्द वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर लाईट्स, सतरंज्या, टेबल आदींची व्यवस्था केली नसल्यानेही कर्मचारी चांगलेच भांबावून गेलेले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठांशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशीरापर्यंत काहीही व्यवस्था झाली नव्हती.
या मतदान केंद्रावरून १ हजार ३१ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोग महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवित आहे. मात्र, इकडे निवडणूक कर्मचऱ्यांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.


हिंगोली - लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. आज नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते ईव्हीएम सुपूर्द करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, एकुण कर्मचाऱ्यांचा अंदाज न आल्यामुळे त्यांना भोजन अपूरे पडले. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावरच जेवण आटोपले.

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी ६ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९७ मतदान केंद्रावरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ८ हजार ८८९ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, ९०१ कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. आज या सर्व कर्मचाऱ्यांना हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयात मतदान यंत्र हाताळण्याचे शेवटचे प्रशिक्षण दिले. तर निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनात भात, पोळी, सोयाबीन वडी, वरण आणि शिरा या पदार्थांचा समावेश होता. मात्र, वरण जास्त प्रमाणात तेलकट आणि तिखट झाल्याने कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावरच जेवण आटोपले. स्वयंपाकही अपुरा पडल्याने या ठिकाणी एकच घाई झाली होती. त्यानंतर पुन्हा स्वयंपाक करण्यात आला. मात्र, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी मतदान पेट्या घेत काढता पाय घेतला.

कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर उपाशीपोटीच धाव

जे कर्मचारी रात्रंदिवस लोकशाहीच्या उत्सवात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याना जर अर्ध्यापोटी मतदान केंद्रावर जाण्याची वेळ येत असेल तर, याहून दुर्देवाची बाब कोणती. तरीही प्रशासन गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगत आहे. तरीही ही तयारी कमी पडल्याचे यावेळी दिसुन आले.
वसमत मतदार संघातील खुद्द वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर लाईट्स, सतरंज्या, टेबल आदींची व्यवस्था केली नसल्यानेही कर्मचारी चांगलेच भांबावून गेलेले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठांशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशीरापर्यंत काहीही व्यवस्था झाली नव्हती.
या मतदान केंद्रावरून १ हजार ३१ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोग महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवित आहे. मात्र, इकडे निवडणूक कर्मचऱ्यांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

Intro:
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णता सज्ज झाले आहे. आज नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते मतदार पेट्या सुपूर्त करण्यात आल्या. तर प्रशासनाच्या वतीने भोजनाचीही व्यवस्था केली होती मात्र भाजी तिखट जेवतानाच पोळ्या संपल्यामुळे कर्मचारी संताप व्यक्त करत अर्ध्यावरच जेवण आटोपले अन मतदार पेट्या घेऊन काढता पाय घेतला. यावरून प्रशासनाची तयारी उत्कृष्ट असल्याचे समोर आले.


Body:हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सहाही विधानसभा मतदारसंघात 1हजार 997 मतदान केंद्रावरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 8हजार 889 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, 901 कर्मचारी अतिरिक्त ठेवण्यात आली आहे आज या सर्व कर्मचाऱ्यांना हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयात मतदान यंत्र हाताळण्याचे शेवटचे प्रशिक्षण दिले. तर निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक विभागाच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली खरे. भोजनात भात पोळी सोयाबीन, वडी, वरण व शिरा आधी पदार्थ दिले होते. मात्र वरण जास्त प्रमाणात तेलकट अन तिखट झाल्याने बऱ्याच कर्मचाऱ्याने अर्ध्यातून जेवण आटोपले. तसेच कर्मचाऱ्याचा अंदाज न आल्यानेही स्वयंपाक संपून गेला होता. त्यामुळे या ठिकाणी एकच घाई निर्माण झाली होती. नंतर कुठे पळापळ केल्यानंतर पुन्हा स्वयंपाक तयार केला मात्र तोवर कर्मचाऱ्याने मतदान पेट्या घेत काढता पाय घेतला. या संदर्भात बऱ्याच कर्मचाऱ्याना जेवणाचा दर्जा विचारण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचाऱ्याने कॅमेऱ्या समोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.


Conclusion:मात्र निकृष्ट दर्जाच्या जेवणाची चर्चा चांगलीच कर्मचाऱ्यामध्ये रंगली होती. जे कर्मचारी रात्रंदिवस लोकशाहीच्या उत्सवात महत्वाची भूमिका बजाबत असताना त्याना जर उपाशी पोटी मतदान केंद्रावर जाण्याची वेळ येत असेल तर याहून दुर्देवाची बाब कोणती. तरीही प्रशासन गेल्या महिना पासून लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगत आहे. मात्र ज्या महत्वाच्या उत्सवाच्या आदल्याच दिवशी प्रशासनाची तयारी कसल्या प्रकारची आहे. हे दिसून आले. तर वसमत मतदार संघातील खुद्द वसमत येथील महात्मा गांधी विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर लाईटची, सतरंज्या, टेबल आदींची व्यवस्था केली नसल्यानेही कर्मचारी चांगलेच भांबावून गेलेले आहेत. वरिष्ठांशी संपर्क साधू साधू हैराण होते. मात्र उशिरवर तरी काही व्यवस्था झाली नव्हती. वास्तविक पाहता या मतदान केंद्रावरून १ हजार ३१ मतदान मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोग महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवित आहे. अन इकडे निवडणूक कर्मचऱ्याना रात्र अंधारत काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.