ETV Bharat / crime

Uttar Pradesh Crime : पतीसोबतच्या वादाला कंटाळून महिलेने तीन मुलांना विष पाजून केली त्यांची हत्या

author img

By

Published : Feb 2, 2023, 11:02 AM IST

Updated : Feb 2, 2023, 11:13 AM IST

उत्तर प्रदेशच्या शामली येथे पतीसोबत वादाला कंटाळून महिलेने तीन मुलांची हत्या केली. पाण्यात विष टाकून तिने तीन मुलांची हत्या केली. त्यामुळे तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.

Murder In Shamli
तीन मुलांना विष पाजून केली त्यांची हत्या

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : उत्तर प्रदेश जिल्ह्यातील कैराना कोतवाली परिसरात धक्का दायक घटना ङडली. महिलेला चार मुल आहेत. मुलगा साद (8), मुलगी मिसबाह (4) आणि मंताशा (2) अशी त्यांचा नावे आहेत. यांना पाण्यात विष टाकून त्यांची हत्या केली. यामध्ये मुलाचा घरातच मृत्यू झाला, तर दोन्ही मुलींचा मेरठमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : पणजीठ गावातील रहिवासी असलेल्या मुर्सलीन दिल्लीतील एका फर्निचरच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतो. घरी पत्नी आणि चार मुले होती. बुधवारी पत्नी सलमाने मुलगा साद (8), मुलगी मिसबाह (4) आणि मंताशा (2) यांना पाण्यात विष टाकून ते पाणी पाजले. तर मुलगी झैनब (9) ही गावी मदरशात शिकण्यासाठी गेली होती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तीन मुले घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या नातेवाईकांना दिसली. याबाबत पत्नी व नातेवाईकांनी मुरसलीन यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तिन्ही मुलांना पोलिसांनी सीएचसी कैराना येथे नेले. डॉक्टरांनी सादला मृत घोषित केले. तर दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत उच्च केंद्रात पाठवण्यात आले. यानंतर मेरठला नेत असताना वाटेतच मिसबाहचा मृत्यू झाला. मेरठच्या मेडिकलमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास मंताशाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. याशिवाय आरोपी सलमाही ताब्यात घेण्यात आले आहे. कैराना कोतवालीचे प्रभारी निरीक्षक पंकज कुमार त्यागी यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी मुर्सलीनच्या तक्रारीवरून आरोपी सलमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप नाही : पोलिसांनी सलमाला ताब्यात घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता. मात्र ती पोलिसांना घाबरली होती. तिला वारंवार पोलिसांच्या खोलीतून बाहेर पडायचे होते. सुमारे दीड महिन्यापासून पती मुर्सलीन घरी येत नव्हता असे सलमाने चौकशीत सांगितले. घटनेच्या एक दिवसापूर्वीच तिचे पतीसोबत फोनवर बोलणे झाले होते. संवादादरम्यान तिने मुर्सलीनला घरी येऊन खर्च देण्यास सांगितले. त्यावर मुर्सलीनने घरी येण्यास नकार दिला. त्यावर तिने मुलांना विष देण्याची धमकीही दिली. मुर्सलीनचा फोन कट झाल्यानंतर मुलांना विष पाजण्याचा कट रचला. यानंतर सलमाने गावातील फेरीवाल्याकडून उंदीर मारण्याचे औषध विकत घेतले. ते पाण्यात मिसळून मुलांना दिले. दुसरीकडे, पतीसोबत झालेल्या वादामुळे सलमानेच चार वर्षांपूर्वी घराला आग लावली होती, ज्यामध्ये घरातील सामान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन मुलांचे प्राण वाचले : 2011 मध्ये मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सरवत गावात राहणाऱ्या सलमासोबत मुर्सलीनचा विवाह झाला होता. सलमाने दीड वर्षापूर्वी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यात मंताशा नावाची मुलगी आणि मुसा नावाचा मुलगा. जुळ्या मुलांची योग्य काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी, एका मुलाला, मुसाला संगोपनासाठी आईच्या घरी पाठवण्यात आले आहे. सध्या तो आजोळी रोहतो. तर झैनब अभ्यासासाठी गेली होती. त्यामुळे दोघांचे प्राणही वाचले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी पाण्याने भरलेली स्टीलचा हंडा आणि मुलांचे उलट्यांचे डाग असलेले कपडेही जप्त केले. हंड्यातील पाण्यावर पांढरी पावडर तरंगत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.


हेही वाचा : Boyfriend Killed Girlfriend: गर्लफ्रेंडने उधार दिलेले पैसे मागितले.. बॉयफ्रेंडने हत्या करून पुरुनच टाकले

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : उत्तर प्रदेश जिल्ह्यातील कैराना कोतवाली परिसरात धक्का दायक घटना ङडली. महिलेला चार मुल आहेत. मुलगा साद (8), मुलगी मिसबाह (4) आणि मंताशा (2) अशी त्यांचा नावे आहेत. यांना पाण्यात विष टाकून त्यांची हत्या केली. यामध्ये मुलाचा घरातच मृत्यू झाला, तर दोन्ही मुलींचा मेरठमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : पणजीठ गावातील रहिवासी असलेल्या मुर्सलीन दिल्लीतील एका फर्निचरच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतो. घरी पत्नी आणि चार मुले होती. बुधवारी पत्नी सलमाने मुलगा साद (8), मुलगी मिसबाह (4) आणि मंताशा (2) यांना पाण्यात विष टाकून ते पाणी पाजले. तर मुलगी झैनब (9) ही गावी मदरशात शिकण्यासाठी गेली होती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तीन मुले घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या नातेवाईकांना दिसली. याबाबत पत्नी व नातेवाईकांनी मुरसलीन यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तिन्ही मुलांना पोलिसांनी सीएचसी कैराना येथे नेले. डॉक्टरांनी सादला मृत घोषित केले. तर दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत उच्च केंद्रात पाठवण्यात आले. यानंतर मेरठला नेत असताना वाटेतच मिसबाहचा मृत्यू झाला. मेरठच्या मेडिकलमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास मंताशाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. याशिवाय आरोपी सलमाही ताब्यात घेण्यात आले आहे. कैराना कोतवालीचे प्रभारी निरीक्षक पंकज कुमार त्यागी यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी मुर्सलीनच्या तक्रारीवरून आरोपी सलमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप नाही : पोलिसांनी सलमाला ताब्यात घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता. मात्र ती पोलिसांना घाबरली होती. तिला वारंवार पोलिसांच्या खोलीतून बाहेर पडायचे होते. सुमारे दीड महिन्यापासून पती मुर्सलीन घरी येत नव्हता असे सलमाने चौकशीत सांगितले. घटनेच्या एक दिवसापूर्वीच तिचे पतीसोबत फोनवर बोलणे झाले होते. संवादादरम्यान तिने मुर्सलीनला घरी येऊन खर्च देण्यास सांगितले. त्यावर मुर्सलीनने घरी येण्यास नकार दिला. त्यावर तिने मुलांना विष देण्याची धमकीही दिली. मुर्सलीनचा फोन कट झाल्यानंतर मुलांना विष पाजण्याचा कट रचला. यानंतर सलमाने गावातील फेरीवाल्याकडून उंदीर मारण्याचे औषध विकत घेतले. ते पाण्यात मिसळून मुलांना दिले. दुसरीकडे, पतीसोबत झालेल्या वादामुळे सलमानेच चार वर्षांपूर्वी घराला आग लावली होती, ज्यामध्ये घरातील सामान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन मुलांचे प्राण वाचले : 2011 मध्ये मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सरवत गावात राहणाऱ्या सलमासोबत मुर्सलीनचा विवाह झाला होता. सलमाने दीड वर्षापूर्वी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यात मंताशा नावाची मुलगी आणि मुसा नावाचा मुलगा. जुळ्या मुलांची योग्य काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी, एका मुलाला, मुसाला संगोपनासाठी आईच्या घरी पाठवण्यात आले आहे. सध्या तो आजोळी रोहतो. तर झैनब अभ्यासासाठी गेली होती. त्यामुळे दोघांचे प्राणही वाचले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी पाण्याने भरलेली स्टीलचा हंडा आणि मुलांचे उलट्यांचे डाग असलेले कपडेही जप्त केले. हंड्यातील पाण्यावर पांढरी पावडर तरंगत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.


हेही वाचा : Boyfriend Killed Girlfriend: गर्लफ्रेंडने उधार दिलेले पैसे मागितले.. बॉयफ्रेंडने हत्या करून पुरुनच टाकले

Last Updated : Feb 2, 2023, 11:13 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.