ETV Bharat / city

लोकमान्य नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना

author img

By

Published : Feb 20, 2022, 7:11 PM IST

शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने लोकमान्यनगर चैतीनगर येथील विठ्ठल क्रिडा मंडळाच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना केली. त्याचे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तुतारीच्या गगनभेदी निनादात झाले.

statue Shivaji Maharaj Lokmanya Nagar
शिवाजी महाराज पुतळा लोकमान्य नगर एकनाथ शिंदे उपस्थिती

ठाणे - शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने लोकमान्यनगर चैतीनगर येथील विठ्ठल क्रिडा मंडळाच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना केली. त्याचे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तुतारीच्या गगनभेदी निनादात झाले. याप्रसंगी उपस्थित हजारो शिवभक्तांनी छत्रपतींचा जय जयकार करून त्यांना त्रिवार मानाचा मुजरा दिला.

लोकार्पण सोहळ्याचे दृश्य

हेही वाचा - Ramdas Athavale Pune : तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही - रामदास आठवले

प्रारंभी येथील स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. गेली 40 वर्षे या विभागात केलेल्या लोकोपयोगी कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, लोकमान्यनगरचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याची ग्वाही दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शिव छत्रपतींच्या आदर्श राज्यकारभाराची गौरवगाथा विशद केली. तसेच, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या गुणवत्तापूर्ण व अद्वितीय कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. कोरोना महामारीच्या काळात माझी तब्येत बिघडून मी कोमामध्ये गेलो असता, मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांतून मला वेळीच अत्यावश्यक ती वैद्यकीय सेवा मिळाली. त्यामुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे, अशी भावनिक कबुली त्यांनी यावेळी बोलताना दिली. मी आज जिवंत आहे, ते सन्माननीय उद्धव ठाकरेंमुळेच, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार आव्हाड यांनी यावेळी काढले. त्यांची राज्यकारभाराची पद्धत ही शिवकालीन पद्धतीला साजेशी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आपल्या वक्तव्यात शिव छत्रपतींचा रयतेचा राजा म्हणून केलेल्या महान कार्याचा गुणगौरव केला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना आदर्श राजा घडविला. आणि त्यांनी केवळ महाराष्ट्र नव्हे तर, हिंदुस्थानचे परकीय शक्तींपासून संरक्षण केले. ते जर उदयाला आले नसते तर आज तुम्ही आम्ही नसतो, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी केली. त्यांना दैवीशक्ती होती. जात - धर्म - पंत - प्रांत या पलीकडे जाऊन ठाकरे सरकारने कोरोना काळात कठोर मेहनत घेऊन लोकांचे जीव वाचविले. या उल्लेखनीय कामगिरीचे जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार, इतर राज्ये, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. हे सर्व शिव छत्रपतींच्या भगव्या प्रेरणेचे फलित आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लवकरच सुरू होणार क्लस्टर योजना

येत्या काळात समूह विकास योजनेच्या माध्यमातून किसननगरच्या धर्तीवर लोकमान्यनगर आणि ठाणे जिल्ह्यातील अन्य भागांचा विकास केला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना दिले. ठाणे जिल्ह्यातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या स्वप्नातील सर्व सुविधायुक्त अशी घरकुले मिळतील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

हेही वाचा - Pune Municipal Hospital : दीड वर्षापासून बांधलेले हॉस्पिटल बंदच; उपयोग काय?

ठाणे - शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने लोकमान्यनगर चैतीनगर येथील विठ्ठल क्रिडा मंडळाच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना केली. त्याचे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तुतारीच्या गगनभेदी निनादात झाले. याप्रसंगी उपस्थित हजारो शिवभक्तांनी छत्रपतींचा जय जयकार करून त्यांना त्रिवार मानाचा मुजरा दिला.

लोकार्पण सोहळ्याचे दृश्य

हेही वाचा - Ramdas Athavale Pune : तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही - रामदास आठवले

प्रारंभी येथील स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. गेली 40 वर्षे या विभागात केलेल्या लोकोपयोगी कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, लोकमान्यनगरचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याची ग्वाही दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शिव छत्रपतींच्या आदर्श राज्यकारभाराची गौरवगाथा विशद केली. तसेच, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या गुणवत्तापूर्ण व अद्वितीय कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. कोरोना महामारीच्या काळात माझी तब्येत बिघडून मी कोमामध्ये गेलो असता, मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांतून मला वेळीच अत्यावश्यक ती वैद्यकीय सेवा मिळाली. त्यामुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे, अशी भावनिक कबुली त्यांनी यावेळी बोलताना दिली. मी आज जिवंत आहे, ते सन्माननीय उद्धव ठाकरेंमुळेच, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार आव्हाड यांनी यावेळी काढले. त्यांची राज्यकारभाराची पद्धत ही शिवकालीन पद्धतीला साजेशी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आपल्या वक्तव्यात शिव छत्रपतींचा रयतेचा राजा म्हणून केलेल्या महान कार्याचा गुणगौरव केला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना आदर्श राजा घडविला. आणि त्यांनी केवळ महाराष्ट्र नव्हे तर, हिंदुस्थानचे परकीय शक्तींपासून संरक्षण केले. ते जर उदयाला आले नसते तर आज तुम्ही आम्ही नसतो, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी केली. त्यांना दैवीशक्ती होती. जात - धर्म - पंत - प्रांत या पलीकडे जाऊन ठाकरे सरकारने कोरोना काळात कठोर मेहनत घेऊन लोकांचे जीव वाचविले. या उल्लेखनीय कामगिरीचे जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार, इतर राज्ये, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. हे सर्व शिव छत्रपतींच्या भगव्या प्रेरणेचे फलित आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लवकरच सुरू होणार क्लस्टर योजना

येत्या काळात समूह विकास योजनेच्या माध्यमातून किसननगरच्या धर्तीवर लोकमान्यनगर आणि ठाणे जिल्ह्यातील अन्य भागांचा विकास केला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना दिले. ठाणे जिल्ह्यातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या स्वप्नातील सर्व सुविधायुक्त अशी घरकुले मिळतील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

हेही वाचा - Pune Municipal Hospital : दीड वर्षापासून बांधलेले हॉस्पिटल बंदच; उपयोग काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.