ETV Bharat / city

निवडणुकीपूर्वी शिवसेनेची खेळी, 500 चौ. फुटांच्या घरांना करमाफीवरुन विरोधकांची सेनेवर टीका

author img

By

Published : Nov 20, 2021, 5:44 PM IST

गुरुवारी (दि. 18) झालेल्या महासभेत 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. पण, कोरोनामुळे पालिकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता, हा ठराव किती तग धरणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे. ठाणेकर मतदारांना भुलविण्यासाठी हा `चुनावी जुमला' तर नव्हे, असा टोला भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.

ठाणे महापालिका
ठाणे महापालिका

ठाणे - महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. त्याला तब्बल साडेचार वर्षांनी मुर्तस्वरुप आल्याचे दिसत आहे. गुरुवारी (दि. 18) झालेल्या महासभेत 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. पण, कोरोनामुळे पालिकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता, हा ठराव किती तग धरणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे. ठाणेकर मतदारांना भुलविण्यासाठी हा `चुनावी जुमला' तर नव्हे, असा टोला भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.

500 चौ. फुटांच्या घरांना करमाफीवरुन विरोधकांची सेनेवर टीका

मतदारांना भुलवण्याचे सेनेचे काम

या करमाफीवर मनसेनेही शिवसेना ही फक्त आश्वासन देते. मात्र, आश्वासन पूर्तता करत नसल्याचा आरोप केला आहे. निवडणुकांपूर्वी ठाणेकर मतदारांना भुलवण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोपही मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

विरोधी पक्ष आक्रमक

सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केलेला हा ठराव प्रत्यक्षात उतरण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. शासकीय मंजूरी मिळाल्या नंतरच अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात करमाफी मिळवण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यात राज्य सरकारकडे पैसे नाही, तिजोरी रिकामी असल्याने विकासकामे आणि अनेक मोठे प्रकल्प रकडले आहेत. मग लगेच मंजुरी कशी मिळेल, असा प्रश्न विरोधी पक्षाना उपस्थित केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

हे ही वाचा - VIDEO : कॉंग्रेसने कंगनाला (kangana ranaut) पाठवली इतिहासाची पुस्तके

ठाणे - महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. त्याला तब्बल साडेचार वर्षांनी मुर्तस्वरुप आल्याचे दिसत आहे. गुरुवारी (दि. 18) झालेल्या महासभेत 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. पण, कोरोनामुळे पालिकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता, हा ठराव किती तग धरणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे. ठाणेकर मतदारांना भुलविण्यासाठी हा `चुनावी जुमला' तर नव्हे, असा टोला भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.

500 चौ. फुटांच्या घरांना करमाफीवरुन विरोधकांची सेनेवर टीका

मतदारांना भुलवण्याचे सेनेचे काम

या करमाफीवर मनसेनेही शिवसेना ही फक्त आश्वासन देते. मात्र, आश्वासन पूर्तता करत नसल्याचा आरोप केला आहे. निवडणुकांपूर्वी ठाणेकर मतदारांना भुलवण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोपही मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

विरोधी पक्ष आक्रमक

सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केलेला हा ठराव प्रत्यक्षात उतरण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. शासकीय मंजूरी मिळाल्या नंतरच अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात करमाफी मिळवण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यात राज्य सरकारकडे पैसे नाही, तिजोरी रिकामी असल्याने विकासकामे आणि अनेक मोठे प्रकल्प रकडले आहेत. मग लगेच मंजुरी कशी मिळेल, असा प्रश्न विरोधी पक्षाना उपस्थित केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

हे ही वाचा - VIDEO : कॉंग्रेसने कंगनाला (kangana ranaut) पाठवली इतिहासाची पुस्तके

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.