ETV Bharat / city

कसारा घाटातील महामार्गावर बिबट्याचा मुक्त संचार.. शिर्डी पदयात्रींमध्ये घबराट

भरधाव वाहनांच्या धडकेने २०१८ मध्ये कसारा घाटात २ बिबट्यांना अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. सध्या अपघाती मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

author img

By

Published : Apr 22, 2019, 10:53 AM IST

बिबट्या

ठाणे - शहापूर तालुक्यातील कसारा घाटात पाणवठ्याच्या शोधात बिबट्याचा मुंबई-नाशिक या मुख्य महामार्गावर मुक्त संचार सुरू आहे. बिबट्याच्या या मुक्त संचाराने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या महामार्गावरुन शिर्डीला जाणाऱ्या साई पदयात्रींची संख्या लक्षणीय असल्याने सर्वाधिक भीती पायी चालणाऱ्यांमध्ये पसरली आहे.


मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्यावेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्याचे भिमाशंकर अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाईच्या जंगलातून बिबटे कसारा घाटाच्या प्रदेशात येत आहेत. कसारा घाटापासून जवळच अंतरावर मध्यवैतरणा जलाशय आणि तानसा हे सुरक्षित अभयारण्य आहेत. पाणवठ्याची निसर्गनिर्मित व्यवस्था तानसा अभयारण्यात उपलब्ध आहे. म्हणूनच सध्याच्या उष्ण उन्हाच्या झळांपासून स्वतःच्या बचावासाठी बिबटे तानसातील पाणवठ्यांकडे येत आहेत. मात्र, त्यांना कसारा घाटातील मुंबई-नाशिक महामार्ग ओलांडावा लागत असल्याने बिबट्यांचे दर्शन होत आहे.


महामार्गावरील संचाराने बिबट्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेने २०१८ मध्ये कसारा घाटात २ बिबट्यांना अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. बिबट्याचा महामार्गावर असाच संचार सुरु राहिल्यास २०१८ मधल्या अपघाती मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. महामार्गावर बिबट्याच्या संचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कसारा घाटातून प्रवास करतांना काळजी घेण्याच्या विशेष सूचना निर्गमित केलेल्या नाहीत. तर, राज्याच्या वन्यजीव खात्याच्या ठाणे विभागाकडून बिबट्याच्या संचारावर उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत कसारा विहिगांव परिसरातील वनक्षेत्रपाल, प्रियांका उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता मुंबई - नाशिक महामार्गावर कसारा घाटात बिबट्या आढळून आला आहे. या महामार्गावर दिवसा-रात्री वनकर्मचाऱ्यांचे दक्षता पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे - शहापूर तालुक्यातील कसारा घाटात पाणवठ्याच्या शोधात बिबट्याचा मुंबई-नाशिक या मुख्य महामार्गावर मुक्त संचार सुरू आहे. बिबट्याच्या या मुक्त संचाराने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या महामार्गावरुन शिर्डीला जाणाऱ्या साई पदयात्रींची संख्या लक्षणीय असल्याने सर्वाधिक भीती पायी चालणाऱ्यांमध्ये पसरली आहे.


मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्यावेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्याचे भिमाशंकर अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाईच्या जंगलातून बिबटे कसारा घाटाच्या प्रदेशात येत आहेत. कसारा घाटापासून जवळच अंतरावर मध्यवैतरणा जलाशय आणि तानसा हे सुरक्षित अभयारण्य आहेत. पाणवठ्याची निसर्गनिर्मित व्यवस्था तानसा अभयारण्यात उपलब्ध आहे. म्हणूनच सध्याच्या उष्ण उन्हाच्या झळांपासून स्वतःच्या बचावासाठी बिबटे तानसातील पाणवठ्यांकडे येत आहेत. मात्र, त्यांना कसारा घाटातील मुंबई-नाशिक महामार्ग ओलांडावा लागत असल्याने बिबट्यांचे दर्शन होत आहे.


महामार्गावरील संचाराने बिबट्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेने २०१८ मध्ये कसारा घाटात २ बिबट्यांना अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. बिबट्याचा महामार्गावर असाच संचार सुरु राहिल्यास २०१८ मधल्या अपघाती मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. महामार्गावर बिबट्याच्या संचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कसारा घाटातून प्रवास करतांना काळजी घेण्याच्या विशेष सूचना निर्गमित केलेल्या नाहीत. तर, राज्याच्या वन्यजीव खात्याच्या ठाणे विभागाकडून बिबट्याच्या संचारावर उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत कसारा विहिगांव परिसरातील वनक्षेत्रपाल, प्रियांका उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता मुंबई - नाशिक महामार्गावर कसारा घाटात बिबट्या आढळून आला आहे. या महामार्गावर दिवसा-रात्री वनकर्मचाऱ्यांचे दक्षता पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाणवठ्याच्या शोधात कसारा घाटातील माहामार्गावर बिबट्याचा संचार

 

ठाणे :-  शहापूर तालुक्यातील कसारा घाटात पाणवठ्याच्या शोधात बिबट्याचा मुंबई - नाशिक या मुख्य महामार्गावर संचार सुरु असून बिबट्याच्या मुक्त संचाराने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे या महामार्गावर शिर्डीला जाणाऱ्या साई पदयात्रींची संख्या देखील लक्षणीय असल्याने सर्वाधिक भिती पदयात्री प्रवाशांमध्ये पसरली आहे.

 

मुंबई - नाशिक महामार्गावर रात्रीच्यावेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पुण्याच्या भिमाशंकर अभयारण्य व अहमदनगर जिल्ह्यातील जवळच्या कळसूबाईच्या जंगलातून बिबटे कसारा या पश्चिम घाटाच्या प्रदेशात येत आहेत. कसारा घाटापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर मध्यवैतरणा जलाशय व तानसा हे सुरक्षित अभयारण्य असल्याने उत्तम पाणवठ्याची निसर्गनिर्मित व्यवस्था तानसा अभयारण्यात उपलब्ध आहे. उत्तम पाणवठा म्हणूनच सध्याच्या उष्ण उन्हाच्या झळांपासून स्वतःच्या बचावासाठी बिबटे तानसातील पाणवठ्यांकडे आकर्षित होत आहेत. मात्र त्यांना कसारा घाटातील मुंबई - नाशिक महामार्ग ओलांडावा लागत असल्याने हे बिबटे कसारा घाटात आढळू लागले आहेत.

 

महामार्गावरील संचाराने बिबट्यांना देखील धोका निर्माण झाला असून या महामार्गावरील भरधाव वाहनांच्या धडकेने २०१८ मध्ये कसारा घाटात दोन बिबट्यांना अपघाती मृत्यू आल्याच्या घटना घडल्या होत्या. बिबट्याचा महामार्गावर असाच संचार सुरु राहिल्यास २०१८ मधल्या अपघाती मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. महामार्गावर बिबट्याच्या संचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कसारा घाटातून प्रवास करतांना काळजी घेण्याच्या विशेष सूचना निर्गमित केलेल्या नाहीत. तर राज्याच्या वन्यजीव खात्याच्या ठाणे विभागाकडून बिबट्याच्या संचारावर उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सागण्यात आले आहे

 

याबाबत कसारा विहिगांव परिसरातील वनक्षेत्रपाल,  प्रियांका उबाळे, यांच्याशी संपर्क साधला असता मुंबई - नाशिक महामार्गावर कसारा घाटात बिबट्या आढळून आला आहे. या महामार्गावर दिवसा - रात्री वनकर्मचाऱ्यांचे दक्षता पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

 


I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.