ETV Bharat / city

आधी पाणी, मगच मतदान... अन्यथा बहिष्कार !

author img

By

Published : Oct 1, 2019, 12:50 PM IST

१६ वर्षांपासून पालिकेचे पाणी इमारतीत नाही, मात्र प्रशासन दरवर्षी पाण्याच्या बिलाची वसूली करत आहे. या विरोधात भद्रानगर कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटी येथील नागरिकांनी आवाज उठवत, 'आधी पाणी द्या मगच मतदान करणार, अन्यथा बहिष्कार टाकू' असा निर्धार केला आहे.

डोंबिवलीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात असलेली 27 गावात तर बारमाही पाणी टंचाईने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. या रोषाचा आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्रेक होताना दिसत आहे. प्रशासनाच्या विरोधात काही सोसायटीमधील नागरिक एकत्र येत त्यांनी पाणी न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.

'आधी पाणी द्या मगच मतदान करणार, अन्यथा बहिष्कार टाकू', डोंबिवलीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार

हेही वाचा... ...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील भद्रानगर कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटीने 'आधी पाणी द्या, मगच मत मागायला या' असा इशारा देणारा फलकच इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. या इमारतीत १२५ कुटुंबे राहतात. मात्र १६ वर्षांपासून येथे पालिकेचे पाणी इमारतीत येत नाही. मात्र पालिका प्राशासन पाण्याची बिले मात्र वसूल करत आहे. या सोसायटीचा महिन्याला टँकरवर ५० हजार रुपये खर्च होतो. प्रत्येक निवडणुकीत मुबलक पाणी मिळेल, असे पोकळ आश्वासन देवून उमेदवार मते मिळवतात. आता मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी पाणी प्रश्न सोडवा मगच मत मागायला या, असे उमेदवारांना बजावले आहे. या विरोधाचे फलक सध्या कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा... शिवसैनिक म्हणतात बालेकिल्ला आमचाच; कल्याणात शिवसैनिकांची भाजप विरोधात डरकाळी

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात असलेली 27 गावात तर बारमाही पाणी टंचाईने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. या रोषाचा आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्रेक होताना दिसत आहे. प्रशासनाच्या विरोधात काही सोसायटीमधील नागरिक एकत्र येत त्यांनी पाणी न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.

'आधी पाणी द्या मगच मतदान करणार, अन्यथा बहिष्कार टाकू', डोंबिवलीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार

हेही वाचा... ...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील भद्रानगर कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटीने 'आधी पाणी द्या, मगच मत मागायला या' असा इशारा देणारा फलकच इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. या इमारतीत १२५ कुटुंबे राहतात. मात्र १६ वर्षांपासून येथे पालिकेचे पाणी इमारतीत येत नाही. मात्र पालिका प्राशासन पाण्याची बिले मात्र वसूल करत आहे. या सोसायटीचा महिन्याला टँकरवर ५० हजार रुपये खर्च होतो. प्रत्येक निवडणुकीत मुबलक पाणी मिळेल, असे पोकळ आश्वासन देवून उमेदवार मते मिळवतात. आता मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी पाणी प्रश्न सोडवा मगच मत मागायला या, असे उमेदवारांना बजावले आहे. या विरोधाचे फलक सध्या कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा... शिवसैनिक म्हणतात बालेकिल्ला आमचाच; कल्याणात शिवसैनिकांची भाजप विरोधात डरकाळी

Intro:kit 319Body:आधी पाणी ; मगच मतदान, अन्यथा बहिष्कार

ठाणे :- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. २७ गावांत तर बारमाही पाणी टंचाईने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पाणी टंचाईचा उद्रेक झाला आहे.

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील भद्रानगर कॉम्प्लेक्स हौसिंग सोसायटीने 'आधी पाणी द्या, मगच मत मागायला या' असा इशारा देणारा फलकच इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. या इमारतीत १२५ कुटुंबे राहतात. मात्र १६ वर्षांपासून पालिकेचे पाणीच इमारतीत येत नाही. मात्र पालिका प्राशासन पाणी बिले मात्र वसूल करते. या सोसायटीचा महिन्याला टँकरवर ५० हजार रुपये खर्च होतो. प्रत्येक निवडणुकीत मुबलक पाणी मिळेल असे पोकळ आश्वासन देवून उमेदवार मते मिळवतात. आता मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी पाणी प्रश्न सोडवा मगच मत मागायला या असे उमेदवारांना बजावले आहे. या आशयाचे फलक कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरले आहेत.


Conclusion:bombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.