ETV Bharat / city

..तर शिवाजी महाराजांनी यांना ढकलून दिले असते, चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका

राज्य सरकार महिला सुरक्षाबाबत उदासीन आहे. त्यांना काहीही घेणे देणे नाही. त्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाषणे ठोकायची आहेत. मात्र अशा अत्याचाराच्या घटना घडत असताना जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी अशी भाषणे ठोकणाऱ्यांना ढकलून दिले असते. त्यामुळेच आता यांना कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, असे विचारावेसे वाटत असल्याचा टीकाही वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

author img

By

Published : Sep 24, 2021, 12:19 PM IST

Updated : Sep 24, 2021, 12:43 PM IST

चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका
चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका

ठाणे - राज्यात साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आणखी काही बलात्काराच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. त्यावरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. केवळ भाषणे ठोकण्याचे काम सरकारकडून केले जाते. त्यांच्या या असल्या कारभारामुळेच आता मुख्यमंत्री महोदयांना विचारावेसे वाटते की, 'महोदय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट् माझा' असे वक्तव्य करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला. वाघ या ठाण्याच्या ब्राह्मण विद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महिला सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली.

चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका
ठाण्याच्या ब्राम्हण विद्यालयात कार्यक्रम प्रसंगी चित्रा वाघ
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, भाजप महिला मोर्च्याच्या वतीने यापूर्वीही ठाण्यातील सीसीटीव्ही बंदच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. तरीही अद्यापही ठाण्यात अर्धेअधिक सीसीटीव्ही बंद आहेत. याचा अर्थ राज्य सरकार महिला सुरक्षाबाबत उदासीन आहे. त्यांना काहीही घेणे देणे नाही. त्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाषणे ठोकायची आहेत. मात्र अशा अत्याचाराच्या घटना घडत असताना जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी अशी भाषणे ठोकणाऱ्यांना ढकलून दिले असते. त्यामुळेच आता यांना कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, असे विचारावेसे वाटत असल्याचा टीकाही वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

तसेच राज्यातील महिला अत्यांचारांच्या वाढत्य घटना पाहता एकीकडे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली. तर मुख्यमंत्री मात्र इतर राज्यातील अत्याचाराची आकडेवारी सांगताहेत आणि दुसरीकडे संजय राऊत विरोधकांचे थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र संजय राऊत यांच्यामध्ये थोबाड फोडण्याची हिम्मत असेल तर त्यांनी सरकारचे थोबाड फोडावे, असे आवाहन करत वाघ यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत, महाराष्ट्रात महिला असुरक्षितच-

महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाणे शहराची १२ लाख लोकसंख्या असताना संरक्षणाची जबाबदारी ही १४० पोलिसांवर कशी सुरक्षा होणार? अशीच परिस्थिती मुंबईची आहे. साकीनाका प्रकरणात रेल्वे पोलीस मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण वास्तवात रेल्वे पोलिसांची संख्याही अवघी ३८०० एवढी आहे. त्यांचे संख्याबळ कमी असताना ते काय मदत करणार? दुसरीकडे वारंवार होनगार्डची मागणी केल्यानंतरही होमगार्ड दिले नाहीत. गृहमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांना होमगार्ड पुरविण्यात आल्याचे उत्तर मिळत आहे. डोंबिवलीत वारंवार मागणी केल्यानंतरही पोलीस ठाणे का वाढविण्यात येत नाहीत? असा प्रश्नही वाघ यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका

डोबिंवली आणि साकीनाका येथील घटना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. तरीही महिलांच्या अत्याचाराबाबत आणि सुरक्षेसाठी सरकारला विशेष अधिवेशनाची गरज भासत नाही. साकीनाका प्रकरणात उद्या फास्टट्रॅक कोर्टाची घोषणा करतील, पण आजच्या घडीला फास्टट्रॅक कोर्टात असलेल्या खटल्याची संख्या ही १ लाख ६० हजार ३९२ एवढी असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे इतर राज्याची आकडेवारी देत आहेत. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची आकडेवारी घ्या. सरकार कितीदिवस लोकांना खोटे बोलणार आहे. किती धूळफेक करणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे आज उडालेले आहेत. यापूर्वी कधीही महाराष्टात पाहिलेले नव्हते, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'तेव्हा तुम्हाला त्यांचे थोबाड फोडावे वाटले नाही का?', बोरीवलीच्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा महापौरांना प्रतिप्रश्न

हेही वाचा -डोंबिवलीच्या घटनेच्या तपासात सरकारने विशेष प्रयत्न करावे - देवेंद्र फडणवीस

ठाणे - राज्यात साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आणखी काही बलात्काराच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. त्यावरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. केवळ भाषणे ठोकण्याचे काम सरकारकडून केले जाते. त्यांच्या या असल्या कारभारामुळेच आता मुख्यमंत्री महोदयांना विचारावेसे वाटते की, 'महोदय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट् माझा' असे वक्तव्य करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला. वाघ या ठाण्याच्या ब्राह्मण विद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महिला सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली.

चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका
ठाण्याच्या ब्राम्हण विद्यालयात कार्यक्रम प्रसंगी चित्रा वाघ
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, भाजप महिला मोर्च्याच्या वतीने यापूर्वीही ठाण्यातील सीसीटीव्ही बंदच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. तरीही अद्यापही ठाण्यात अर्धेअधिक सीसीटीव्ही बंद आहेत. याचा अर्थ राज्य सरकार महिला सुरक्षाबाबत उदासीन आहे. त्यांना काहीही घेणे देणे नाही. त्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाषणे ठोकायची आहेत. मात्र अशा अत्याचाराच्या घटना घडत असताना जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी अशी भाषणे ठोकणाऱ्यांना ढकलून दिले असते. त्यामुळेच आता यांना कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, असे विचारावेसे वाटत असल्याचा टीकाही वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

तसेच राज्यातील महिला अत्यांचारांच्या वाढत्य घटना पाहता एकीकडे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली. तर मुख्यमंत्री मात्र इतर राज्यातील अत्याचाराची आकडेवारी सांगताहेत आणि दुसरीकडे संजय राऊत विरोधकांचे थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र संजय राऊत यांच्यामध्ये थोबाड फोडण्याची हिम्मत असेल तर त्यांनी सरकारचे थोबाड फोडावे, असे आवाहन करत वाघ यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत, महाराष्ट्रात महिला असुरक्षितच-

महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाणे शहराची १२ लाख लोकसंख्या असताना संरक्षणाची जबाबदारी ही १४० पोलिसांवर कशी सुरक्षा होणार? अशीच परिस्थिती मुंबईची आहे. साकीनाका प्रकरणात रेल्वे पोलीस मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण वास्तवात रेल्वे पोलिसांची संख्याही अवघी ३८०० एवढी आहे. त्यांचे संख्याबळ कमी असताना ते काय मदत करणार? दुसरीकडे वारंवार होनगार्डची मागणी केल्यानंतरही होमगार्ड दिले नाहीत. गृहमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांना होमगार्ड पुरविण्यात आल्याचे उत्तर मिळत आहे. डोंबिवलीत वारंवार मागणी केल्यानंतरही पोलीस ठाणे का वाढविण्यात येत नाहीत? असा प्रश्नही वाघ यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघांची मुख्यमंत्र्यांवर टीका

डोबिंवली आणि साकीनाका येथील घटना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. तरीही महिलांच्या अत्याचाराबाबत आणि सुरक्षेसाठी सरकारला विशेष अधिवेशनाची गरज भासत नाही. साकीनाका प्रकरणात उद्या फास्टट्रॅक कोर्टाची घोषणा करतील, पण आजच्या घडीला फास्टट्रॅक कोर्टात असलेल्या खटल्याची संख्या ही १ लाख ६० हजार ३९२ एवढी असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे इतर राज्याची आकडेवारी देत आहेत. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची आकडेवारी घ्या. सरकार कितीदिवस लोकांना खोटे बोलणार आहे. किती धूळफेक करणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे आज उडालेले आहेत. यापूर्वी कधीही महाराष्टात पाहिलेले नव्हते, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'तेव्हा तुम्हाला त्यांचे थोबाड फोडावे वाटले नाही का?', बोरीवलीच्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा महापौरांना प्रतिप्रश्न

हेही वाचा -डोंबिवलीच्या घटनेच्या तपासात सरकारने विशेष प्रयत्न करावे - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Sep 24, 2021, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.