पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. पिढ्यानं पिढ्या झालेल्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं, या भागवतांच्या विधानाचा ब्राह्मण महासंघानं निषेध केला आहे. यासंदर्भात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील संघाच्या कार्यालयात निवेदन Union Office Notice दिलं आहे. मागच्या पाच- पन्नास वर्षांपूर्वी गुलामगिरी होती. लोकांना विकलं जात होतं, पण त्यावर आता असं कोणी म्हणत नाही.
ब्राह्मण समाजात मतभेद निर्माण करायचे पापक्षालन करावं. मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा कोणी म्हणत नाही. त्याबद्दल पापक्षालन करावं. त्यामुळं पाच- सातशे हजार वर्ष आधीची एखादी घटना उकरुन काढून हिंदू समाजात मतभेद निर्माण करायचे. ब्राह्मण समाजात मतभेद निर्माण करायचे. ब्राह्मण समाजाला वेगळं पाडायचं, हा उद्देश भागवतांकडून झालेला आहे. अशी आमची ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासंघ म्हणून ठाम भूमिका आहे, अस यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितल आहे.
काय म्हणाले मोहन भागवत ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते. त्या गोष्टींचे समूळ उच्चाटन करायला हवे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत. समाजाने वर्ण जाती व्यवस्था विसरून जायला पाहिजे, तो भूतकाळ होता. आपल्या शास्त्रांना जातीय विषमता मान्य नाही. सामाजिक समरसता हा आपला परंपरेचा भाग होता. त्यामुळे जातीभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केला आहे.
पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही शास्त्रानुसार चाललं पाहिजे, पण जिथे शास्त्र चालत नसेल. तिथे लोकांनुसार चालावे, कारण लोक श्रेष्ठ आहेत. असे देखील सरसंघचालक म्हणाले आहेत. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल, अशा पद्धतीने वागवले. परिणामी आपल्यातील दरी वाढत गेली आहे. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही असे ते म्हणाले आहेत.