पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) नेते शरद पवार हे नितीश कुमार यांची भेट (Sharad Pawar to meet Nitish Kumar) घेणार आहेत. यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारलं असता ते म्हणाले की, देशातील सर्वच पक्ष कमी अधिक प्रमाणावर आत्ता निष्कर्षावर आले आहेत की, या देशाची सत्ता आत्ता हुकूमशाही प्रवृत्तीकडे (Authoritarian Tendencies) चालली आहे. या देशातील सर्वच व्यवस्था पूर्णपणे झाकोळलेली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये हुकूमशाही प्रवृत्तीविरूध्द एकत्र येण्याची भावना वाढीस (Uniting Opposition Parties Against Authoritarian) लागलेली दिसत आहे. त्यामुळेच देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अस यावेळी पाटील म्हणाले.
नितीन गडकरींना जयंत पाटलांचा टोला गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलं जातं आहे. पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काल केंद्रीय मंत्री यांनी पुण्यात उडती बस सुरू करणार आहे. अशी घोषणा केली. यावर पाटील यांनी टोला लगावत म्हटल आहे की, "अजूनही उडती बस सुरू झालेली नाही. मी वाट बघितली. म्हणूनच मी चालत पुणे शहरातील सर्व गणपती करत आहे."
दसरा मेळावा ठाकरेंचाचं (Thackeray Dussehra gathering) दसरा मेळाव्याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की दसरा मेळावा ठाकरे ज्या बाजूला असतात. त्या बाजूलाच होतो. दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा आहे. शिवतीर्थावर ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा होत होता ती परंपरा उद्धव ठाकरे हे देखील त्याच पद्धतीने सांभाळत आहेत.
अशोक चव्हाण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की सत्ता ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे कामं करायला जावं लागतो. त्याचा अर्थ सर्वच पक्ष बदलायला लागले आहेत, असा गैरसमज होतो. अशोक चव्हाण यांच्या मागे तर खूप मोठे लोक आहे त्यामुळे ते असा विचार करतील अस मला वाटत नाही. यावेळी विश्वजित कदम यांच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की विश्वजित कदम यांच्या वडीलांवर अनेक प्रसंग आले तेव्हा देखील त्यांनी काँग्रेस सोडली नाही. ते देखील काँग्रेस सोडण्याचा विचार करणार नाही. अस देखील पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेना फोडली गेली आत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली जात आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, भाजपबद्दल पूर्वी जी मतं लोकांची होती. ती मतं आत्ता बदलत चालली आहे. गम्मत म्हणून सांगतो की जवळपास 30 टक्के भाजपचं काँग्रेसीकरण झालं आहे. आत्ता उर्वरित गेले की भाजप ची काँग्रेस लवकरच होईल. अस देखील यावेळी पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाला भेट दिली यावेळी पाटील यांनी आरती देखील केली यावेळी ते बोलत होते यावेळी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर ( Rupali chakankar) शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच प्रवक्ते प्रदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.