ETV Bharat / city

#CoronaVirus : चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारा 'तो' सुखरूप परतला

author img

By

Published : Feb 4, 2020, 10:30 AM IST

कोरोना विषाणूंवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेला पुण्यातील एक तरुण नुकताच मायदेशी परतला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले असून सध्या तो सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

corona virus in pune
चीनमध्ये एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत असलेला पुण्यातील एक तरुण नुकताच मायदेशी परतला आहे.

पुणे - चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्व देशांमध्ये याबाबत कमालीची सतर्कता बाळगण्यात येत आहे. यामुळे भारतीय दुतावासाने देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी अनेकांना चीनमधून मायदेशी आणले. यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या सारंग शेलार या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तो चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेण्यासाठी गेला होता.

चीनमध्ये एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत असलेला पुण्यातील तरुण नुकताच मायदेशी परतला

गेल्या दोन दिवसांपासून सारंग डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून आता तो सुखरुप असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. यावेळी सारंगने त्याचा चीनमधील अनुभव शेअर केला.
चीनमधील शेनियांग या शहरात सारंग वास्तव्यास होता. ज्या शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे; ते यापासून 1800 किलोमीटर दूर आहे, असे तो म्हणाला. शेनीयांग या शहरात कोरोनाची लागण झालेले दहा रुग्ण होते.

हेही वाचा - VIDEO : पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक, तरुणाचा मृत्यू

याठिकाणी नवीन वर्षाची सुट्टी सुरू आहे. नागरिक घाबरले आहेत. बाजारपेठांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असायची. मात्र, विषाणू संसर्गामुळे सर्व काही शांत असल्याचे त्याने सांगितले. जीवनावश्यक वस्तू देखील उपलब्ध होत नाही. अनेकदा या ठिकाणचे नागरिक बाहेर येण्यास घाबरत असून ते मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या मनात भीती आहे. सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे, असे सारंगने सांगितले.

पुणे - चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्व देशांमध्ये याबाबत कमालीची सतर्कता बाळगण्यात येत आहे. यामुळे भारतीय दुतावासाने देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी अनेकांना चीनमधून मायदेशी आणले. यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या सारंग शेलार या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तो चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेण्यासाठी गेला होता.

चीनमध्ये एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत असलेला पुण्यातील तरुण नुकताच मायदेशी परतला

गेल्या दोन दिवसांपासून सारंग डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून आता तो सुखरुप असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. यावेळी सारंगने त्याचा चीनमधील अनुभव शेअर केला.
चीनमधील शेनियांग या शहरात सारंग वास्तव्यास होता. ज्या शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे; ते यापासून 1800 किलोमीटर दूर आहे, असे तो म्हणाला. शेनीयांग या शहरात कोरोनाची लागण झालेले दहा रुग्ण होते.

हेही वाचा - VIDEO : पुण्यात भरधाव दुचाकीची पीएमपीला धडक, तरुणाचा मृत्यू

याठिकाणी नवीन वर्षाची सुट्टी सुरू आहे. नागरिक घाबरले आहेत. बाजारपेठांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असायची. मात्र, विषाणू संसर्गामुळे सर्व काही शांत असल्याचे त्याने सांगितले. जीवनावश्यक वस्तू देखील उपलब्ध होत नाही. अनेकदा या ठिकाणचे नागरिक बाहेर येण्यास घाबरत असून ते मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या मनात भीती आहे. सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे, असे सारंगने सांगितले.

Intro:mh_pun_02_avb_china_student_mhc10002Body:mh_pun_02_avb_china_student_mhc10002

चीनमध्ये एम.बी.बी.एस शिक्षण घेणारा पिंपरी-चिंचवड चा तो विद्यार्थी सुखरूप परतला

Anchor:- चीनमध्ये कोरोना व्हायरस मुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या विषाणूवर जगभरातून संशोधन सुरू आहे. मात्र, तो कधी आटोक्यात येणार यावर कोणकडेच उत्तर नाही. त्यामुळे चीनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेली भारतातील विद्यार्थी भीती पोटी परत मायदेशी येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील एम.बी.बी.एस च शिक्षण घेण्यासाठी गेलेला सारंग शेलार हा देखील परत आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टर च्या निगरानीमध्ये असून तो सुखरूप आहे. त्याला कोरोना व्हायरस ची लागण झालेली नाही. सारंग ज्या शहरात शिकतो तिथे अत्यंत शांत वातावरण आहे. अगदी सर्वच बाजारपेठा बंद असल्याचे त्याने सांगितले.

यावेळी सारंग म्हणाला की, चीनमध्ये शेनियांग हा शहरात मी राहतो. ज्या शहरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे, ते माझ्या पासून एक हजार आठशे किलोमीटर दूर आहे. शेनीयांग या शहरात लागण झालेले १० रुग्ण होते. दरम्यान, तिथे नवीन वर्षामुळे सुट्टी सुरू आहे. त्यामुळे तेथील नागरिक घाबरलेली आहेत. बाजार पेठांमध्ये नेहमी गर्दी असायची मात्र, या व्हायरसमुळे सर्व काही शांत आहे. तेथील अनेक दुकाने मार्केट बंद आहेत. दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नव्हत्या. अनेकदा तेथील नागरिक बाहेर येण्यास घाबरत असून मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या मनात भीती आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे अस सारंग म्हणाला.

पुढे तो म्हणाला. कोरोना व्हायरस ची भीती माझ्या मनात होती. पिंपरी-चिंचवड शहरातील माझ्या घरातील व्यक्ती मला नेहमी फोन करत होते. या सर्व गोष्टींचा ताण मला होत असे. चीनमध्ये घरातून बाहेर पडताना माझ्या मनात भीती असायची की, आपल्याला तर लागण होणार नाही ना.त्यामुळे माझ्यासह सात विद्यार्थी भारतात परतलो आहोत असे त्याने सांगितले.

बाईट:- सारंग शेलार:- मायदेशी परतलेला विद्यार्थी

बाईट:- चुलत भाऊ
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.